शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ’च्या पोर्टलवरून वर्धा जिल्ह्यातील सात ग्रा.पं.गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:51 IST

महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातीलच चक्क सात ग्रा.पं.ची केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ च्या वेबसाईटवर गायब करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देउमा भारतीकडे तक्रार करूनही दखल नाही

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातीलच चक्क सात ग्रा.पं.ची केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ च्या वेबसाईटवर गायब करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषदेने ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही केंद्र सरकारच्या स्वच्छता विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणातून सात गावांना वंचित राहावे लागले आहे.वैराग्यमुर्ती गाडगेबाबा, महात्मा गांधी यांच्यासह अनेक थोर पुरुषांनी स्वच्छतेचे महत्त्व ओळखून त्यासाठी कार्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेसाठी लोकचळवळच उभी केली. त्यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. महात्मा गांधींची कर्मभूमी अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींना केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या वेबसाईटवर स्थानच देण्यात आले नाही. जिल्ह्यात ५२० ग्रामपंचायती आहेत. मात्र, केंद्राने केवळ ५१३ ग्रामपंचायतीच यात दाखविल्या आहेत. हा प्रकार जिल्हा परिषदेच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ राज्य सरकारच्या ग्रामीण विकास व केंद्र सरकारकडे लेखी पत्र पाठविले. शिवाय हा प्रकार निदर्शनास आणून दिला. परंतु, जिल्हा परिषदेच्या पत्राला केराची टोपली केंद्र व राज्य सरकारने दाखविली. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणतून या ग्रामपंचायती बाद ठरल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे या सर्व ग्रामपंचायची प्रकल्पामुळे पुर्नवसन झालेल्या गावांच्या आहेत.

स्थान न मिळालेली गावेआर्वी तालुक्यातील मिर्झापूर ग्रा.पं.चे विभाजन करून नेरी पुनर्वसन, बोथलीचे विभाजन करून नटाळा, पिपरीचे विभाजन करून पिपरी पुनर्वसन, वाठोडाचे विभाजन करून हैबतपूर, मांडलाचे विभाजन करून जाम, अहिरवाडाचे विभाजन करून सर्कसपूर तर उसेगाव ग्रा.पं.ची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, सदर ग्रा.पं.ची नोंदच स्वच्छसाठी घेण्यात आलेली नाही.

केंद्राची भूमिका बघ्याचीवर्धा जिल्ह्यातील सदर सात गावांची नावे वगळली आहे अशी माहिती आर्वी तालुक्यातील सर्कसपूरचे उपसरपंच निखील कडू यांनी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याकडे केली. मात्र, ना. उमा भारती व त्याच्या मंत्रालयाने उपसरपंच कडू यांच्या तक्रारीची दखल ही घेतली नाही. पूर्वी वर्धा जिल्ह्यात एकूण ५१७ ग्रा.पं. होत्या. त्यानंतर समुद्रपूर, आष्टी, कारंजा, सेलू ग्रा.पं.ला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने ही संख्या घटून ५१३ वर आली; पण दरम्यानच्या काळात सात ग्रा.पं. नव्याने तयार करण्यात आल्याने ही सख्या ५२० इतकी झाली असल्याचे सांगण्यात आले.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मध्ये सहभागी होणे ही बाब प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी गौरवाचीच आहे. आम्ही संबंधितांना निवेदन देऊन पाठपुरावा केला; पण प्रभावी कार्यवाही झाली नाही. सर्कसपूरसह जिल्ह्यातील सदर सातही ग्रा.पं.ना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मध्ये सहभागी करून घ्यावे. शिवाय त्यांची नोंद स्वच्छच्या वेबसाईटवर करावी.- निखील कडू, उपसरपंच, ग्रा.पं. सर्कसपूर.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान