शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

वर्ध्यात चिन्ना बारींनी फडकावला होता तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST

लोकांनी अनेक राज्यात पर्यायी व्यवस्था स्थापून अनेक गाव व शहरामध्ये पर्यायी व्यवस्था निर्माण झाली. वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे पोलीस ठाणे व शासकीय इमारतींवर सत्ता काबीज केली. देशातील अनेक जिल्ह्यात सरकारी इमारती व जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंगा चढवून ध्वजारोहण करण्यात आले.

ठळक मुद्देऑगस्ट क्रांतिदिन विशेष । वयोवृद्ध नामदेवरावांनी जागविल्या स्मृती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात स्वातंत्र्यलढ्याचे आंदोलन चिघळले असतानाच वर्ध्यात चिन्ना बारी यांनी आपल्या सवंगड्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर चढत तिरंगा फडकावला. ९ ऑगस्ट रोजी वर्ध्यात ही अनोखी क्रांती घडली. या क्रांतिदिनाच्या स्मृतींना ज्येष्ठ नागरिक नामदेवराव गुजरकर यांनी उजाळा दिला.महात्मा गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ मध्ये ब्रिटिशांना भारतातून चालते व्हा, असे खडसावत देशवासीयांना करा किंवा मरा, असे सांगितले. मात्र, ब्रिटिशांनी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू व इतर ज्येष्ठ नेत्यांना कारागृहात टाकले. दुसरी फळी जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, सुचेता कृपलानी, अरुणा असफली, उषा मेहता आदी नेत्यांनी भूमिगत होऊन गावागावांत आणि देशाच्या कानाकोपऱ्यात करा किंवा मरा या मोहिमेद्वारे जागृती केली. ९ ऑगस्ट १९४२ ला पहाटेपासूनच विद्यार्थी, युवक, महिला, व्यापारी, कामगार आदी सर्वांनी रेल्वेगाड्या बंद पाडल्या. टेलिग्राफ टॉवर पाडण्यात आले. प्रक्षुब्ध लोकांनी बँक, ट्रेझरी, पोलीस चौक्यावर धावा बोलून ताब्यात घेतल्या. ब्रिटिश अधिकाऱ्यांची कार्यालये, त्यांची संपत्तीही हस्तगत केली. सातत आत-आठ दिवस सेशात ही मोहीम सुरू होती. ब्रिटिशांनी पोलीस व सैन्याचा वापर करून लाखो लोकांना कारागृहात डांबले. ऑपरेशन बोल्टनुसार भारतात सर्व ठिकाणी गोळीबार केला. यात १० हजार सैनिक शहीद झाले. संपूर्ण देशातील वातावरण विस्कळीत झाले.लोकांनी अनेक राज्यात पर्यायी व्यवस्था स्थापून अनेक गाव व शहरामध्ये पर्यायी व्यवस्था निर्माण झाली. वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे पोलीस ठाणे व शासकीय इमारतींवर सत्ता काबीज केली. देशातील अनेक जिल्ह्यात सरकारी इमारती व जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंगा चढवून ध्वजारोहण करण्यात आले. वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस चिन्ना बारी व त्याच्या तीन-चार सवंगड्यांनी सैन्य आणि पोलिसांची नजर चुकवून लोखंडी खांबावर चढत तिरंगा फडकाविला, ‘भारत माता की जय’ म्हणत हे सर्व जण पसार झाले. या युवकांच्या आवाजाने सैनिकांनी बाहेर येऊन पाहिले तेव्हा तिरंगा झेंडा फडकलेला दिसला. यावरूनच बाजारपेठेकडे जाणाºया एका मार्गाचे ‘चिण्णा बारी मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. वयोवृद्ध नामदेवराव गुजरकर यांनी ‘लोकमत’कडे क्रांतिदिनाच्या या स्मृतींना उजाळा दिला.