शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

शिक्षण मंडळाच्या १०, १२ वी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत होणार बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 14:27 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याचा एक भाग म्हणून १० वी व १२ वीच्या प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देराज्य शिक्षण मंडळाचा निर्णयभाषा विषयाच्या शिक्षकांचे झाले प्रशिक्षण

सुधीर खडसे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याचा एक भाग म्हणून १० वी व १२ वीच्या प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहावीचा बदललेला अभ्यासक्रम व १२ वीच्या भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये बदल करण्यात येणार आहे.राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत बालभारतीच्या विविध विषयाच्या अभ्यासमंडळाद्वारे यंदा १० वीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. तसेच विषयतज्ज्ञ मार्गदर्शकांनी कृतीपर मुल्यमापन पद्धतीचा आराखडा तयार केला असून प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलण्यात आलेले आहे. याच महिन्यात पुणे येथे राज्यभरातील ठराविक शिक्षकांची विविध विषयाची कार्यशाळा राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणार आहे.बदल झालेल्या अभ्यासक्रमातील प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची नवीन पद्धत वर्तमान, प्रश्नपत्रिकेपेक्षा पूर्णपणे भिन्न राहणार असून यात कृतीवर मुल्यमापनला विशेष महत्व दिल्या जाणार आहे. तसेच उपाययोजनात्मक प्रश्नांवर भर दिल्या जाणार असून त्यातून विद्यार्थ्यांमधील अभ्यासक कृतीवर लेखन कौशल्याचे आकलन केले जाणार आहे.सीबीएसइ अभ्यासक्रमाचास्तर गाठण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने हे पाऊल उचलले आहे. या माध्यमातून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या स्तरावर राज्यशिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना नेण्याचा प्रयत्न करणार आहे. परिणामत: विद्यार्थ्यांना जेईई व नीट सारख्या स्पर्धा परीक्षांची वेगळी तयारी करण्याची गरज भासणार आहे.सदर बदलेला अभ्यासक्रमांच्या प्रारूपानुसार कृतीपत्रिकांवर आधारीत प्रश्नपत्रिका राहणार आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शिक्षकांना विद्या प्राधीकरणकडून देण्यात आलेले आहे. तसेच वर्ग १२ वी च्या भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा कृतीपत्रिका लागू करण्यात आलेली आहे.

टॅग्स :examपरीक्षा