शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पाण्यासाठी नागरिकांनी कोंडून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:37 IST

ग्रामपंचायत अंतर्गत नळयोजनेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो; पण गावातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गत काही महिन्यापासून नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत. यामुळे पाणी मिळण्याची मागणी करण्याकरिता ग्रामपंचायतीत गेलेल्या येथील नागरिकांनी पाण्याकरिता स्वत:ला कार्यालयात कोंडून घेतले. सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ माजली.

ठळक मुद्देतळेगाव ग्रामपंचायतीतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत) : ग्रामपंचायत अंतर्गत नळयोजनेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो; पण गावातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गत काही महिन्यापासून नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत. यामुळे पाणी मिळण्याची मागणी करण्याकरिता ग्रामपंचायतीत गेलेल्या येथील नागरिकांनी पाण्याकरिता स्वत:ला कार्यालयात कोंडून घेतले. सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ माजली.गावकऱ्यांना आठवड्यातून एकच दिवस पाणी मिळते. यामुळे या भागातील नागरिक आज सकाळी ग्रामपंचायत सदस्य सुनील मोहेकर यांच्या नेतृत्त्वात एकत्र आले. यावेळी जि.प. सदस्य अंकीता होले याही उपस्थित झाल्या. त्यांनी ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करू असे म्हणताच गावकºयांकडून त्याला विरोध झाला. या समस्येवर तात्पुरता उपाय नको तर ती कायमस्वरूपी मार्गी लावा, असे म्हणत सुनील मोहेकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी ग्रा.प. कार्यालयावर धडक दिली.येथे गावकºयांच्या समस्या ऐकूण घेण्याकरिता एकही पदाधिकारी आला नसल्यामुळे शेवटी नागरिकांनी स्वत:ला ग्रा.प. कार्यालयात कोंडून घेतले. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही बाहेर येणार नाही, अशी भूमिका गावकºयांनी घेतली. पदाधिकाºयांची चौकशी केली असता सरपंच कारंजाला लग्नसमारंभात, पं.स. सदस्य तथा उपसभापती चंद्रपूरला असल्याचे सांगितले. अशावेळी तळेगाव ग्रा.पं. चे सचिव हे सुद्धा सुट्टीवर असल्याचे समोर आले. यामुळे न्याय कोणाला मागावा असा पेच नागरिकांसमोर पडला. सध्या तळेगाव ग्रा.प.ला प्रभारावर असलेले राठोड हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी तुम्हाला मुबलक पाणीपुरवठा करू या आश्वासनावर ग्रामस्थ कुलूप उघडून बाहेर आले.एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे अपव्ययपाण्यासाठी वॉर्ड क्रमांक ६ चे ग्रामस्थ आंदोलन करीत आहे. तर याच गावातील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये सरकारी नळ हा भरदुपारी १२ वाजेपर्यंत धो धो वाहत होता. त्यामुळे येथे नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले.गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन लिकेज आहे. तो लिकेज शोधण्याकरिता गत दोन दिवसापासून आठ मजूर कार्यरत आहे. तो लिकेज सापडताच पाणी पुरवठा हा सुरळीत होईल.- सुनीता जोरे, सरपंचसरपंच व सचिवाला नेहमी वॉर्डाबद्दल सांगतो की पाणीसमस्या आहे. पण माझ कोणीच ऐकत नसून सचिव सरपंच हे म्हणतात की आम्हाला सर्व समजते. अशावेळी न्याय कोणाला मागावा- सुनील मोहेकर, ग्रा.पं. सदस्य वॉर्ड क्र.६पाणी समस्येबाबत सरपंचाना फोन लावला असता तुमच्या पाण्याची व्यवस्था तुम्हीच करा असे म्हटले.- मनीषा गाखरे, त्रिवेणी कालमु, ग्रामस्थ वॉर्ड क्र. ६