शहरं
Join us  
Trending Stories
1
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
2
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
3
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
5
Virat Kohli: कोहली बनला लिमिटेड ओव्हर्सचा 'किंग', सचिन तेंडुलकरचा १८,४३६ धावांचा विक्रम मोडला!
6
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
7
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
8
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
9
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
10
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
11
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
12
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
13
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
14
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
15
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
16
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
17
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
18
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
19
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
20
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव

शहरालगतचे हॉटेल बनले बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:44 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, वर्धा शहरालगत असलेले हॉटेल व ढाबे सध्या अवैध दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. येथे दररोज कोट्यवधी रूपयाची दारू विकली जात आहे.

ठळक मुद्देखुनांच्या घटना वाढीला कारणीभूत : पोलीस प्रशासन सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, वर्धा शहरालगत असलेले हॉटेल व ढाबे सध्या अवैध दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. येथे दररोज कोट्यवधी रूपयाची दारू विकली जात आहे. परंतु, जिल्हा पोलीस प्रशासन गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे वागत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची पुरती वाट लागली आहे.वर्धा शहरालगत नालवाडी, पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), सेवाग्राम, नागठाणा आदी परिसर येतो. शहराबाहेरून वळणमार्गाही गेलेला आहे. या मार्गालगत गत काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर हॉटेल आणि ढाबे थाटण्यात आले आहेत. कित्येक हॉटेल, ढाब्यांवर जेवणासोबतच दारूची सहज उपलब्ध होत आहे. वर्धा शहरातील अनेक नामांकित हॉटेलातही टेबलाखालून ग्राहकांना दारूचा पुरवठा केला जातो. या हॉटेलमधून दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला आहे. परंतु, आजवर एकाही हॉटेल व ढाब्यावर वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने छापा घातलेला नाही. या हॉटेलमध्ये कुटुंबासह काही लोकं जेवणासाठी येतात. ही बाब लक्षात घेऊन व्यावसायिकांनी हॉटेलच्या मागील भागात शेड उभारले आहे. येथे शौकिन दारूरंगी रंगताना दिसतात. दारू विक्रीमुळे हॉटेलमालकांचा गल्ला मोठ्या प्रमाणावर वाढत असून या अवैध व्यवसायाला आता अधिकृत धंद्याचे स्वरूप आले आहे. एकट्या वर्धा शहर व परिसरातील ११ गावांची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी वर्धा शहर पोलीस ठाणे, रामनगर, सावंगी आणि सेवाग्राम आदी पोलीस ठाणी कार्यरत आहेत. मात्र, यापैकी कुणाचेही या अवैध दारूविक्रीकडे लक्ष नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.पालकमंत्र्यांना दिली होती महिलांनी माहितीवर्धा जिल्हा दारूबंदी आहे. येथे अवैध दारूव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. याबाबत काहीतरी करा, अशी विनंती जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर महिलांनी केली होती. यासोबतच तिगाव येथील महिलांनीही त्यांची भेट घेतली होती. त्यानंतरही पोलीस प्रशासनाने अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्याच्या अनुषंगाने ठोस पावले उचलली नाही.अंडीविक्रीच्या गाड्या मुख्य केंद्रवर्धा शहरात विविध ठिकाणी २५ गाड्यांवरून अंडीविक्री केली जाते. येथेही राजरोसपणे ग्राहकांना दारू उपलब्ध करून दिली जाते. तरीही पोलीस प्रशासन कारवाई करीत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. शहरात व जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात खुनाच्या पाच घटना घडल्या. पोलिसांचा दराराच न राहिल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावली आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी