शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

शहरात वृक्षतोडीचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:41 IST

गत काही दिवसांपासून शहरात वृक्षतोडीचे सत्र सुरू आहे. संत कंवरराम भवन समोरील सिसमचे मोठे झाड तोडण्यात आले. याशिवाय शहरातील मोक्याच्या जागेवर असलेले वृक्ष तोडण्यात येत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची डोळेझाक : क्षुल्लक कारणासाठी होतेय झाडांची कत्तल

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : गत काही दिवसांपासून शहरात वृक्षतोडीचे सत्र सुरू आहे. संत कंवरराम भवन समोरील सिसमचे मोठे झाड तोडण्यात आले. याशिवाय शहरातील मोक्याच्या जागेवर असलेले वृक्ष तोडण्यात येत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ही बाब पर्यावरणासाठी धोकादायक असल्याने या समस्येकडे पर्यावरण संवर्धन संस्थेने लक्ष वेधले आहे.पर्यावरण संवर्धन संस्थेच्या चमूने याबाबत सविस्तर माहिती मिळवली असता सिसमचे झाड कंवरराम भवनचे मालकांनी तोडल्यासाठी सांगितल्याचे समजले. येथे पार्किंगची व्यवस्था करायची आहे म्हणून सदर झाड तोडल्याची माहिती मिळाली. तसेच या मार्गावर सिमेंटचे फ्लोअरींग सुरू आहे. त्यामुळे या रांगेत असलेलीआन्य ३-४ मोठी झाडही तोडण्याची शक्यता आहे. सेंट जॉन शाळेसमोरील मोठे कडूनिंबाचे झाड अज्ञाताने जाळल्याची माहिती उघड आली. पर्यावरण संवर्धन संस्थेच्या चमुने तातडीने अग्निशमन दलाला बोलावून आग आटोक्यात आणली. शहरात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. यासंबंधी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पोलिसांत तक्रार केली, परंतु यावर कारवाई झाली नाही. संबंधितांची चौकशी करुन कुठल्याच प्रकारचा दंड किंवा शिक्षा होताना दिसत नाही. नगर पालिका सरसकट झाड तोडण्याची परवानगी देत नाही असे असताना सदर वृक्षतोड होण्यामागे कुणाचा वरदहस्त आहे, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यावरण संवर्धन संस्थेने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.पर्यावरण संस्थेची पालिकेकडे तक्रारयशवंत नगर येथे संत कवंरराम भवन जवळ अवैध वृक्षतोड प्रकरणी काही सामाजिक संघटनेच्या चमुने नगरसेवक मनीष देवढे यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणाची तक्रार स्थानिक नगर पालिकेकडे केली. परंतु, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. एकीकडे सबंध राज्यात वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रूपये निधी खर्च होत असताना दुसरीकडे क्षुल्लक कारणासाठी अवैध वृक्षतोड होत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून स्थानिक पालिका प्रशासनाने व सामाजिक वनिकरण विभागाने चौकशी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, ही अपेक्षा मनीष देवढे यांनी व्यक्त केली.पर्यावरणाची हानी याप्रकारे सुरू राहिल्यास आणि त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही तर वृक्षकटआई चालुच राहिल. यामुळे शहर भकास व्हायला वेळ लागणार नाही अशी, भिती पर्यावरण संवर्धन संस्थेने व्यक्त केली आहे. याबाबत पालिका प्रशासन कोणते पाऊल उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.