शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

घरकुलाच्या अंतिम यादीतून तीन गावांतील नागरिक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST

बैठकीमध्ये प्रपत्र ड घरकुल यादीसंदर्भात २६ ते ३० तारखेपर्यंत ग्रामसभेचे आयोजन करावे. त्यामध्ये पात्र यादी पात्र करून व अपात्र यादीलाही पात्र करून सर्व यादीला ग्रामसभेची मंजुरी घेऊन पंचायत समितीला पाठवावी. त्यानंतर लाभार्थी यांच्या काही तक्रारी असल्यास पंचायत समितीला कराव्या, पंचायत समिती स्तरावर कमिटी गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : गटग्रामपंचायत मोहगावमधील रासा, केसलापार, वानरचुवा येथील कुटुंबीयांचे प्रशासनाच्या व तांत्रिक प्रणालीच्या ढिसाळ कारभारामुळे प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या ड परिपत्रक अंतिम यादीतून नावे वगळण्यात आली असून गरजू गरीब कुटुंबीयांचे हक्काचे घर हिरावून घेण्यात आले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून घरकुल योजनेपासून वंचित झालेल्या कुटुंबीयांचा पूर्ण समावेश करण्याची मागणी मोहगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास नवघरे यांनी पालकमंत्री  आ. रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.२०१६ मध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना मिळण्यासाठी ग्रामपंचायत मोहगावने ग्रामसभेच्या माध्यमातून पाच गावांतील गरजू गरीब कुटुंबीयांच्या जवळपास २०७ कुटुंबांची नावे पाठवली होती. मात्र, यातील मोहगाव व तावी येथील ७२ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या ड परिपत्रक अंतिम यादीस पात्र ठरविण्यात आले आहे. तर, याच ग्रामपंचायतीमध्ये समावेश असलेल्या रासा, केसलापार, वानरचुवा या तीन गावांतील एकाही कुटुंबाला तसेच मोहगाव तावी येथील गरजूंना खोटे कारण दाखवून घरकुल योजनेच्या ड परिपत्रक अंतिम यादीत स्थान देण्यात आले नसून सर्वांना अपात्र ठरविण्यात आले आहे.  येथील नागरिकांची घरे मोठ्या प्रमाणात जुनी मातीची, कुडाची आहेत. रासा, वानरचुवा, केसलापार येथील नागरिकांना घरांची अत्यंत आवश्यकता असताना या तिन्ही गावांना प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या ड परिपत्रक अंतिम यादीतून वगळण्यात आले आहे. या अपात्र ठरवण्यात आलेल्या  लाभार्थ्यांच्या अपात्रतेचे कारण दोन घरे असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडे एक साधं पक्कं घर नाही. त्यांच्याकडे कुठून दोन घरे दाखविण्यात आली आहेत. तर, काहींच्या घरी साधी दुचाकी नसतानासुद्धा व चारचाकी, तीनचाकी वाहने, फ्रीज, टीव्ही हे दाखवण्यात आले आहे. हे सर्वेक्षण कोणी आणि कसे केले व झालेल्या तांत्रिक गडबडीची सखोल चौकशी करून वंचित लाभार्थ्यांना लाभ द्यावा अशी मागणी नवघरे यांनी केली आहे.

घरकुलाचा प्रश्न निघणार निकाली- आर्वी - मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांच्यासोबत घरकुल यादीबाबत सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत यांच्यासह पदाधिकारी व जि. प. कर्मचारी उपस्थित होते. बैठकीमध्ये प्रपत्र ड घरकुल यादीसंदर्भात २६ ते ३० तारखेपर्यंत ग्रामसभेचे आयोजन करावे. त्यामध्ये पात्र यादी पात्र करून व अपात्र यादीलाही पात्र करून सर्व यादीला ग्रामसभेची मंजुरी घेऊन पंचायत समितीला पाठवावी. त्यानंतर लाभार्थी यांच्या काही तक्रारी असल्यास पंचायत समितीला कराव्या, पंचायत समिती स्तरावर कमिटी गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. ती कमिटी प्रत्यक्ष भेटी देऊन पात्र-अपात्र लाभार्थी ठरवतील, असे चर्चेअंती ठरविण्यात आले आहे. 

- आयसीआयसीआय या बँकेचे १५ वा वित्त आयोगाचे खाते काढण्याबाबत चर्चा झाली.  प्रायव्हेट बँकेना आरबीआय जबाबदार राहत नाही. आता आपले खाते राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये आहे. तेच योग्य आहे, आपल्या ग्रामपंचायतचा पैसा सुरक्षित आहे. प्रदेश संघटनेची या विषयावर शासनाशी बोलणी सुरू आहे. महत्त्वाचा प्रश्न असा की जिल्ह्यामध्ये आयसीआयसीआय बँकेच्या तीनच शाखा आहे. त्यामुळे ही बँक आपल्याला प्रत्येक तालुक्यावर कोणत्याही प्रकारची सेवा देऊ शकणार नाही. 

- यासाठी शासनपण जबाबदार राहाणार नाही. असे  सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत यांनी सांगितले. बैठकीला रेणुका कोटबंकर, वर्धा तालुका अध्यक्ष प्रतिभा माऊसकर, वर्धा तालुका सचिव सुजाता पांडे ,आर्वी तालुका अध्यक्ष देवेंद्र बोके, आष्टी तालुकाध्यक्ष अंकिता पावडे ,प्रशांत कठाणे, प्रवीण ठाकरे सरपंच शेंडे सरोज गावंडे ,हिंगणघाट तालुका अध्यक्ष अनिल बुरीले, जिल्हा सचिव गावंडे ,किशोर नवले, जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बोंबले उपस्थित होते. 

  रासा, केसलापार, वानरचुवा येथील कुटुंबीयांनी त्यांना या योजनेतून हक्काचे घर मिळावे, यासाठी अर्ज केले होते आणि आता घर मि‌ेळेल, अशी अपेक्षा बाळगून असतानाच प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या ड परिपत्रक अंतिम यादीत या तिन्ही गावांतील एकाही कुटुंबाचा समावेश नाही तसेच मोहगाव व तावी येथील गरजूंनासुद्धा वगळण्यात आले आहे. यांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.विलास नवघरे, सरपंच मोहगाव 

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना