शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

नागरिकांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:44 PM

अल्प प्रमाणात झालेल्या पावसाचा फटका आतापासूनच जाणवायला लागला आहे. रसुलाबाद येथे पाणी टंचाईने डोके वर काढले असून येथील हातपंप केव्हाचेच कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देपाणी पुरवठ्याच्या विहिरीने गाठला तळ

ऑनलाईन लोकमतरसुलाबाद : अल्प प्रमाणात झालेल्या पावसाचा फटका आतापासूनच जाणवायला लागला आहे. रसुलाबाद येथे पाणी टंचाईने डोके वर काढले असून येथील हातपंप केव्हाचेच कोरडे पडले आहेत. यातच गावाला पाणी पुरविण्याकरिता असलेली सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची विहिरीनेही तळ गाठला आहे. यामुळे उन्हाळ्याच्या प्रारंभापासूनच गावात पाण्याकरिता भटकंती सुरू झाल्याचे चित्र आहे.गावात असलेले हातपंप चार महिन्यापूर्वीच आटले. यामुळे संपूर्ण गावाचा डोलारा एकमेव सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवर आला. यातही ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा करणारी विहीर सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा पैसे भरा नळ कनेक्शन घ्या असा नारा दिला. गत तीन महिन्यांपासून नळ जोडण्या वाटपचा सपाटा सुरू केला. आता नळ जोडण्या घेतलेल्यांनी सार्वजनिक नळाचा पाणी पुरवठा बंद करून स्टँड तोडून टाकली. त्यामुळे ज्यांचे घरी नळ नाही अशा नागरिकांवर पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ आली.पाणी पुरवठ्याच्या विहिरीने आता तळ गाठल्याने घरोघरी पोहोचलेल्या नळांना कसे पाणी पोहोचणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पाण्याकरिता मार्चच्या मध्यातच भांडणे सुरू झाली आहे. या पाणी टंचाईवर मात करण्याकरिता गावातील नागरिकांकडे असलेल्या विंधन विहिरी किंवा आसपासच्या परिसरात असलेल्य विहिरी अधिग्रहण करण्याचा अधिकार यापूर्वीच ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या आहे. परंतु असे न काता उलट गावाला दुष्काळ मुक्त दाखविण्याचा प्रयत्न येथे सुरू आहे. बस स्टॉप परिसरातील अलोने यांच्या घराजवळील नळाच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह काढल्याने प्रेशर अभावी या परिसरातील नागरिकांच्या घरी नळाला दहा, पंधरा दिवस लोटूनही पाण्याचा थेंब दिसत नाही.राष्ट्रीय पेयजल अंतर्गत येथे मंजूर नवीन विहीर, पाईपलाईन पाण्याचे टाकीचे काम नुकतेच चालू झाले आहे. अपूर्ण कामामुळे त्या विहिरीचे पाणी सुद्धा गावाला मिळणे शक्य नाही. परंतु ग्रामपंचायत मात्र आम्ही लवकरच हे पाणी गावात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत आहे. तर काही राजकीय कार्यकर्ते स्वार्थासाठी गावातील पाणी प्रश्नाला मार्गी लावण्याकडे लक्ष देण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवित आहेत.गावात निर्माण झालेल्या या पाणी टंचाईचे संबंधीत ग्राम सचिवांना विचारणा केली असता पाईप लाईनचा व्हॉल्व्ह लवकरच बसवून पर्यायी व्यवस्था देण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. वास्तवात तसे काही नसल्याने नागरिकांची भटकंती आहे.नव्या विहिरीतही पाणी नाहीगावात पाणी पुरवठा करण्याकरिता नवीन विहीर आणि नवी योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. मात्र पाईपलाईन टाकण्याचे काम अर्धवट असल्याने या उन्हाळ्यात त्या विहिरीचा लाभ होईल असे चित्र गावात दिसत नाही. यातही येथील लोकव्रतिनिधी गावात पाणी टंचाई नसल्याचे भासवत आहे. वास्तवात गावात पाण्याकरिता नागरिकांत भांडणे होत असल्याचे चित्र आहे. याकडे संबंधीत विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.