शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भुदान जमीन घोटाळयाची सीबीआय चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:12 IST

जिल्ह्यात १९८० हेक्टर जमीन भूदानची आहे. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झाले नाही. अलीकडच्या काळात भुदान गरीबांना न देता त्या जमिनी धनदांडग्यांना व शिक्षण संस्था धारकांना वितरीत झाल्या आहेत. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भुखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहेत.

ठळक मुद्देरामदास तडस यांची मागणी : लोकसभेत प्रश्न उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्र्यांना घातले साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात १९८० हेक्टर जमीन भूदानची आहे. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झाले नाही. अलीकडच्या काळात भुदान गरीबांना न देता त्या जमिनी धनदांडग्यांना व शिक्षण संस्था धारकांना वितरीत झाल्या आहेत. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भुखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहेत. भुदान जमीन घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली. या विषयी त्यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता.विनोबा भावे यांनी भुदान चळवळी मध्ये जी शेतजमीन मिळविली. त्यातील काही जमीन गरजुंना वाटण्यात आल्यात; पण शेती करण्याचे भान त्यापैकी अनेकांनी नसल्यामुळे या जमिनी तशाच पडून होत्या. शिल्लक असलेल्या जमिनीचे अधिकारी, भुमाफीया व शैक्षणिक संस्थच्या संगनमताने जमिनी श्रीमंत, बिल्डरांना व संस्थांना विकण्यात आल्या आहेत. सर्व भुुदानातील जमिनी देशातील भुमीहीन असलेल्या गरीबांना तसेच सरकारी कार्याकरिता मिळण्यात यावी. शिवाय झालेल्या भ्रष्टाचाराची सी.बी.आय. चौकशी करण्यात यावी अशी मागणी लोकसभेत शुन्य प्रहर अंतर्गत केली. शिवाय तसा प्रश्नही उपस्थित करीत सर्वांचे लक्ष आल्याकडे वेधून घेतले.आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीचा प्रारंभ वर्धा लोकसभा क्षेत्रातील सेवाग्राम येथून ०७ मार्च १९५१ ला व आंध्र प्रदेशातील शिवरामपल्ली (आजच्या तेलागंना) राज्यातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून केला. यात त्यांनी श्रीमंत शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा काही हिस्सा भूमिहीन, हरिजन लोकांना दान करण्याचे आवाहन केले. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत गेला. आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओरिसा व महाराष्ट्र या सर्व राज्यांत भूदान चळवळीसाठी आचार्य विनोबा भावे पायी फिरले. सर्व राज्यांत त्यांना प्रचंड, सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी आचार्य विनोबा भावे यांनी पायदळ यात्रा करून लाखो एकर जमीन दानामध्ये दुर्लक्षित घटकांसाठी मिळविली. जे ऐतिहासिक कार्य होते. या चळवळीतून जमा झालेल्या जमिनीतून देशातील भूमिहीनांना जमिनी देण्यात आल्या व त्यातील जमीन शिल्लक राहिली. या शिल्लक जमिनी वाटपामध्ये मोठा भष्ट्राचार झाला आहे. भूदान मधील शिल्लक असलेल्या जमिनिचे अधिकारी, भुमाफीया व शैक्षणिक संस्थच्या संगनमताने श्रीमंत, बिल्डरांना व संस्थांना विकण्यात आल्या आहेत. यासर्व भ्रष्टाचाराची सी.बी.आय. चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी खा. तडस यांनी लावून धरली होती.

टॅग्स :Vinoba Bhaveविनोबा भावेRamdas Tadasरामदास तडस