शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

आगीत तुरीच्या गंजीचा कोळसा

By admin | Updated: February 26, 2017 00:51 IST

येथील शेतकऱ्याने तुरीची कापणी करून त्या वाळविण्याकरिता एक गंजी करून शेतात ठेवली होती.

चार लाखांचे नुकसान : आगीचे कारण गुलदस्त्यात विजयगोपाल : येथील शेतकऱ्याने तुरीची कापणी करून त्या वाळविण्याकरिता एक गंजी करून शेतात ठेवली होती. या गंजीला शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वाळण्याकरिता ठेवलेल्या तुरीचा कोळसा झाला. या आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. यात शेतकऱ्याचे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले. येथील शेतकरी प्रशांत मधुकर नानोटी यांची विजयगोपाल येथे शेती आहे. त्यांच्या शेतीचे दोन भाग असून यात एक पाच एकर आणि दुसरा १० एकर असे दोन पट्टे आहे. याव्यतिरिक्त काही जमीन ते दरवर्षी मक्त्याने करतात. या जमिनीत त्यांनी यंदा कपाशी व तूर असे पीक घेतले होते. त्यांनी शेतातील संपूर्ण तूर कापल्यानंतर गावाजवळील एका शेतात दोन्ही शेतातील कापलेल्या तुरीची गंजी मारून ठेवली. या गंजीत सुमारे ९०० पेट्या असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या ९०० पेट्यांतून त्यांना ६० ते ७० क्विंटल तुरीचे उत्पादन होईल अशी अपेक्षा होती. पण आज दुपारी त्यांच्या शेतात असलेल्या तुरीच्या गंजीला आग लागली. याची माहिती मिळण्यापूर्वी गंजीतील तुरीचे पीक जळून खाक झाले. यात नानोटी यांना सुमारे ४ लाखांचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वर्षभर कष्टकरुन हाती आलेले पीक क्षणात नष्ट झाल्याने आधिच संकटात असलेला शेतकरी अडचणित सापडला आहे. या नुकसानीची शासनाकडून मदतीची मागणी होत आहे. तलाठी तामगाडगे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अहवाल देवळी तहसीलदारांकडे पाठविला आहे.(वार्ताहर)