शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

‘समृद्धी’च्या पुलाखाली चिखल विरूळ-रसुलाबाद मार्ग झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 5:00 AM

रसुलाबाद ते विरुळ रस्त्यावर मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात आली. यामुळे नागरिकांना पुलाखालील बोगद्यातून विरुळ आणि रसुलाबाद येथे जावे लागते. मात्र, पुलाखाली पावसाचे पाणी साचून चिखल साचल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. चिखल असल्यामुळे नागरिकांना वाहने बंद करून हातात धरुन न्यावी लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : रसुलाबाद, विरुळ रस्त्याच्या मधोमध समृद्धी महामार्ग गेल्याने पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, पावसामुळे पुलाखाली चिखल साचला असल्याने विरुळ ते रसुलाबाद हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.रसुलाबाद ते विरुळ रस्त्यावर मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात आली. यामुळे नागरिकांना पुलाखालील बोगद्यातून विरुळ आणि रसुलाबाद येथे जावे लागते. मात्र, पुलाखाली पावसाचे पाणी साचून चिखल साचल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. चिखल असल्यामुळे नागरिकांना वाहने बंद करून हातात धरुन न्यावी लागत आहेत. शेतात बैलबंडी नेण्यासाठीदेखील शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याने पुलाखालील रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा, अशी मागणी नागरिकांसह शेतकऱ्यांतून केली जात आहे.

नाल्याच्या पुरामुळे टेंभरी - परसोडीचा संपर्क अडचणीत- विरूळ (आकाजी) : मुसळधार पावसामुळे परसोडी - टेंभरी गावाच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या पुलाला पूर आल्याने काही काळ दोन्ही गावांचा संपर्क शुक्रवारी तुटल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेतातील मजूर, नागरिक, विद्यार्थी यांना पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली. पावसाळ्यात नेहमीच मुसळधार पावसामुळे या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. संबंधित प्रशासनाला येथील ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊन या रस्त्यावरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी केली. परंतु, ग्रामस्थांच्या या मागणीला संबंधित विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आली. या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी येथील सरपंच सुरेखा पंढरे यांनी केली आहे.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग