शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी उपविभागीय कार्यालयाचा अनागोंदी कारभार

By admin | Updated: February 2, 2016 02:01 IST

रशासकीय सेवेत महसूल विभाग हा महत्त्वाचा घटक आहे. शासन व्यवस्था व नागरिक यांच्यातील विकासाचा दुवा म्हणून तो ओळखला जातो; ..

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे होतेय दुर्लक्षआर्वी : प्रशासकीय सेवेत महसूल विभाग हा महत्त्वाचा घटक आहे. शासन व्यवस्था व नागरिक यांच्यातील विकासाचा दुवा म्हणून तो ओळखला जातो; पण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या ढिसाळ व अनागोंदी कारभारामुळे परिसरातील नागरिकांच्या समस्या व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी त्यात भर पडत असल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतर करणारी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. यात कारंजा तालुक्यातील २५ व आष्टी तालुक्यातील २६ प्रकरणांचा समावेश आहे. सोबतच जातीची प्रमाणपत्रे व उन्नत तथा प्रगत गटात मोडणारे नॉन क्रिमीलेयरचीही प्रकरणे विभागाच्या उदासिन धोरणामुळे प्रलंबित आहेत. परिणामी, आर्वी तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांची परवड होत आहे. आर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा कारभार रामभरोसे व कासवगतीने सुरू आहे. सदर विभागातील १८४ महसूल प्रकरणे कार्यवाहीस्तव सादर आहे. नवीन व जुने, असे २६१ प्रकरणे एसडीओ कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे खितपत आहेत. यामुळे हा विभाग दलालांच्या मगर मिठीत असल्याची चर्चा आहे. यात कर्मचाऱ्यांचे चांगभले होत असले तरी सामान्यांना न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसते. शासन जनतेच्या सेवेसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देत असताना येथे त्या सुविधांचा फज्जा उडत असल्याचे दिसते. एसडीओ कार्यालयात सामान्य नागरिकांना दररोज विविध कामांसाठी चकरा माराव्या लागतात; पण कामेच होत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)