शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

तीन महिन्यांकरिता चालक परवाना होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:04 IST

वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्याने अनेक अपघात झाले. उत्तर प्रदेश येथे याच प्रकारातून नुकताच १४ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. वर्धेत असा प्रकार घडू नये याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळीच सतर्कता मोहीम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देकायद्यात तरतूद : वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पडणार महाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्याने अनेक अपघात झाले. उत्तर प्रदेश येथे याच प्रकारातून नुकताच १४ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. वर्धेत असा प्रकार घडू नये याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळीच सतर्कता मोहीम राबविण्यात येत आहे. शिवाय वाहन चालविताना मोबाईल वापरल्यास त्या चालकाचा मोटर वाहन कायद्याच्या कलम १२९ (ए) अन्वये तीन महिन्याकरिता वाहन परवाना रद्द करण्याचे प्रावधान आहे. जिल्ह्यात या प्रावधानाचा वापर वाढण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याकरिता सर्वत्र स्कूल बसचा वापर होतो. यात जिल्ह्यात छोट्या खासगी स्कूल बसचा भरणा वाढला आहे. या स्कूल बसमधून आपल्या पाल्यांना पालक शाळेत पाठवित असल्याचे दिसून आले आहे. यात परवाना नसतानाही बरेच आॅटो स्कूल आॅटो म्हणून धावत आहेत. वर्धेत या आॅटो आणि स्कूलबसमध्ये परवानगीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे वहन होत असल्याचे समोर आले आहे. शिवाय वाहतूक कायदा आणि स्कूल बसच्या नियमानुसार सुविधा आहे अथवा नाही याची चौकशी होणे अपेक्षित आहे. या कारणामुळे स्कूल बसचा परवाना रद्द करण्याची गरज आहे.वर्धेत बऱ्याच स्कूलबसचे चालक वाहन चालविताना मोबाईल वापरत असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व वाहतूक पोलिसांनी संयुक्त रित्या कार्यवाही करून अशा चालकांवर कारवाई करीत मोहीम आखण्याची पालकांची अपेक्षा आहे. सध्या जिल्ह्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यात स्कूल बस चालकांना या संदर्भात सूचना देण्याकरिता एखादे शिबिर आयोजित करून त्यांना समज देण्याची मागणी होत आहे. लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्याने अनेक अपघात झाले. उत्तर प्रदेश येथे याच प्रकारातून नुकताच १४ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. वर्धेत असा प्रकार घडू नये याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळीच सतर्कता मोहीम राबविण्यात येत आहे. शिवाय वाहन चालविताना मोबाईल वापरल्यास त्या चालकाचा मोटर वाहन कायद्याच्या कलम १२९ (ए) अन्वये तीन महिन्याकरिता वाहन परवाना रद्द करण्याचे प्रावधान आहे. जिल्ह्यात या प्रावधानाचा वापर वाढण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याकरिता सर्वत्र स्कूल बसचा वापर होतो. यात जिल्ह्यात छोट्या खासगी स्कूल बसचा भरणा वाढला आहे. या स्कूल बसमधून आपल्या पाल्यांना पालक शाळेत पाठवित असल्याचे दिसून आले आहे. यात परवाना नसतानाही बरेच आॅटो स्कूल आॅटो म्हणून धावत आहेत. वर्धेत या आॅटो आणि स्कूलबसमध्ये परवानगीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे वहन होत असल्याचे समोर आले आहे. शिवाय वाहतूक कायदा आणि स्कूल बसच्या नियमानुसार सुविधा आहे अथवा नाही याची चौकशी होणे अपेक्षित आहे. या कारणामुळे स्कूल बसचा परवाना रद्द करण्याची गरज आहे.वर्धेत बºयाच स्कूलबसचे चालक वाहन चालविताना मोबाईल वापरत असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी व वाहतूक पोलिसांनी संयुक्त रित्या कार्यवाही करून अशा चालकांवर कारवाई करीत मोहीम आखण्याची पालकांची अपेक्षा आहे. सध्या जिल्ह्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यात स्कूल बस चालकांना या संदर्भात सूचना देण्याकरिता एखादे शिबिर आयोजित करून त्यांना समज देण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यात ४६९ स्कूल बस धावतात रस्त्यावरवर्धा जिल्ह्यात आजच्या घडीला एकूण ४६९ स्कूल बस रस्त्याने धावत आहेत. त्यांची नोंदणी उप प्रादेशिक परिवहन विभागात आहेत. स्कूल बस म्हणून आवश्यक असलेल्या सुविधा या वाहनांत असल्याचे चालकांकडून सांगण्यात आले आहे. वास्तविकतेत स्कूल बसचा परवाना घेताना या सुविधा असतात व नंतर त्या वाहनातून बेपत्ता होत असल्याचे दिसून आले आहे. याची चौकशी संबंधीत विभागाने करण्याची गरज आहे.जिल्ह्यात कुठल्याही आॅटोला शाळेत विद्यार्थ्यांना पोहोचविण्याची परवानगी नाही. असे असताना मोठ्या प्रमाणात आॅटोतून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. अशा आॅटोंवर वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी कार्यवाही करण्याची गरज आहे. अन्यथा यातून एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.वयानुसार ठरते विद्यार्थी संख्यास्कूल बसमध्ये विद्यार्थी बसविताना त्यात वयानुसार संख्या कमी जास्त करण्यात आली आहे. खासगीत धावणाऱ्या स्कूल बस या सहा सिटर आहेत. त्यामुळे या वाहनात १२ वर्षाखालील नऊ मुले आणि यापेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी असतील तर त्यांची संख्या सहा असावी असा नियम आहे. येथे मात्र या दुप्पट विद्यार्थी बसविल्या जात असल्याचे दिसून आले आहे.पालकांनीही सतर्कता बाळगण्याची गरजजिल्ह्यात असलेल्या बऱ्याच शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या आहेत. यामुळे बऱ्यापैकी स्कूल बस बंद आहेत. पण लवकरच शाळा सुरू होणार आहेत. या काळात खासगी स्कूल बस चालकाकडून नियमानुसार सर्व सुविधा पुरविण्यात येत आहे अथवा नाही, याची तपासणी करण्याची गरज आहे. आपला मुलगा जातो त्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी तर नाही ना, याची तपासणी पालकांनी करणे अपेक्षित आहे.