शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चिटफंड कंपनीतील गुंतवणूकदार आंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:23 IST

चिटफंड कंपन्याच्या गुंतवणूकदारांची विशेष बैठक स्थानिक महावीर बाल उद्यान परिसरात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी २६ फेब्रुवारीला मुंबई येथील सेबी भवनावर मोर्चा नेण्याचे निश्चित करण्यात आले.

ठळक मुद्देचिटफंड कंपन्याच्या गुंतवणूकदारांची विशेष बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चिटफंड कंपन्याच्या गुंतवणूकदारांची विशेष बैठक स्थानिक महावीर बाल उद्यान परिसरात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी २६ फेब्रुवारीला मुंबई येथील सेबी भवनावर मोर्चा नेण्याचे निश्चित करण्यात आले. बैठकीचे आयोजन जनलोक प्रतिष्ठान संघटना कृती समिती नागपूर, वर्धा, सेलू, हिंंगणघाट यांच्यावतीने करण्यात आले होते.सेबी या सरकारी कंपनीने देशातील लाखो कंपन्यांना अडचणीत आणून त्यांना बंद पाडले. त्यामुळे करोडो गरीब सामान्य जनतेला त्याचा मोठा फटका बसला आहे. कंपन्यामध्ये पूर्णवेळ काम करणारे सध्या बेरोजगार झाले असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. करोडो जनतेचे मोलमजुरीचे पैसे परत करण्यास सेबी टाळाटाळ करीत आहे. आजपावेतो लाखो कंपन्या बंद पाडण्यात आल्या आहेत. त्यांच्या संपत्ती हस्तगत करण्यात आली; पण गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाही, असे बैठकीदरम्यान सांगण्यात आले. गेल्या चार वर्षापासून पर्ल्स पीएसीएल, पॅन कार्ड क्लब, मैत्र्येय आदी कंपन्याच्या गुंतवणुकदारांनी जिल्हाधिकारी तसेच खासदार, आमदार यांना निवेदन देत योग्य कार्यवाही करण्यासाठी विनंती केली. मात्र, अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे २६ फेब्रुवारी २०१८ ला सेबी भवन मुंबई येथे देशव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले. यावेळी ज.प्र. संघटना नागपूर कृती समितीचे उपाध्यक्ष प्रशांत रामटेके, सचिव संतुलाल भारती, ढोमणे, सुनील सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केले.