शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जप्ती येताच मिळाला धनादेश

By admin | Updated: November 8, 2014 01:35 IST

तलावाकरिता जमीन अधिग्रहीत केली. यावेळी मिळालेला मोबदला अत्यल्प असल्याचे कारण काढत शेतकऱ्याने वाढीव मोबदल्याकरिता...

वर्धा : तलावाकरिता जमीन अधिग्रहीत केली. यावेळी मिळालेला मोबदला अत्यल्प असल्याचे कारण काढत शेतकऱ्याने वाढीव मोबदल्याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली. यावर दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांनी दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्याला ८९ हजार ९३४ रुपये देण्याचा निकाल दिला. तरीही येथील विशेष भू-अर्जन विभागाच्यावतीने शेतकऱ्याला रक्कम मिळाली नाही. यामुळे सदर शेतकऱ्याने न्यायालयातून या कार्यालयावर शुक्रवारी जप्ती आणली. जप्तीच्या कारवाईकरिता शेतकरी व न्यायालयाचा बेलीफ कार्यालयात येताच सदर शेतकऱ्याला धनादेश देण्यात आला. यामुळे भू-अर्जन विभागावरील जप्तीची नामुष्की तुर्तास टळली. याबाबत थोडक्यात वृत्त असे की, आर्वी तालुक्यातील टेंभरी (परसोडी) येथे तलावाचे बांधकाम करण्यात आले. या तलावाकरिता येथील शेतकरी पुंडलिक साखरकर यांची पाच एकर शेती अधिग्रहीत करण्यात आली. जमीन अधिग्रहीत करताना जमिनीला एकरी १४ हजार रुपयांचा देण्यात आला. मात्र मिळालेला दर अत्यल्प असल्याचा आरोप करीत शेतकऱ्याने वाढीव दराकरिता न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत साखरकर यांनी एकरी ५० हजार रुपये दर देण्याची मागणी केली. या याचिकेवर निर्णय देत न्यायालयाने शेतकऱ्याला वाढीव दर देण्याचा निकाल दिला. न्यायालयाच्या काही नियमानुसार साखरकर यांची दोन प्रकरणे दाखल झाली. यात पहिल्या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला. निकाल देण्यास दोन वर्षांवा कालावधी झाला तरी भू-अर्जन विभागाच्यावतीने शेतकऱ्याला वाढीव रक्कम देण्यात आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने अखेर न्यायालयातून जप्ती आणली. जप्ती घेवून शेतकरी विशेष भू-अर्जन कार्यालयात येताच अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. न्यायालयाचा बेलिफ कार्यालयात आला त्यावेळी येथील अधिकारी एस. बी. जाधव यांनी वरिष्ठांशी चर्चा करून सदर शेतकऱ्याला आदेशात असलेल्या रकमेचा धनादेश निर्णय घेतला. सदर शेतकऱ्याला धनादेश देण्याच्या प्रक्रीयेला दुपारपासून सुरुवात झाली. यावेळी न्यायालयाचे बेलिफ सुनील मानवटकर यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)