शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

केबलच्या कामांमुळे नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:56 IST

शहरात भूमिगत केबल टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे करीत असताना खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाहीत. परिणामी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय नालीचे खोदकाम करीत असताना पाईपलाईनकडे दुर्लक्ष केले जात आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर सर्वत्र माती : पाईपलाईन फुटल्याने तयार होतोय चिखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात भूमिगत केबल टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे करीत असताना खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाहीत. परिणामी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय नालीचे खोदकाम करीत असताना पाईपलाईनकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पाईप फुटून पाणी पुरवठा प्रभावित होणे तथा रस्त्यावर पाणी साचून चिखल होण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. या प्रकाराकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असून त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा प्रकार सध्या शहरात सर्वत्र पाहावयास मिळत आहे.शहरातील मुख्य मार्ग ते बॅचलर रोडकडे जाणाºया रस्त्यांवर केबल टाकण्याचे काम केले जात आहे. यातील बडे चौक ते अष्टभूजा चौक मार्गावर केबल टाकण्यासाठी नालीचे खोदकाम करण्यात आले. यात केबल टाकून नाली बुजविण्यात आली; पण ती व्यवस्थित बुजविलेली नाही. परिणामी, या मार्गावर सर्वत्र माती विखूरलेली आहे. केबल टाकण्यासाठी नाली खोदत असताना पाईपलाईनही फुटली. यामुळे सदर रस्त्यावर पाणी वाहताना दिसून येते. सकाळ-सायंकाळ रस्त्यावर पाणी राहत असल्याने ये-जा करणाºया वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. शिवाय तेथील रहिवाश्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.मागील एक आठवड्यापासून सदर मार्गावर हे काम सुरू आहे. शिवाय पूढे पाषाण चौकापर्यंत मागील एक आठवड्यापासून केवळ खोदकाम करून ठेवण्यात आलेले आहे. पाषाण चौकातील सिमेंट रस्त्याचे खोदकाम केले जात आहे. यामुळे बडे चौक ते पाषाण चौकापर्यंतच्या रहिवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता मुख्य मार्गाला जोडणारा असल्याने तथा रामनगर, प्रतापनगर व त्यापूढील नागरिकांना याच रस्त्याने ये-जा करावी लागत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. रहदारीच्या रस्त्यावर काम सुरू असल्याने वाहतुकीचाही खोळंबा होत आहे. परिणामी, मुली, महिला व वृद्धांना अपघातांनाही सामोरे जावे लागत आहे. दररोज घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराला समज देत कामे लवकर आटोपावीत, नाली व्यवस्थित बुजवून माती काढून टाकावी आणि फुटलेली पाईपलाईन त्वरित दुरूस्त करावी, अशी मागणी हवालदारपूरा व मालगुजारीपूरा येथील नागरिकांनी केली आहे.याबाबत शनिवारी न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांना देण्यात आल्या आहे. शिवाय महावितरणच्या व्यवस्थापकांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.रस्त्यावर पाणी साचत असल्याने अडचणबडे चौक ते अष्टभूजा चौक हा मार्ग रहदारीचा आहे. रात्री उशिरापर्यंत या मार्गाने वर्दळ असते. यातच सकाळी व सायंकाळी नळ सोडल्यानंतर फुटलेल्या पाईपलाईनमधील पाणी रस्त्यावर वाहताना दिसते. काही ठिकाणी हे पाणी साचून डबके तयार होत आहे. यामुळे नागरिकांची गोची झाली असून पाणीही व्यर्थ वाहून जात आहे. याकडे लक्ष देत ही पाईपलाईन त्वरित दुरूस्त करणे गरजेचे झाले आहे. शिवाय वाहतुकीची कोंडी होत असल्याने छोटे-छोटे अपघात दररोज होत आहेत. परंतु, अनेक प्रकरणे पोलीस कचेरीपर्यंत पोहोचत नाहीत.