शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

१२ व १३ डिसेंबरला वर्ध्यात बाल साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:27 IST

विदर्भ साहित्य संघाचे ६ वे बाल साहित्य संमेलन १२ व १३ डिसेंबरला सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविदर्भ साहित्य संघ व एसओएसचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघ शाखा वर्धा आणि स्कूल आॅफ स्कॉलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ साहित्य संघाचे ६ वे बाल साहित्य संमेलन १२ व १३ डिसेंबरला सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या परिसराला मॉ-बापू साहित्यनगरी असे नाव देण्यात आले असून येथील आचार्य विनोबा भावे विचारपीठावर बालकांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष आभा मेघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम चित्रकार चंद्रकांत चन्ने तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध नाट्य व सिनेकलावंत चिन्मय मांडलेकर यांची उपस्थिती राहणार आहे. गुरुवार १२ डिसेंबरला सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात होणार आहे. शहरातील लोक विद्यालयातून निघणाऱ्या या दिंडीमध्ये शालेय विद्यार्थी व साहित्यिक सहभागी होणार असून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ समारोप होईल. त्यानंतर सावंगी येथील मॉ-बापू साहित्यनगरीमध्ये सकाळी ११ वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. या संमेलनामध्ये आयोजित सर्व कार्यक्रमांना महात्मा गांधीजींवर आधारीत थिम देण्यात आल्याने बाल कलाकरांच्या उपस्थितीत बापूंचा जीवनपट उलगडला जाणार आहे. विदर्भातील विद्यार्थी या संमेलनात सहभागी होणार असल्याने वर्धेकरांना दोन दिवस बाल साहित्यिकांच्या सहवास लाभणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. सावंगी येथे आयोजित पत्रकार परिषदेला संमेलनाच्या निमंत्रक शुभदा फडणवीस, विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस विलास मानेकर, शाखा समन्वय प्रदीप दाते, वर्धा शाखेचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर व स्कूल आॅफ स्कॉलरच्या प्राचार्य आरती चौबे व मराठी विभाग प्रमुख अमित इंगोले उपस्थित होते.बालकांच्या साहित्यासोबतच समस्याही जाणणारवाचन चळवळ वृद्धींगत करण्यासोबतच साहित्याची ओढ व जाण निर्माण करणे हा या संमेलनाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या साहित्यासोबतच त्यांच्या समस्यांही जाणून घेण्याचा प्रयत्न या संमेलनाच्या माध्यमातून केला जाणार आहे..संमेलनामध्ये उद्घाटनानंतर जिल्ह्यातील प्रतिभावंताचा सन्मान केल्यानंतर दुपारी १२.३० वाजता सना पंडीत चिन्मय मांडलेकर यांची प्रकट मुलाखत घेतील. दुपारी २ वाजता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत नाटीका सादर होईल तर दुपारी ३.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.१३ डिसेंबरला सकाळी १० वाजता कविसंमेलन, ११.३० वाजता बालसाहित्यिकांचे अभिजात कथावाचन होईल. दुपारी २ वाजता अभिरुप न्यायालय या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक व शिक्षक आपापली बाजू मांडून न्यायाधीश न्याय देतील. न्यायाधीशाची भूमिका ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीती देव बजावतील.संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत चन्ने तर प्रमुख अतिथी म्हणून युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक समील सरदार मुल्ला (कोल्हापूर) उपस्थित राहतील. या संमेलनाला विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :literatureसाहित्य