शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या अतिक्रमणाने गुदमरतोय आर्वी शहराचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

शहरातील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याची गरज आहे. विविध उपाययोजना राबवित असताना प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कडेला चालणे देखील अवघड झाले आहे. बाजारात जाताना प्रत्येक व्यक्ती बाजारात जात वस्तू खरेदी करायचा विचार करतो. पण, वाढत्या अतिक्रमणामुळे ते आत जावू शकत नाही.

ठळक मुद्देमार्केट परिसरात व्यावसायिकांची मनमर्जी : न.प. प्रशासनासह पोलीस विभागाने कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या अतिक्रमणाने संपूर्ण शहराची वाट लागली आहे. प्रमुख रस्त्यांसह गल्लोबोळीत अतिक्रमणामुळे आर्वीकरांचा श्वास गुदमरत असल्याचे चित्र आहे. शहरातील नेहरू मार्केट परिसरात वाढते अतिक्रमण डोकेदुखी ठरत आहे.शहरातील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याची गरज आहे. विविध उपाययोजना राबवित असताना प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कडेला चालणे देखील अवघड झाले आहे. बाजारात जाताना प्रत्येक व्यक्ती बाजारात जात वस्तू खरेदी करायचा विचार करतो. पण, वाढत्या अतिक्रमणामुळे ते आत जावू शकत नाही. नगरपालिका प्रशासन, महसूल विभागासह बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. अनेक व्यावसायिक आमची विक्री होत नाही किंवा आमचे व्यवहार ठप्प पडल्याचे सांगून त्यांनी चौफेर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे कुणीही येथे जाण्यास धजावत नाहीत. न.प. प्रशासनाने त्यांच्याजवळ असलेल्या रेकॉर्ड नुसार दुकानांची मोजणी करून तेवढीच जागा त्यांच्या ताब्यात ठेवून उर्वरित रस्ता रहदारीसाठी व ग्राहकांसाठी मोकळा ठेवावा, जेणेकरून त्यांची विक्री होईल आणि नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल. शहरातील वाढती वाहतूक, लोकसंख्या आणि रस्त्याची बकाल स्थिती असताना चौकाचौकात वाढलेले अतिक्रमण आणि वाहतुक नियमाचे उल्लंघन, वाहनचालकांचा निष्काळजीपणा, पार्किंगची योग्य व्यवस्था आदी समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहेत. पार्किंगची सोय नसल्याने योग्य जागा दिसेल तेथे वाहने उभी ठेवल्या जात आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन अनेक ठिकाणं अपघात स्थळ बनले आहे. बसस्थानकासमोरील एलआयसी कार्यालयासमोर काळीपिवळी दोन्ही बाजूला उभ्या असतात त्यामुळे वसंतनगर येथून येणाऱ्या मुख्य रस्त्यावरून येणारे वाहन दिसत नाही यात अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. साईनगरकडे जाणाºया रस्त्यावर चौकातच हॉटेलसमोर वाहने उभी राहत असल्याने कोंडी निर्माण झाली आहे.शहराच्या रस्तावरील अतिक्रमणाबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहे.यासंदर्भात मुख्याधिकारी यांच्याशी चर्चाही झालेली आहे. सध्या स्थिती लक्षात घेता पहिले लढाई कोरोना सोबत असल्याने संपूर्ण प्रशासन दिलेल्या निर्देशानुसारच काम करीत आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते नियंत्रणात येताच रस्त्यावरील असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल.-प्रा.प्रशांत सवालाखे,नगराध्यक्ष, नगरपालिका आर्वीआर्वी शहरातील वाढते अतिक्रमण लक्षात घेता वाहतुकीसाठी वाढलेले अतिक्रमण अडचणीचे ठरत असल्याचे दिसून येत आहे. वाढलेले अतिक्रमण काढण्याकरिता संयुक्तरीत्या मोहीम राबविल्यास नगरपालिका विभाग, नझूल, तहसील कार्यालय व बांधकाम विभागार्फे काढल्यास आम्ही अतिक्रमण काढण्याकरिता सहकार्य करू.-शिवाजी जाठे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वी.आर्वी शहरातील वेगवेगळ्या मार्गावर झालेल्या अतिक्रमणामुळे लोकांना ये जा करताना होत असलेल्या त्रासाबाबत मुख्याधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अतिक्रमण काढण्याकरिता संबंधितांनी सर्व विभागाचे सहकार्य लागेल. यादृष्टिकोनातून लवकरच चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल व शहरातील गर्दीच्या भागातील अतिक्रमण काढण्यात येईल,-विद्यासागर चव्हाण, तहसीलदार, तहसील कार्यालय आर्वी,