शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भुदान जमीन घोटाळयाची सीबीआय चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:12 IST

जिल्ह्यात १९८० हेक्टर जमीन भूदानची आहे. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झाले नाही. अलीकडच्या काळात भुदान गरीबांना न देता त्या जमिनी धनदांडग्यांना व शिक्षण संस्था धारकांना वितरीत झाल्या आहेत. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भुखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहेत.

ठळक मुद्देरामदास तडस यांची मागणी : लोकसभेत प्रश्न उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्र्यांना घातले साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात १९८० हेक्टर जमीन भूदानची आहे. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झाले नाही. अलीकडच्या काळात भुदान गरीबांना न देता त्या जमिनी धनदांडग्यांना व शिक्षण संस्था धारकांना वितरीत झाल्या आहेत. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भुखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहेत. भुदान जमीन घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली. या विषयी त्यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता.विनोबा भावे यांनी भुदान चळवळी मध्ये जी शेतजमीन मिळविली. त्यातील काही जमीन गरजुंना वाटण्यात आल्यात; पण शेती करण्याचे भान त्यापैकी अनेकांनी नसल्यामुळे या जमिनी तशाच पडून होत्या. शिल्लक असलेल्या जमिनीचे अधिकारी, भुमाफीया व शैक्षणिक संस्थच्या संगनमताने जमिनी श्रीमंत, बिल्डरांना व संस्थांना विकण्यात आल्या आहेत. सर्व भुुदानातील जमिनी देशातील भुमीहीन असलेल्या गरीबांना तसेच सरकारी कार्याकरिता मिळण्यात यावी. शिवाय झालेल्या भ्रष्टाचाराची सी.बी.आय. चौकशी करण्यात यावी अशी मागणी लोकसभेत शुन्य प्रहर अंतर्गत केली. शिवाय तसा प्रश्नही उपस्थित करीत सर्वांचे लक्ष आल्याकडे वेधून घेतले.आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीचा प्रारंभ वर्धा लोकसभा क्षेत्रातील सेवाग्राम येथून ०७ मार्च १९५१ ला व आंध्र प्रदेशातील शिवरामपल्ली (आजच्या तेलागंना) राज्यातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून केला. यात त्यांनी श्रीमंत शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा काही हिस्सा भूमिहीन, हरिजन लोकांना दान करण्याचे आवाहन केले. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत गेला. आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओरिसा व महाराष्ट्र या सर्व राज्यांत भूदान चळवळीसाठी आचार्य विनोबा भावे पायी फिरले. सर्व राज्यांत त्यांना प्रचंड, सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी आचार्य विनोबा भावे यांनी पायदळ यात्रा करून लाखो एकर जमीन दानामध्ये दुर्लक्षित घटकांसाठी मिळविली. जे ऐतिहासिक कार्य होते. या चळवळीतून जमा झालेल्या जमिनीतून देशातील भूमिहीनांना जमिनी देण्यात आल्या व त्यातील जमीन शिल्लक राहिली. या शिल्लक जमिनी वाटपामध्ये मोठा भष्ट्राचार झाला आहे. भूदान मधील शिल्लक असलेल्या जमिनिचे अधिकारी, भुमाफीया व शैक्षणिक संस्थच्या संगनमताने श्रीमंत, बिल्डरांना व संस्थांना विकण्यात आल्या आहेत. यासर्व भ्रष्टाचाराची सी.बी.आय. चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी खा. तडस यांनी लावून धरली होती.

टॅग्स :Vinoba Bhaveविनोबा भावेRamdas Tadasरामदास तडस