शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

शहरालगतचे हॉटेल बनले बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:44 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, वर्धा शहरालगत असलेले हॉटेल व ढाबे सध्या अवैध दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. येथे दररोज कोट्यवधी रूपयाची दारू विकली जात आहे.

ठळक मुद्देखुनांच्या घटना वाढीला कारणीभूत : पोलीस प्रशासन सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, वर्धा शहरालगत असलेले हॉटेल व ढाबे सध्या अवैध दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. येथे दररोज कोट्यवधी रूपयाची दारू विकली जात आहे. परंतु, जिल्हा पोलीस प्रशासन गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे वागत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची पुरती वाट लागली आहे.वर्धा शहरालगत नालवाडी, पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), सेवाग्राम, नागठाणा आदी परिसर येतो. शहराबाहेरून वळणमार्गाही गेलेला आहे. या मार्गालगत गत काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर हॉटेल आणि ढाबे थाटण्यात आले आहेत. कित्येक हॉटेल, ढाब्यांवर जेवणासोबतच दारूची सहज उपलब्ध होत आहे. वर्धा शहरातील अनेक नामांकित हॉटेलातही टेबलाखालून ग्राहकांना दारूचा पुरवठा केला जातो. या हॉटेलमधून दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला आहे. परंतु, आजवर एकाही हॉटेल व ढाब्यावर वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने छापा घातलेला नाही. या हॉटेलमध्ये कुटुंबासह काही लोकं जेवणासाठी येतात. ही बाब लक्षात घेऊन व्यावसायिकांनी हॉटेलच्या मागील भागात शेड उभारले आहे. येथे शौकिन दारूरंगी रंगताना दिसतात. दारू विक्रीमुळे हॉटेलमालकांचा गल्ला मोठ्या प्रमाणावर वाढत असून या अवैध व्यवसायाला आता अधिकृत धंद्याचे स्वरूप आले आहे. एकट्या वर्धा शहर व परिसरातील ११ गावांची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी वर्धा शहर पोलीस ठाणे, रामनगर, सावंगी आणि सेवाग्राम आदी पोलीस ठाणी कार्यरत आहेत. मात्र, यापैकी कुणाचेही या अवैध दारूविक्रीकडे लक्ष नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.पालकमंत्र्यांना दिली होती महिलांनी माहितीवर्धा जिल्हा दारूबंदी आहे. येथे अवैध दारूव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. याबाबत काहीतरी करा, अशी विनंती जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर महिलांनी केली होती. यासोबतच तिगाव येथील महिलांनीही त्यांची भेट घेतली होती. त्यानंतरही पोलीस प्रशासनाने अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्याच्या अनुषंगाने ठोस पावले उचलली नाही.अंडीविक्रीच्या गाड्या मुख्य केंद्रवर्धा शहरात विविध ठिकाणी २५ गाड्यांवरून अंडीविक्री केली जाते. येथेही राजरोसपणे ग्राहकांना दारू उपलब्ध करून दिली जाते. तरीही पोलीस प्रशासन कारवाई करीत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. शहरात व जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात खुनाच्या पाच घटना घडल्या. पोलिसांचा दराराच न राहिल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावली आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी