शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

केबलच्या कामांमुळे नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:56 IST

शहरात भूमिगत केबल टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे करीत असताना खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाहीत. परिणामी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय नालीचे खोदकाम करीत असताना पाईपलाईनकडे दुर्लक्ष केले जात आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर सर्वत्र माती : पाईपलाईन फुटल्याने तयार होतोय चिखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात भूमिगत केबल टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे करीत असताना खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाहीत. परिणामी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय नालीचे खोदकाम करीत असताना पाईपलाईनकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पाईप फुटून पाणी पुरवठा प्रभावित होणे तथा रस्त्यावर पाणी साचून चिखल होण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. या प्रकाराकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असून त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा प्रकार सध्या शहरात सर्वत्र पाहावयास मिळत आहे.शहरातील मुख्य मार्ग ते बॅचलर रोडकडे जाणाºया रस्त्यांवर केबल टाकण्याचे काम केले जात आहे. यातील बडे चौक ते अष्टभूजा चौक मार्गावर केबल टाकण्यासाठी नालीचे खोदकाम करण्यात आले. यात केबल टाकून नाली बुजविण्यात आली; पण ती व्यवस्थित बुजविलेली नाही. परिणामी, या मार्गावर सर्वत्र माती विखूरलेली आहे. केबल टाकण्यासाठी नाली खोदत असताना पाईपलाईनही फुटली. यामुळे सदर रस्त्यावर पाणी वाहताना दिसून येते. सकाळ-सायंकाळ रस्त्यावर पाणी राहत असल्याने ये-जा करणाºया वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. शिवाय तेथील रहिवाश्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.मागील एक आठवड्यापासून सदर मार्गावर हे काम सुरू आहे. शिवाय पूढे पाषाण चौकापर्यंत मागील एक आठवड्यापासून केवळ खोदकाम करून ठेवण्यात आलेले आहे. पाषाण चौकातील सिमेंट रस्त्याचे खोदकाम केले जात आहे. यामुळे बडे चौक ते पाषाण चौकापर्यंतच्या रहिवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता मुख्य मार्गाला जोडणारा असल्याने तथा रामनगर, प्रतापनगर व त्यापूढील नागरिकांना याच रस्त्याने ये-जा करावी लागत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. रहदारीच्या रस्त्यावर काम सुरू असल्याने वाहतुकीचाही खोळंबा होत आहे. परिणामी, मुली, महिला व वृद्धांना अपघातांनाही सामोरे जावे लागत आहे. दररोज घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराला समज देत कामे लवकर आटोपावीत, नाली व्यवस्थित बुजवून माती काढून टाकावी आणि फुटलेली पाईपलाईन त्वरित दुरूस्त करावी, अशी मागणी हवालदारपूरा व मालगुजारीपूरा येथील नागरिकांनी केली आहे.याबाबत शनिवारी न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांना देण्यात आल्या आहे. शिवाय महावितरणच्या व्यवस्थापकांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.रस्त्यावर पाणी साचत असल्याने अडचणबडे चौक ते अष्टभूजा चौक हा मार्ग रहदारीचा आहे. रात्री उशिरापर्यंत या मार्गाने वर्दळ असते. यातच सकाळी व सायंकाळी नळ सोडल्यानंतर फुटलेल्या पाईपलाईनमधील पाणी रस्त्यावर वाहताना दिसते. काही ठिकाणी हे पाणी साचून डबके तयार होत आहे. यामुळे नागरिकांची गोची झाली असून पाणीही व्यर्थ वाहून जात आहे. याकडे लक्ष देत ही पाईपलाईन त्वरित दुरूस्त करणे गरजेचे झाले आहे. शिवाय वाहतुकीची कोंडी होत असल्याने छोटे-छोटे अपघात दररोज होत आहेत. परंतु, अनेक प्रकरणे पोलीस कचेरीपर्यंत पोहोचत नाहीत.