शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तीन एकरातील ऊस जळाला

By admin | Updated: January 20, 2015 00:10 IST

येथील शेतकरी शंकर अर्जुन झाडे यांच्या तीन एकर शेतातील ऊसाचे पीक वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे जळून खाक झाले आहे. घटनेच्या वेळी झाडे व त्यांचा शेतमजूर शेतातच हजर होते.

जिल्ह्यात आगीच्या तीन घटना : केळझर येथे झोपडीचा कोळसा सेलू : येथील शेतकरी शंकर अर्जुन झाडे यांच्या तीन एकर शेतातील ऊसाचे पीक वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे जळून खाक झाले आहे. घटनेच्या वेळी झाडे व त्यांचा शेतमजूर शेतातच हजर होते. झाडे यांच्या शेतातून थ्री फेज लाईन गेलेली आहे. त्याच लाईनवरून ११ हजार किलो मेगावॅटची मेनलाईन सुद्धा गेलेली आहे. त्यांच्या शेतात विजेचे तार लोंबकळले असून या तारांत झालेल्या घर्षणामुळे ठिणगी पडून आग लागल्याचा आरोप झाडे यांचा आहे. या आगीत त्यांचे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची तक्रार सेलू पोलिसात दिली असून एएसआय वर्धापूरकर यांनी पंचनामा करून प्रकरण विद्युत विभागाकडे पाठविले आहे. या प्रकारामुळे वीज वितरण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. झाडे यांना महावितरणच्यावतीने मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)६० हजार रुपयांच्या रोखीसह साहित्याची राख केळझर : येथील एका शेतमजुराची झोपडी अचानक जळाल्याने त्याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. या आगीत साठ हजार रुपये रोख असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना रविवार सायंकाळी घडली. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील हिरडा येथील बालाजी लालाजी कजदेकार व कशीराम बिसराम बेटेकार हे शेतमजुरी करण्याकरिता येथे आले आहेत. बालाजी काजदेकर हे ठेक्याने शेती करतात तर काशीराम बेटेकार हे गावातीलच अरुण ठोंबरे याच्याकडे शेतमजुरी करतो. घटनेच्या दिवशी सर्व कुटुंबीय शेतावर गेले असताना आगीत संपूर्ण झोपडी भस्मसात झाली. (वार्ताहर) आशा इंडस्ट्रीजला आग समुद्रपूर : जाम येथील आशा इंडस्ट्रीजमध्ये अचानक विद्युत प्रवाह वाढल्याने लागलेल्या आगीत ३०० पोते सरकी व बारदाणा तसेच यंत्रसामग्री जळून खाक झाली. ही आग शनिवारी रात्री लागल्याचे सांगण्यात येते.जाम येथे आशा इंडस्ट्रीजनामक शेतीमाल प्रक्रिया उद्योग कार्यरत आहे. येथील उद्योगाला होणारा विद्युतपुरवठा शनिवारी कमी जासत होत होता. रात्रीच्या सुमारास अचानक शॉट सर्कीटमुळे अचानक आग लागली. या आगीत तेथे असलेली कॅबिन जळून स्वाहा झाली. आगीमुळे सरकी भरण्याकरिता ठेवून असलेला बारदाणा व सरकी भरलेली पोते जळावयास लागले. कार्यरत कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी हिंगणघाट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारन करण्यात आले. आगीमुळे सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा प्राथमिक पंचनामा रविवारी पूर्ण केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)