शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

तीन एकरातील ऊस जळाला

By admin | Updated: January 20, 2015 00:10 IST

येथील शेतकरी शंकर अर्जुन झाडे यांच्या तीन एकर शेतातील ऊसाचे पीक वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे जळून खाक झाले आहे. घटनेच्या वेळी झाडे व त्यांचा शेतमजूर शेतातच हजर होते.

जिल्ह्यात आगीच्या तीन घटना : केळझर येथे झोपडीचा कोळसा सेलू : येथील शेतकरी शंकर अर्जुन झाडे यांच्या तीन एकर शेतातील ऊसाचे पीक वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे जळून खाक झाले आहे. घटनेच्या वेळी झाडे व त्यांचा शेतमजूर शेतातच हजर होते. झाडे यांच्या शेतातून थ्री फेज लाईन गेलेली आहे. त्याच लाईनवरून ११ हजार किलो मेगावॅटची मेनलाईन सुद्धा गेलेली आहे. त्यांच्या शेतात विजेचे तार लोंबकळले असून या तारांत झालेल्या घर्षणामुळे ठिणगी पडून आग लागल्याचा आरोप झाडे यांचा आहे. या आगीत त्यांचे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची तक्रार सेलू पोलिसात दिली असून एएसआय वर्धापूरकर यांनी पंचनामा करून प्रकरण विद्युत विभागाकडे पाठविले आहे. या प्रकारामुळे वीज वितरण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. झाडे यांना महावितरणच्यावतीने मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)६० हजार रुपयांच्या रोखीसह साहित्याची राख केळझर : येथील एका शेतमजुराची झोपडी अचानक जळाल्याने त्याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. या आगीत साठ हजार रुपये रोख असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना रविवार सायंकाळी घडली. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील हिरडा येथील बालाजी लालाजी कजदेकार व कशीराम बिसराम बेटेकार हे शेतमजुरी करण्याकरिता येथे आले आहेत. बालाजी काजदेकर हे ठेक्याने शेती करतात तर काशीराम बेटेकार हे गावातीलच अरुण ठोंबरे याच्याकडे शेतमजुरी करतो. घटनेच्या दिवशी सर्व कुटुंबीय शेतावर गेले असताना आगीत संपूर्ण झोपडी भस्मसात झाली. (वार्ताहर) आशा इंडस्ट्रीजला आग समुद्रपूर : जाम येथील आशा इंडस्ट्रीजमध्ये अचानक विद्युत प्रवाह वाढल्याने लागलेल्या आगीत ३०० पोते सरकी व बारदाणा तसेच यंत्रसामग्री जळून खाक झाली. ही आग शनिवारी रात्री लागल्याचे सांगण्यात येते.जाम येथे आशा इंडस्ट्रीजनामक शेतीमाल प्रक्रिया उद्योग कार्यरत आहे. येथील उद्योगाला होणारा विद्युतपुरवठा शनिवारी कमी जासत होत होता. रात्रीच्या सुमारास अचानक शॉट सर्कीटमुळे अचानक आग लागली. या आगीत तेथे असलेली कॅबिन जळून स्वाहा झाली. आगीमुळे सरकी भरण्याकरिता ठेवून असलेला बारदाणा व सरकी भरलेली पोते जळावयास लागले. कार्यरत कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी हिंगणघाट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारन करण्यात आले. आगीमुळे सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा प्राथमिक पंचनामा रविवारी पूर्ण केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)