शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वृक्षतोडीचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:41 IST

गत काही दिवसांपासून शहरात वृक्षतोडीचे सत्र सुरू आहे. संत कंवरराम भवन समोरील सिसमचे मोठे झाड तोडण्यात आले. याशिवाय शहरातील मोक्याच्या जागेवर असलेले वृक्ष तोडण्यात येत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची डोळेझाक : क्षुल्लक कारणासाठी होतेय झाडांची कत्तल

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : गत काही दिवसांपासून शहरात वृक्षतोडीचे सत्र सुरू आहे. संत कंवरराम भवन समोरील सिसमचे मोठे झाड तोडण्यात आले. याशिवाय शहरातील मोक्याच्या जागेवर असलेले वृक्ष तोडण्यात येत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ही बाब पर्यावरणासाठी धोकादायक असल्याने या समस्येकडे पर्यावरण संवर्धन संस्थेने लक्ष वेधले आहे.पर्यावरण संवर्धन संस्थेच्या चमूने याबाबत सविस्तर माहिती मिळवली असता सिसमचे झाड कंवरराम भवनचे मालकांनी तोडल्यासाठी सांगितल्याचे समजले. येथे पार्किंगची व्यवस्था करायची आहे म्हणून सदर झाड तोडल्याची माहिती मिळाली. तसेच या मार्गावर सिमेंटचे फ्लोअरींग सुरू आहे. त्यामुळे या रांगेत असलेलीआन्य ३-४ मोठी झाडही तोडण्याची शक्यता आहे. सेंट जॉन शाळेसमोरील मोठे कडूनिंबाचे झाड अज्ञाताने जाळल्याची माहिती उघड आली. पर्यावरण संवर्धन संस्थेच्या चमुने तातडीने अग्निशमन दलाला बोलावून आग आटोक्यात आणली. शहरात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. यासंबंधी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पोलिसांत तक्रार केली, परंतु यावर कारवाई झाली नाही. संबंधितांची चौकशी करुन कुठल्याच प्रकारचा दंड किंवा शिक्षा होताना दिसत नाही. नगर पालिका सरसकट झाड तोडण्याची परवानगी देत नाही असे असताना सदर वृक्षतोड होण्यामागे कुणाचा वरदहस्त आहे, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यावरण संवर्धन संस्थेने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.पर्यावरण संस्थेची पालिकेकडे तक्रारयशवंत नगर येथे संत कवंरराम भवन जवळ अवैध वृक्षतोड प्रकरणी काही सामाजिक संघटनेच्या चमुने नगरसेवक मनीष देवढे यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणाची तक्रार स्थानिक नगर पालिकेकडे केली. परंतु, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. एकीकडे सबंध राज्यात वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रूपये निधी खर्च होत असताना दुसरीकडे क्षुल्लक कारणासाठी अवैध वृक्षतोड होत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून स्थानिक पालिका प्रशासनाने व सामाजिक वनिकरण विभागाने चौकशी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, ही अपेक्षा मनीष देवढे यांनी व्यक्त केली.पर्यावरणाची हानी याप्रकारे सुरू राहिल्यास आणि त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही तर वृक्षकटआई चालुच राहिल. यामुळे शहर भकास व्हायला वेळ लागणार नाही अशी, भिती पर्यावरण संवर्धन संस्थेने व्यक्त केली आहे. याबाबत पालिका प्रशासन कोणते पाऊल उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.