शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमधील बदल समाजासाठी धोक्याचा

By admin | Updated: September 25, 2016 02:11 IST

राज्यात २१ व्या शतकातही खैरलांजी हत्याकांड, रंगारी जळीत, सोनई, आगे कुटूंब हत्याकांड, शिर्डीत सागर शेजवळ हत्या आदी प्रकरणे

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट संरक्षण समिती : शासन, प्रशासनाला साकडेवर्धा : राज्यात २१ व्या शतकातही खैरलांजी हत्याकांड, रंगारी जळीत, सोनई, आगे कुटूंब हत्याकांड, शिर्डीत सागर शेजवळ हत्या आदी प्रकरणे तथा उषा थूल यांच्या घरावर जातीवाद्यांचा हल्ला आदी प्रकरणे घडत आहेत. असे असताना काही जनाधार अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द करा वा शिथील करा म्हणत मोर्चे काढून सलोखा धोक्यात आणत आहे. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमधील बदल समाजासाठी धोक्याचा ठरू शकतो. यामुळे बदल करू नये, अशी मागणी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट संरक्षण समितीने केली. याबाबत शासन, प्रशासनाला निवेदनातून साकडे घालण्यात आले.आजही ग्रामीण भागात अनु. जाती व जमातींवर जातीवाद्यांकडून हल्ले होतात. अशावेळी गैरअनुसूचित अर्जदारांवर जमानती वा गैरजमानती गुन्हा दाखल केला जातो; पण अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचे कलम लावले जात नाही. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अस्तित्वात असताना पोलीस यंत्रणेद्वारे कायद्याची पायमल्ली केली जाते. गैरअनुसूचित अर्जदारावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट कलम लागली असता पोलिसांनी योग्यवेळी तपास न करणे, पुरावे व साक्षीदार नसणे यामुळे गैरअनुसूचित अर्जदार न्यायालयातून निर्दाेष मुक्त होतो. अनु. जाती व जमातीचे लोक अ‍ॅट्रॉसिटीचा दुरुपयोग करतात, हा गैरसमज आहे. एक-दोन प्रकरणे आढळली तरी तपास पोलीस उपअधीक्षक वा एसडीपीओ असे अधिकारी करतात. यामुळे यात कुणी अकारण दोषी ठरत नाही. यामुळे कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी समितीने केली. याबाबत जिल्हाधिकारी, राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन दिले. यावेळी मनीष धवणे, प्रशांत भगत, विजय नगराळे, प्रशांत दखणे, मनीष पुसाटे, हेंमत करवाडे, अरुण येसनकर, देवानंद भेंडे, निलेश रागोटे, दीपक जीवणे, प्रमोद खंडारे, आशिष तेलंग, सुरज कांबळे, नंदकिशोर धाबर्डे, रितेश नगराळे आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)