शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

जिल्हा सीमेवर शहरपक्षी नीलपंख करणार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:00 IST

राज्य सरकार आणि रेल्वे विभागाच्या सहकार्याने रेल्वेची प्रतिकृती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी तात्काळ सर्व प्रक्रिया पार पाडून २ ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. धामनदीच्या एकाच किनाऱ्यावरील विकासकामे झाली आहे. दुसऱ्या बाजुचेही कामे तात्काळ सुरू करावे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची माहिती : रेल्वेस्थानकावर बसविणार बापूंच्या आफ्रिका प्रवास रेल्वे डब्याची प्रतिकृती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दक्षिण ऑफ्रिकेला जाताना पहिल्यांदा ज्या रेल्वे डब्यातून प्रवास केला होता, त्या रेल्वे डब्याची प्रतिकृती वर्ध्याच्या रेल्वेस्थानकावर तर वर्धेकरांच्या मतदानातून निवडलेला शहरपक्षी नीलपंख, याची भव्य प्रतिकृती जिल्ह्याच्या प्रेवश व्दारावर उभारली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री सुनील केंदार यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सेवाग्राम विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली.राज्य सरकार आणि रेल्वे विभागाच्या सहकार्याने रेल्वेची प्रतिकृती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी तात्काळ सर्व प्रक्रिया पार पाडून २ ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. धामनदीच्या एकाच किनाऱ्यावरील विकासकामे झाली आहे. दुसऱ्या बाजुचेही कामे तात्काळ सुरू करावे.सेवाग्राम येथील चरखा घरच्या आवारात स्क्रॅपपासून बनविलेले महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे भव्य शिल्प बसविण्यात येत आहे. सेवाग्राम विकास आराखड्याच्या निधीतून शहरातील विविध चौकांचे सौदर्यीकरण करण्यात आले आहे. सौदर्यीकरण झालेल्या कामाचे स्वरूप तसेच कायम राहावे म्हणून त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मोठ्या कंपन्या, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि मोठे शासकीय कार्यालये यांना सोपविण्यात यावी, अशी सूचनाही पालकमंत्री यांनी केली. या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, सेवाग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता गजानन टाके, उपअभियंता संजय मंत्री उपस्थित होते.शासकीय कार्यालयात चरखा लागणारसेवाग्राम आणि पवनार आश्रमाची माहिती इतर जिल्ह्यातून तसेच परदेशातून येणाºया नागरिकांना व्हावी, यासाठी नागपूर विमानतळ, नागपूर रेल्वेस्थानक, वर्धा रेल्वेस्थानक आणि वर्धा बसस्थानकावर ऐतिहासिक माहिती देणारे केंद्र उभारण्यात यावे.जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या शासकीय कार्यालयात चरख्याची प्रतिकृती बसविण्यात यावी. तसेच पवनार येथील धामनदीच्या पात्राची शोभा वाढविण्याकरीता पाण्याचे मोठे कारजेही उभारण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री सुनील केदार यांनी या आढावा बैठकीत दिल्यात. उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना ही विकास कामे गांधी जयंतीपूर्वी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे आता या कामांना गती येणार आहे.

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीrailwayरेल्वे