शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची सक्ती रद्द करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:06 IST

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड न नोंदविल्यास त्या विद्यार्थ्यांना शिक्षक संच मान्यतेसाठी गणले जाणार नाही, असे शिक्षण संचालक पुणे यांनी २८ सप्टेंबर रोजी आदेश काढले.

ठळक मुद्देशिक्षक संच मान्यतेचे प्रकरण : तक्रार निवारण समितीचे शिक्षण सचिवांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्यार्थ्यांचे आधार कार्ड न नोंदविल्यास त्या विद्यार्थ्यांना शिक्षक संच मान्यतेसाठी गणले जाणार नाही, असे शिक्षण संचालक पुणे यांनी २८ सप्टेंबर रोजी आदेश काढले. सदर आदेश रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीने केली आहे. याबाबत शिक्षणाधिकाºयांमार्फत शिक्षण सचिवांना निवेदन देण्यात आले.शाळेत दाखल झालेल्या बºयाच मुलांचे आधार कार्ड अद्याप काढलेले नाही. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार आधार कार्ड नाही, या सबबीखाली मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. नियमानुसार ३० सप्टेंबरची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून शिक्षक संख्या मान्य करण्यात येते; पण शाळेच्या पटावर विद्यार्थी असताना आधार कार्ड नाही, या सबबीखाली त्यांना ग्राह्य न धरणे हे नियमबाह्य आहे. यात नियमबाह्यपणे शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे. आधीच राज्यभर मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त असताना आधार कार्ड नसल्याने शिक्षक संख्या मान्य करताना अशा मुलांना ग्राह्य न धरणे, हे अनाकलनीय आहे. आधार कार्ड काढणे, ही शिक्षकांची जबाबदारी नाही. असे असताना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही म्हणून शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे न्यायोचित ठरणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व आधार कार्डची माहिती यामध्ये तफावत आहे. यामुळे अशा मुलांची माहिती आॅनलाईन करताना अडचणी येत आहेत. शिवाय ज्या विद्यार्थ्यांजवळ आधार कार्ड नाही; पण त्यांचा प्रवेश शाळेत झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड दिलेल्या अवधीत काढणे शक्य नाही. यामुळे २०१७-१८ ची संच मान्यता करताना ३० सप्टेंबर रोजी शाळेच्या दाखल-खारीज रजिस्टरवर नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरून शिक्षक संख्या निर्धारित करावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रमेश टपाले, अजय भोयर, प्रदीप महल्ले, पुंडलिक नाकतोडे, देविदास गावंडे, मनोहर वाके, अनिल टोपले, विनय मुलकलवार, गजानन साबळे, धिरज समर्थ, रहिम शाह, दत्तात्रय राऊळकर, पी.के. शेकार, हरिष पुनसे राजू कारवटकर, प्रा. राजेंद्र साळुंके, नरेंद्र मुडे, खुरपडे आदींनी दिला आहे.नवनवीन नियमांमुळे शिक्षकांच्या अडचणींत वाढशिक्षकांच्या २०१७-१८ च्या संच मान्यतेमध्ये नवनवीन नियमांचा अंतर्भाव केला जात आहे. परिणामी, शिक्षकांच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचेच दिसते. आता आधार कार्ड नसलले विद्यार्थी पटसंख्येत ग्राह्य धरत नसल्याची बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे अनेक शाळांतील विद्यार्थी संख्या कमी दिसत असल्याने अतिरिक्त ठरणाºया शिक्षकांची संख्या वाढणार आहे.