शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शिबिरातून नागरिकांचे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:35 IST

पूर्वी शेतकऱ्यांना सातबारासाठी शासनदरबारी चकरा माराव्या लागत होत्या. परंतु आता शासनाने समाधान शिबिराच्या माध्यमातून राज्यातील दीन, दलित, गरीब, शेतकरी, मजूर अशा प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजनेची माहिती होऊन योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

ठळक मुद्देअतुल सावे : एकाच दिवशी विविध योजनांचे दिले दाखले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पूर्वी शेतकऱ्यांना सातबारासाठी शासनदरबारी चकरा माराव्या लागत होत्या. परंतु आता शासनाने समाधान शिबिराच्या माध्यमातून राज्यातील दीन, दलित, गरीब, शेतकरी, मजूर अशा प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजनेची माहिती होऊन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. नागरिकांना एकाच दिवशी विविध योजनांचे दाखले व लाभ देण्यात येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत होते, असे प्रतिपादन उद्योग, खनीकर्म व अल्पसंख्याक राज्यमंत्री अतुल सावे यांनी केले.स्थानिक विकास भवनात जिल्हा प्रशासनाच्यावतीने समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर, नियोजन समिती सदस्य जयंत कावळे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिपसिह ठाकूर, जि.प. सभापती जयश्री गफाट, सोनाली कलोडे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष मनोज तरारे, हरीश पारिसे, प्रशांत बुरले, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार प्रीती डुडुलकर, महेद्र सोनवने, जि. प. सदस्य नुतन राऊत यांची उपस्थिती होती. देशात महाराष्ट्र उद्योग निर्मिती मध्ये तिसºया क्रमांकावर असून राज्यात गेल्या साडेचार वर्षात १९ नवीन उद्योग निर्माण करण्यात आले आहे. या उद्योगामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यशासनाने अल्पसंख्यांकाच्या विकासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयाची तरतुद केली असून अल्पसंख्याकांना मोफत शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे यावेळी सावे म्हणाले. प्रधानमंत्री मोदी यांनी आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना आरोग्य सेवेचा मोफत लाभ मिळावा यासाठी आयुष्यमान भारत योजना सुरु केली आहे. देशातील आतापर्यंत १० कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर बोलतांना म्हणाले की, दरवर्षी ३० जुलै रोजी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्त वर्धा मतदार संघात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना विविध योजनेची माहिती देऊन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत १५ शेतक ऱ्यांच्या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करण्यात आल्या आहे. वर्धा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना विविध योजनेचा २५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असल्याचे ते म्हणाले. तसेच ११८ लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. वर्धा शहरातील अल्पसंख्याक वस्ती असलेल्या जाकिर हुसेन कॉलनीतील नागरिकांची ४० वषार्पासून प्रलंबित असलेली क प्रत ची मागणी पूर्ण करण्यात आल्याचेही यावेळी आमदार भोयर यांनी सांगितले.यावेळी कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर, जिल्हा परिषदच्या सभापती जयश्री गफाट यांनीही मार्गदर्शन केले.आज झालेल्या समाधान शिबिरात जात प्रमाणपत्र, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, आपसी वाटणी, रस्त्याचे परवाणगी पत्र, आखिव पत्रिका, राष्ट्रीय कुंटूब लाभ योजना, फळबाग लागवड, राजश्री शाहू महाराज योजनेचा लाभ व प्रमाणपत्राचे ३५ हजार लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे हस्ते प्राथमिक स्वरुपात १५ लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उत्तम दिघे यांनी केले तर आभार तहसिलदार प्रीती डुडुलकर यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक, विविध योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.