शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

आर्वी उपविभागीय कार्यालयाचा अनागोंदी कारभार

By admin | Updated: February 2, 2016 02:01 IST

रशासकीय सेवेत महसूल विभाग हा महत्त्वाचा घटक आहे. शासन व्यवस्था व नागरिक यांच्यातील विकासाचा दुवा म्हणून तो ओळखला जातो; ..

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे होतेय दुर्लक्षआर्वी : प्रशासकीय सेवेत महसूल विभाग हा महत्त्वाचा घटक आहे. शासन व्यवस्था व नागरिक यांच्यातील विकासाचा दुवा म्हणून तो ओळखला जातो; पण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या ढिसाळ व अनागोंदी कारभारामुळे परिसरातील नागरिकांच्या समस्या व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी त्यात भर पडत असल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतर करणारी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. यात कारंजा तालुक्यातील २५ व आष्टी तालुक्यातील २६ प्रकरणांचा समावेश आहे. सोबतच जातीची प्रमाणपत्रे व उन्नत तथा प्रगत गटात मोडणारे नॉन क्रिमीलेयरचीही प्रकरणे विभागाच्या उदासिन धोरणामुळे प्रलंबित आहेत. परिणामी, आर्वी तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांची परवड होत आहे. आर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा कारभार रामभरोसे व कासवगतीने सुरू आहे. सदर विभागातील १८४ महसूल प्रकरणे कार्यवाहीस्तव सादर आहे. नवीन व जुने, असे २६१ प्रकरणे एसडीओ कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे खितपत आहेत. यामुळे हा विभाग दलालांच्या मगर मिठीत असल्याची चर्चा आहे. यात कर्मचाऱ्यांचे चांगभले होत असले तरी सामान्यांना न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसते. शासन जनतेच्या सेवेसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देत असताना येथे त्या सुविधांचा फज्जा उडत असल्याचे दिसते. एसडीओ कार्यालयात सामान्य नागरिकांना दररोज विविध कामांसाठी चकरा माराव्या लागतात; पण कामेच होत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)