शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
2
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
3
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
4
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
5
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
6
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
7
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
8
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
9
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
10
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
11
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
12
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
13
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
14
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
15
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
16
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
17
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
18
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
19
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
20
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात

वाढत्या अतिक्रमणाने गुदमरतोय आर्वी शहराचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

शहरातील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याची गरज आहे. विविध उपाययोजना राबवित असताना प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कडेला चालणे देखील अवघड झाले आहे. बाजारात जाताना प्रत्येक व्यक्ती बाजारात जात वस्तू खरेदी करायचा विचार करतो. पण, वाढत्या अतिक्रमणामुळे ते आत जावू शकत नाही.

ठळक मुद्देमार्केट परिसरात व्यावसायिकांची मनमर्जी : न.प. प्रशासनासह पोलीस विभागाने कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या अतिक्रमणाने संपूर्ण शहराची वाट लागली आहे. प्रमुख रस्त्यांसह गल्लोबोळीत अतिक्रमणामुळे आर्वीकरांचा श्वास गुदमरत असल्याचे चित्र आहे. शहरातील नेहरू मार्केट परिसरात वाढते अतिक्रमण डोकेदुखी ठरत आहे.शहरातील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याची गरज आहे. विविध उपाययोजना राबवित असताना प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कडेला चालणे देखील अवघड झाले आहे. बाजारात जाताना प्रत्येक व्यक्ती बाजारात जात वस्तू खरेदी करायचा विचार करतो. पण, वाढत्या अतिक्रमणामुळे ते आत जावू शकत नाही. नगरपालिका प्रशासन, महसूल विभागासह बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. अनेक व्यावसायिक आमची विक्री होत नाही किंवा आमचे व्यवहार ठप्प पडल्याचे सांगून त्यांनी चौफेर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे कुणीही येथे जाण्यास धजावत नाहीत. न.प. प्रशासनाने त्यांच्याजवळ असलेल्या रेकॉर्ड नुसार दुकानांची मोजणी करून तेवढीच जागा त्यांच्या ताब्यात ठेवून उर्वरित रस्ता रहदारीसाठी व ग्राहकांसाठी मोकळा ठेवावा, जेणेकरून त्यांची विक्री होईल आणि नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल. शहरातील वाढती वाहतूक, लोकसंख्या आणि रस्त्याची बकाल स्थिती असताना चौकाचौकात वाढलेले अतिक्रमण आणि वाहतुक नियमाचे उल्लंघन, वाहनचालकांचा निष्काळजीपणा, पार्किंगची योग्य व्यवस्था आदी समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहेत. पार्किंगची सोय नसल्याने योग्य जागा दिसेल तेथे वाहने उभी ठेवल्या जात आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन अनेक ठिकाणं अपघात स्थळ बनले आहे. बसस्थानकासमोरील एलआयसी कार्यालयासमोर काळीपिवळी दोन्ही बाजूला उभ्या असतात त्यामुळे वसंतनगर येथून येणाऱ्या मुख्य रस्त्यावरून येणारे वाहन दिसत नाही यात अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. साईनगरकडे जाणाºया रस्त्यावर चौकातच हॉटेलसमोर वाहने उभी राहत असल्याने कोंडी निर्माण झाली आहे.शहराच्या रस्तावरील अतिक्रमणाबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहे.यासंदर्भात मुख्याधिकारी यांच्याशी चर्चाही झालेली आहे. सध्या स्थिती लक्षात घेता पहिले लढाई कोरोना सोबत असल्याने संपूर्ण प्रशासन दिलेल्या निर्देशानुसारच काम करीत आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते नियंत्रणात येताच रस्त्यावरील असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल.-प्रा.प्रशांत सवालाखे,नगराध्यक्ष, नगरपालिका आर्वीआर्वी शहरातील वाढते अतिक्रमण लक्षात घेता वाहतुकीसाठी वाढलेले अतिक्रमण अडचणीचे ठरत असल्याचे दिसून येत आहे. वाढलेले अतिक्रमण काढण्याकरिता संयुक्तरीत्या मोहीम राबविल्यास नगरपालिका विभाग, नझूल, तहसील कार्यालय व बांधकाम विभागार्फे काढल्यास आम्ही अतिक्रमण काढण्याकरिता सहकार्य करू.-शिवाजी जाठे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वी.आर्वी शहरातील वेगवेगळ्या मार्गावर झालेल्या अतिक्रमणामुळे लोकांना ये जा करताना होत असलेल्या त्रासाबाबत मुख्याधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अतिक्रमण काढण्याकरिता संबंधितांनी सर्व विभागाचे सहकार्य लागेल. यादृष्टिकोनातून लवकरच चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल व शहरातील गर्दीच्या भागातील अतिक्रमण काढण्यात येईल,-विद्यासागर चव्हाण, तहसीलदार, तहसील कार्यालय आर्वी,