शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

जप्ती येताच मिळाला धनादेश

By admin | Updated: November 8, 2014 01:35 IST

तलावाकरिता जमीन अधिग्रहीत केली. यावेळी मिळालेला मोबदला अत्यल्प असल्याचे कारण काढत शेतकऱ्याने वाढीव मोबदल्याकरिता...

वर्धा : तलावाकरिता जमीन अधिग्रहीत केली. यावेळी मिळालेला मोबदला अत्यल्प असल्याचे कारण काढत शेतकऱ्याने वाढीव मोबदल्याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली. यावर दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांनी दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्याला ८९ हजार ९३४ रुपये देण्याचा निकाल दिला. तरीही येथील विशेष भू-अर्जन विभागाच्यावतीने शेतकऱ्याला रक्कम मिळाली नाही. यामुळे सदर शेतकऱ्याने न्यायालयातून या कार्यालयावर शुक्रवारी जप्ती आणली. जप्तीच्या कारवाईकरिता शेतकरी व न्यायालयाचा बेलीफ कार्यालयात येताच सदर शेतकऱ्याला धनादेश देण्यात आला. यामुळे भू-अर्जन विभागावरील जप्तीची नामुष्की तुर्तास टळली. याबाबत थोडक्यात वृत्त असे की, आर्वी तालुक्यातील टेंभरी (परसोडी) येथे तलावाचे बांधकाम करण्यात आले. या तलावाकरिता येथील शेतकरी पुंडलिक साखरकर यांची पाच एकर शेती अधिग्रहीत करण्यात आली. जमीन अधिग्रहीत करताना जमिनीला एकरी १४ हजार रुपयांचा देण्यात आला. मात्र मिळालेला दर अत्यल्प असल्याचा आरोप करीत शेतकऱ्याने वाढीव दराकरिता न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत साखरकर यांनी एकरी ५० हजार रुपये दर देण्याची मागणी केली. या याचिकेवर निर्णय देत न्यायालयाने शेतकऱ्याला वाढीव दर देण्याचा निकाल दिला. न्यायालयाच्या काही नियमानुसार साखरकर यांची दोन प्रकरणे दाखल झाली. यात पहिल्या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला. निकाल देण्यास दोन वर्षांवा कालावधी झाला तरी भू-अर्जन विभागाच्यावतीने शेतकऱ्याला वाढीव रक्कम देण्यात आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने अखेर न्यायालयातून जप्ती आणली. जप्ती घेवून शेतकरी विशेष भू-अर्जन कार्यालयात येताच अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. न्यायालयाचा बेलिफ कार्यालयात आला त्यावेळी येथील अधिकारी एस. बी. जाधव यांनी वरिष्ठांशी चर्चा करून सदर शेतकऱ्याला आदेशात असलेल्या रकमेचा धनादेश निर्णय घेतला. सदर शेतकऱ्याला धनादेश देण्याच्या प्रक्रीयेला दुपारपासून सुरुवात झाली. यावेळी न्यायालयाचे बेलिफ सुनील मानवटकर यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)