शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

कालव्याचे पाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:50 IST

अप्पर वर्धा कालवे विभागाच्यावतीने सोडण्यात आलेले पाणी थेट आष्टी-किन्हाळा रस्त्यावरून वाहात असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा तयार झाला असून तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी आहे.

ठळक मुद्देतयार झाला जीवघेणा खड्डा : आष्टी-किन्हाळा मार्गावरील वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी(शहीद) : अप्पर वर्धा कालवे विभागाच्यावतीने सोडण्यात आलेले पाणी थेट आष्टी-किन्हाळा रस्त्यावरून वाहात असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा तयार झाला असून तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी आहे.आष्टी-किन्हाळा हे अंतर अवघ्या सहा कि.मी.चे आहे. या रस्त्यावर अर्ध्यापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम झाले आहे. या मार्गाने ये-जा करणाºयांना दगड तुडवतच पुढील प्रवास करावा लागतो. या मार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. हा रस्ता जि.प.च्या दोन सर्कलच्या हद्दीमध्ये विभागल्या गेल्यामुळे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामांवरही परिणाम झाला आहे. आष्टी येथे नगरपंचायत झाल्याने आता आष्टीचीही हद्द संपली आहे. सध्या लहान आर्वी हद्दीमध्येच पूर्ण रस्ता देण्यात आला आहे. रस्त्याच्या कामासाठी निधी देण्यास वारंवार टाळाटाळ केल्या जात असल्याची परिसरात ओरड आहे. त्यातच हे नवीन संकट ओढावल्याने नागरिकांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सध्या चना पिकाच्या पेरणीसाठी अप्पर वर्धा धरण विभागाने पाणी कालव्याद्वारे सोडले आहे; पण या मौजामधील कालवे व पाटचºया नादुरूस्त असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. इतकेच नव्हे तर आष्टी-किन्हाळा मार्गावर अनेक ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहे. दिवाकर भिवापुरे यांच्या शेताजवळ पाण्याच्या जोरदार प्रवाहामूळे रस्ताच वाहून गेला असून रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा तयार झाला आहे. तसेच परिसरात पाण्याचे डबके तयार झाले आहे. हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असल्याने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य कार्यवाही करण्याची मागणी अनिकेत मानकर, ऋषिकेश भिवापुरे, वैभव मुळे, आदेश डुकरे, विक्की ठाकरे, विकास डुकरे, आदेश भिवापुरे यांनी केली आहे.पाण्यातून करावी लागते ये-जाजलाशयातून सिंचनासाठी सोडण्यात आलेले पाणी वितरीका नादुरूस्त असल्याने रस्त्यावरून वाहत आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्याच्या मधोमध खड्डा तयार झाला आहे. शिवाय अनेक ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहे. सध्या शेतकºयांकडून रबी हंगामातील विविध शेती कामे झटपट पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात असला तरी या मार्गावरून ये-जा करणाºयांना पाण्यातूनच मार्ग काढत पुढील प्रवास करावा लागत आहे.