शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभीमानी शासनाविरूद्ध करणार चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:29 IST

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. उद्योगपतींच्या हिताचे हे शासन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही योजना नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला नाही. कापूस, सोयाबीन आदी पिकाला भाव नाही.

ठळक मुद्देसुबोध मोहिते यांची माहिती : संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. उद्योगपतींच्या हिताचे हे शासन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही योजना नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला नाही. कापूस, सोयाबीन आदी पिकाला भाव नाही. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे हे शासन असल्याने त्यांना त्यांची जागा शेतकरी दाखवून देणार? आता शेतकऱ्यांसाठी ही आरपारची लढाई असून २० आॅक्टोंबरला शेतकरी व कार्यकर्ते आपल्या हक्कासाठी चक्काजाम आंदोलन करणार आहे, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील यांनी दिली.येथील विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पवन तिजारे, आर्वी विधानसभा अध्यक्ष गौरव वाघ, विश्वनाथ मस्के, समीर घोडे, आर्वी तळेगाव, आष्टी, कारंजा, रोहणा, खरांगणा जळगाव पिंपळखुटा आदी अनेक गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्यावतीने सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई द्यावी ,सोयाबीन कापूस, तुरीच्या हमीभावाची खरेदी केंद्र सुरू करा, बोंड अळीचे अनुदान हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये अदा करा ,वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, आधी मागणीसाठी सदर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सुबोध मोहिते पाटील यांनी सांगितले.बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य दादा गाडगे यांचा सुबोध मोहिते पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषद सर्कलपदी दिलीप रेवतकर तर सिंधी विहिरी जिल्हा परिषद सर्कल पदी गोपाळ नासरे यांची नियुक्ती करण्यात आली.या सभेत भाजप काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सुबोध मोहिते पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी स्वाभिमानी पक्षात प्रवेश घेतला. त्यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांशी मोहिते यांनी संवाद साधला.

टॅग्स :Subodh Mohiteसुबोध मोहितेChakka jamचक्काजाम