शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

पेन्शनरचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:13 IST

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या शिष्टमंडळाचे जुन्या पेंशनच्या संदर्भातील निवेदन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारून १६ आक्टोबरला वित्त विभागासोबत बैठक घेऊन चर्चा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देवित्त विभागासोबत बैठक : सर्वांचे लक्ष चर्चेतील निर्णयाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या शिष्टमंडळाचे जुन्या पेंशनच्या संदर्भातील निवेदन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारून १६ आक्टोबरला वित्त विभागासोबत बैठक घेऊन चर्चा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले असून आता या पेन्शनचे भवितव्य सदर बैठकीतील चर्चेअंती ठरणार असल्याने सर्वांच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.जुन्या पेंशनच्या मागणीसाठी व राज्यातील मृतक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना केंद्र व इतर राज्याच्या धर्तीवर जुनी कुटुंब निवृत्तीवेतन योजना लागू करावी यासाठी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ ला आणि नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनात राज्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने शिवनेरी ते मंत्रालय अशी पेंशन दिंडीचे नियोजन केले होते; पण ऐनवेळी पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यानंतर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व विक्रम काळे, बाळाराम पाटील, नागो गाणार, दत्रातय सावंत, श्रीकांत देशपांडे, कपील पाटील यांनी केले. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आंदोलन मंडपाला शशिकांत शिंदे, नारायण पाटील, सिद्धराम म्हेत्रे, मनीषा कायंदे या आमदारसह सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन आपणही कर्मचाऱ्यांच्या बाजूने असल्याचे सांगत त्यांची बाजून जाणून घेतली.मुंबई येथे पार पडलेल्या सदर आंदोलनात संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे, उपाध्यक्ष हेमंत पारधी, सचिव प्रमोद खोडे, कार्यध्यक्ष कृष्णा तिमासे, मनोज पालिवाल, आशीष बोटरे, सतीश धारपुरे, अमर गोरे, सुरज वैद्य, सचिन शंभरकर, नाना निमकर, पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने सेवानिवृत्त पेंशनर सहभागी झाले होते. १६ रोजी होणाऱ्या बैठकीकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.१६ आक्टोबरला सरकारने दिलेले चर्चेचे निमंत्रण हे आंदोलनाचे यशच आहे. या बैठकीतून जर संघटन आणि कर्मचारी हित जोपासणारा निर्णय न झाल्यास पुढे आंदोलनाचे स्वरूप तीव्र करू. आणि त्याची सर्वस्वी जाबदारी राज्य सरकारची राहील.- सुशील गायकवाड, राज्य समन्वयक, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन.