शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

आगीत तुरीच्या गंजीचा कोळसा

By admin | Updated: February 26, 2017 00:51 IST

येथील शेतकऱ्याने तुरीची कापणी करून त्या वाळविण्याकरिता एक गंजी करून शेतात ठेवली होती.

चार लाखांचे नुकसान : आगीचे कारण गुलदस्त्यात विजयगोपाल : येथील शेतकऱ्याने तुरीची कापणी करून त्या वाळविण्याकरिता एक गंजी करून शेतात ठेवली होती. या गंजीला शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वाळण्याकरिता ठेवलेल्या तुरीचा कोळसा झाला. या आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. यात शेतकऱ्याचे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले. येथील शेतकरी प्रशांत मधुकर नानोटी यांची विजयगोपाल येथे शेती आहे. त्यांच्या शेतीचे दोन भाग असून यात एक पाच एकर आणि दुसरा १० एकर असे दोन पट्टे आहे. याव्यतिरिक्त काही जमीन ते दरवर्षी मक्त्याने करतात. या जमिनीत त्यांनी यंदा कपाशी व तूर असे पीक घेतले होते. त्यांनी शेतातील संपूर्ण तूर कापल्यानंतर गावाजवळील एका शेतात दोन्ही शेतातील कापलेल्या तुरीची गंजी मारून ठेवली. या गंजीत सुमारे ९०० पेट्या असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या ९०० पेट्यांतून त्यांना ६० ते ७० क्विंटल तुरीचे उत्पादन होईल अशी अपेक्षा होती. पण आज दुपारी त्यांच्या शेतात असलेल्या तुरीच्या गंजीला आग लागली. याची माहिती मिळण्यापूर्वी गंजीतील तुरीचे पीक जळून खाक झाले. यात नानोटी यांना सुमारे ४ लाखांचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वर्षभर कष्टकरुन हाती आलेले पीक क्षणात नष्ट झाल्याने आधिच संकटात असलेला शेतकरी अडचणित सापडला आहे. या नुकसानीची शासनाकडून मदतीची मागणी होत आहे. तलाठी तामगाडगे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अहवाल देवळी तहसीलदारांकडे पाठविला आहे.(वार्ताहर)