शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

शहरात वृक्षतोडीचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:41 IST

गत काही दिवसांपासून शहरात वृक्षतोडीचे सत्र सुरू आहे. संत कंवरराम भवन समोरील सिसमचे मोठे झाड तोडण्यात आले. याशिवाय शहरातील मोक्याच्या जागेवर असलेले वृक्ष तोडण्यात येत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची डोळेझाक : क्षुल्लक कारणासाठी होतेय झाडांची कत्तल

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : गत काही दिवसांपासून शहरात वृक्षतोडीचे सत्र सुरू आहे. संत कंवरराम भवन समोरील सिसमचे मोठे झाड तोडण्यात आले. याशिवाय शहरातील मोक्याच्या जागेवर असलेले वृक्ष तोडण्यात येत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ही बाब पर्यावरणासाठी धोकादायक असल्याने या समस्येकडे पर्यावरण संवर्धन संस्थेने लक्ष वेधले आहे.पर्यावरण संवर्धन संस्थेच्या चमूने याबाबत सविस्तर माहिती मिळवली असता सिसमचे झाड कंवरराम भवनचे मालकांनी तोडल्यासाठी सांगितल्याचे समजले. येथे पार्किंगची व्यवस्था करायची आहे म्हणून सदर झाड तोडल्याची माहिती मिळाली. तसेच या मार्गावर सिमेंटचे फ्लोअरींग सुरू आहे. त्यामुळे या रांगेत असलेलीआन्य ३-४ मोठी झाडही तोडण्याची शक्यता आहे. सेंट जॉन शाळेसमोरील मोठे कडूनिंबाचे झाड अज्ञाताने जाळल्याची माहिती उघड आली. पर्यावरण संवर्धन संस्थेच्या चमुने तातडीने अग्निशमन दलाला बोलावून आग आटोक्यात आणली. शहरात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. यासंबंधी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पोलिसांत तक्रार केली, परंतु यावर कारवाई झाली नाही. संबंधितांची चौकशी करुन कुठल्याच प्रकारचा दंड किंवा शिक्षा होताना दिसत नाही. नगर पालिका सरसकट झाड तोडण्याची परवानगी देत नाही असे असताना सदर वृक्षतोड होण्यामागे कुणाचा वरदहस्त आहे, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यावरण संवर्धन संस्थेने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.पर्यावरण संस्थेची पालिकेकडे तक्रारयशवंत नगर येथे संत कवंरराम भवन जवळ अवैध वृक्षतोड प्रकरणी काही सामाजिक संघटनेच्या चमुने नगरसेवक मनीष देवढे यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणाची तक्रार स्थानिक नगर पालिकेकडे केली. परंतु, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. एकीकडे सबंध राज्यात वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रूपये निधी खर्च होत असताना दुसरीकडे क्षुल्लक कारणासाठी अवैध वृक्षतोड होत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून स्थानिक पालिका प्रशासनाने व सामाजिक वनिकरण विभागाने चौकशी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, ही अपेक्षा मनीष देवढे यांनी व्यक्त केली.पर्यावरणाची हानी याप्रकारे सुरू राहिल्यास आणि त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही तर वृक्षकटआई चालुच राहिल. यामुळे शहर भकास व्हायला वेळ लागणार नाही अशी, भिती पर्यावरण संवर्धन संस्थेने व्यक्त केली आहे. याबाबत पालिका प्रशासन कोणते पाऊल उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.