शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पेन्शनरचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:13 IST

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या शिष्टमंडळाचे जुन्या पेंशनच्या संदर्भातील निवेदन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारून १६ आक्टोबरला वित्त विभागासोबत बैठक घेऊन चर्चा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देवित्त विभागासोबत बैठक : सर्वांचे लक्ष चर्चेतील निर्णयाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या शिष्टमंडळाचे जुन्या पेंशनच्या संदर्भातील निवेदन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारून १६ आक्टोबरला वित्त विभागासोबत बैठक घेऊन चर्चा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले असून आता या पेन्शनचे भवितव्य सदर बैठकीतील चर्चेअंती ठरणार असल्याने सर्वांच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.जुन्या पेंशनच्या मागणीसाठी व राज्यातील मृतक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना केंद्र व इतर राज्याच्या धर्तीवर जुनी कुटुंब निवृत्तीवेतन योजना लागू करावी यासाठी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ ला आणि नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनात राज्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने शिवनेरी ते मंत्रालय अशी पेंशन दिंडीचे नियोजन केले होते; पण ऐनवेळी पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यानंतर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व विक्रम काळे, बाळाराम पाटील, नागो गाणार, दत्रातय सावंत, श्रीकांत देशपांडे, कपील पाटील यांनी केले. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आंदोलन मंडपाला शशिकांत शिंदे, नारायण पाटील, सिद्धराम म्हेत्रे, मनीषा कायंदे या आमदारसह सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन आपणही कर्मचाऱ्यांच्या बाजूने असल्याचे सांगत त्यांची बाजून जाणून घेतली.मुंबई येथे पार पडलेल्या सदर आंदोलनात संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे, उपाध्यक्ष हेमंत पारधी, सचिव प्रमोद खोडे, कार्यध्यक्ष कृष्णा तिमासे, मनोज पालिवाल, आशीष बोटरे, सतीश धारपुरे, अमर गोरे, सुरज वैद्य, सचिन शंभरकर, नाना निमकर, पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने सेवानिवृत्त पेंशनर सहभागी झाले होते. १६ रोजी होणाऱ्या बैठकीकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.१६ आक्टोबरला सरकारने दिलेले चर्चेचे निमंत्रण हे आंदोलनाचे यशच आहे. या बैठकीतून जर संघटन आणि कर्मचारी हित जोपासणारा निर्णय न झाल्यास पुढे आंदोलनाचे स्वरूप तीव्र करू. आणि त्याची सर्वस्वी जाबदारी राज्य सरकारची राहील.- सुशील गायकवाड, राज्य समन्वयक, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन.