शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

... अन् १० मिनिटांआधीच थांबविला बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 14:44 IST

वर्धा जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबवून गावकऱ्यांसह दोघांच्याही नातेवाइकांना समज दिली.

ठळक मुद्देजिल्हा बाल संरक्षण कक्षाची कारवाई नातेवाईकांसह गावकऱ्यांना दिली समज

 लोकमत न्यूज नेटवर्क  

वर्धा : जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह अमरावती जिल्ह्यातील तरोडा गावात पार पडणार होता. मात्र, विवाहाच्या अवघ्या १० मिनिटांआधीच जिल्हा बाल संरक्षण कक्षाने विवाहस्थळी धाव घेत बालविवाह थांबवून गावकऱ्यांसह दोघांच्याही नातेवाइकांना समज दिली.

प्राप्त माहितीनुसार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांना मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील तराेडा गावात होत असल्याची माहिती अमरावतीचे बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी दिली. त्यांनी तत्काळ दखल घेऊन चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होऊन तेथील पोलीस निरीक्षकांना घटनेचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत विवाहस्थळ गाठले. यादरम्यान तेथे शुभमंगल गाथा सुरू होती. त्याचवेळी जिल्हा संरक्षण अधिकाऱ्यांनी विवाह थांबविला. यावेळी गावातील सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविकांना बोलाविण्यात आले. त्यांना सदर विवाह हा बालविवाह असल्याने वधू, वर, त्यांचे नातेवाईक, गावकरी यांची समजूत काढली.

सदर विवाहाला स्थगिती देऊन वधू, वर, नातेवाईक यांना बाल कल्याण समितीसमोर हजर करणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली. त्यांना बाल कल्याण समिती, अमरावती यांच्यासमोर हजर करण्यात आले. बाल कल्याण समिती सदस्य मीना दंढले, अंजली घुलक्षे यांच्यासमक्ष वधू, वर , नातेवाईक, सरपंच, अंगणवाडी सेविका यांचा जबाब हमीपत्र लिहून घेण्यात आले. बालिकेला दर १५ दिवसांनी बाल कल्याण समितीसमक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.

अमरावती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांच्या मार्गदर्शनात अजय डबले, मनीषा फुलाडी, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. अल्पवयीन बलिकेचा बालविवाह थांबविण्यात आला असून, महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या आदेशान्वये बाल विवाह थांबविण्याची कार्यवाही करण्यात आली.

टॅग्स :marriageलग्न