वर्धा : नागपूरवरून यवतमाळकडे जात असलेल्या अवजड वाहनांना पवनार वर्धा मार्गावरील दत्तपूर परिसरातून बायपास मार्ग काढून वळते करण्यात आले. सध्या या मार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुले अपघाताचा धोका वाढला आहे. पूर्वी नागपूरवरू न येणारी अवजड वाहने वर्धा शहरातील मुख्य मार्गाने जात होती. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. अडचण थांबविण्यासाठी दत्तपूर परिसरातून बायपास मार्ग तयार करण्यात आला. या मार्गाने नागपूरवरून यवतमाळकडे जाणारी अवजड वाहने वळती करण्यात आली. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा अडचण कमी झाली. सध्या या मार्गावरून दररोज शेकडो अवजड वाहने धावत असतात. परिणामी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. या मार्गावर वाहने ही भरधाव धावत असतात. अशावेळी खड्ड्याचाही विचार वाहनचालक करीत नाही. या खड्ड्यामुळे रात्रीला अपघाताचा धोका वाढला आहे. अवजड वाहतुकीबरोबरच प्रवासी वाहतूकही या मार्गाने होते. अशावेळी सदर खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून रस्त्याची दैना झाली असतानाही संबधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. काहीच महिन्यापूर्वी या मार्गावरील मोठ्या खड्डा चुकविताना भीषण अपघात घडला होता. यात ट्रकचालक जागीच ठार झाला. त्यामुळे प्रशासनाचे दखल घेत तात्काळ सदर खड्डा बुजविला. परंतु तो बुजवितानाही योग्य प्रकार न बुजविल्याने आता तो खड्डाही दबत चालला आहे. या मार्गावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता या मार्गाची योग्य डागडुजी होणे गरजेचे आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रस्त्यावरील खड्डे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दिवसा कसेबसे निभर असले तरी रात्री मात्र अपघातास निमंत्रण देण्याचा प्रकार सध्या येथे पहावयास मिळतो. त्यामुळे बांधकाम विभागाने याची दखल घावी आणि सदर मार्गावर जागोजागी असलेल्या खड्ड्यांची कायम दुरुस्ती करावी अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी करीत असून संतापही व्यक्त करतात.(शहर प्रतिनिधी)या मार्गावर जुनापानी चौक परिसरात भला मोठा खड्ड पडला आहे. या खड्डा चुकविण्यासाठी वाहने रस्त्याच्या कडेने वाहन नेतात. परिणामी या रस्त्याच्या कडा खचत चालल्या आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. उरलेले अन्न रस्त्याच्या कडेला टाकले जात असल्याने दुर्गधी पसरते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे असे अन्न टाकण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. काहीच महिन्यापूर्वी या मार्गावरील मोठ्या खड्डा चुकविताना भीषण अपघात घडला होता. यात ट्रकचालक जागीच ठार झाला. त्यामुळे प्रशासनाचे दखल घेत तात्काळ सदर खड्डा बुजविला. परंतु तो बुजवितानाही योग्य प्रकार न बुजविल्याने आता तो खड्डाही दबत चालला आहे. प्रशासनाने या खड्ड्यांची त्वरीत डागडुजी करावी अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक करीत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघात बळावले आहे.
बायपास मार्ग झाला धोक्याचा
By admin | Updated: February 16, 2015 01:36 IST