शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

पाण्यासाठी नागरिकांनी कोंडून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:37 IST

ग्रामपंचायत अंतर्गत नळयोजनेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो; पण गावातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गत काही महिन्यापासून नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत. यामुळे पाणी मिळण्याची मागणी करण्याकरिता ग्रामपंचायतीत गेलेल्या येथील नागरिकांनी पाण्याकरिता स्वत:ला कार्यालयात कोंडून घेतले. सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ माजली.

ठळक मुद्देतळेगाव ग्रामपंचायतीतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत) : ग्रामपंचायत अंतर्गत नळयोजनेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो; पण गावातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गत काही महिन्यापासून नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत. यामुळे पाणी मिळण्याची मागणी करण्याकरिता ग्रामपंचायतीत गेलेल्या येथील नागरिकांनी पाण्याकरिता स्वत:ला कार्यालयात कोंडून घेतले. सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ माजली.गावकऱ्यांना आठवड्यातून एकच दिवस पाणी मिळते. यामुळे या भागातील नागरिक आज सकाळी ग्रामपंचायत सदस्य सुनील मोहेकर यांच्या नेतृत्त्वात एकत्र आले. यावेळी जि.प. सदस्य अंकीता होले याही उपस्थित झाल्या. त्यांनी ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करू असे म्हणताच गावकºयांकडून त्याला विरोध झाला. या समस्येवर तात्पुरता उपाय नको तर ती कायमस्वरूपी मार्गी लावा, असे म्हणत सुनील मोहेकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी ग्रा.प. कार्यालयावर धडक दिली.येथे गावकºयांच्या समस्या ऐकूण घेण्याकरिता एकही पदाधिकारी आला नसल्यामुळे शेवटी नागरिकांनी स्वत:ला ग्रा.प. कार्यालयात कोंडून घेतले. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही बाहेर येणार नाही, अशी भूमिका गावकºयांनी घेतली. पदाधिकाºयांची चौकशी केली असता सरपंच कारंजाला लग्नसमारंभात, पं.स. सदस्य तथा उपसभापती चंद्रपूरला असल्याचे सांगितले. अशावेळी तळेगाव ग्रा.पं. चे सचिव हे सुद्धा सुट्टीवर असल्याचे समोर आले. यामुळे न्याय कोणाला मागावा असा पेच नागरिकांसमोर पडला. सध्या तळेगाव ग्रा.प.ला प्रभारावर असलेले राठोड हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी तुम्हाला मुबलक पाणीपुरवठा करू या आश्वासनावर ग्रामस्थ कुलूप उघडून बाहेर आले.एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे अपव्ययपाण्यासाठी वॉर्ड क्रमांक ६ चे ग्रामस्थ आंदोलन करीत आहे. तर याच गावातील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये सरकारी नळ हा भरदुपारी १२ वाजेपर्यंत धो धो वाहत होता. त्यामुळे येथे नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले.गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन लिकेज आहे. तो लिकेज शोधण्याकरिता गत दोन दिवसापासून आठ मजूर कार्यरत आहे. तो लिकेज सापडताच पाणी पुरवठा हा सुरळीत होईल.- सुनीता जोरे, सरपंचसरपंच व सचिवाला नेहमी वॉर्डाबद्दल सांगतो की पाणीसमस्या आहे. पण माझ कोणीच ऐकत नसून सचिव सरपंच हे म्हणतात की आम्हाला सर्व समजते. अशावेळी न्याय कोणाला मागावा- सुनील मोहेकर, ग्रा.पं. सदस्य वॉर्ड क्र.६पाणी समस्येबाबत सरपंचाना फोन लावला असता तुमच्या पाण्याची व्यवस्था तुम्हीच करा असे म्हटले.- मनीषा गाखरे, त्रिवेणी कालमु, ग्रामस्थ वॉर्ड क्र. ६