शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

कालव्याचे पाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:50 IST

अप्पर वर्धा कालवे विभागाच्यावतीने सोडण्यात आलेले पाणी थेट आष्टी-किन्हाळा रस्त्यावरून वाहात असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा तयार झाला असून तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी आहे.

ठळक मुद्देतयार झाला जीवघेणा खड्डा : आष्टी-किन्हाळा मार्गावरील वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी(शहीद) : अप्पर वर्धा कालवे विभागाच्यावतीने सोडण्यात आलेले पाणी थेट आष्टी-किन्हाळा रस्त्यावरून वाहात असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा तयार झाला असून तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी आहे.आष्टी-किन्हाळा हे अंतर अवघ्या सहा कि.मी.चे आहे. या रस्त्यावर अर्ध्यापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम झाले आहे. या मार्गाने ये-जा करणाºयांना दगड तुडवतच पुढील प्रवास करावा लागतो. या मार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. हा रस्ता जि.प.च्या दोन सर्कलच्या हद्दीमध्ये विभागल्या गेल्यामुळे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामांवरही परिणाम झाला आहे. आष्टी येथे नगरपंचायत झाल्याने आता आष्टीचीही हद्द संपली आहे. सध्या लहान आर्वी हद्दीमध्येच पूर्ण रस्ता देण्यात आला आहे. रस्त्याच्या कामासाठी निधी देण्यास वारंवार टाळाटाळ केल्या जात असल्याची परिसरात ओरड आहे. त्यातच हे नवीन संकट ओढावल्याने नागरिकांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सध्या चना पिकाच्या पेरणीसाठी अप्पर वर्धा धरण विभागाने पाणी कालव्याद्वारे सोडले आहे; पण या मौजामधील कालवे व पाटचºया नादुरूस्त असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. इतकेच नव्हे तर आष्टी-किन्हाळा मार्गावर अनेक ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहे. दिवाकर भिवापुरे यांच्या शेताजवळ पाण्याच्या जोरदार प्रवाहामूळे रस्ताच वाहून गेला असून रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा तयार झाला आहे. तसेच परिसरात पाण्याचे डबके तयार झाले आहे. हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असल्याने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य कार्यवाही करण्याची मागणी अनिकेत मानकर, ऋषिकेश भिवापुरे, वैभव मुळे, आदेश डुकरे, विक्की ठाकरे, विकास डुकरे, आदेश भिवापुरे यांनी केली आहे.पाण्यातून करावी लागते ये-जाजलाशयातून सिंचनासाठी सोडण्यात आलेले पाणी वितरीका नादुरूस्त असल्याने रस्त्यावरून वाहत आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्याच्या मधोमध खड्डा तयार झाला आहे. शिवाय अनेक ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहे. सध्या शेतकºयांकडून रबी हंगामातील विविध शेती कामे झटपट पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात असला तरी या मार्गावरून ये-जा करणाºयांना पाण्यातूनच मार्ग काढत पुढील प्रवास करावा लागत आहे.