शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

सातबारा कोरा होताच नव्या कर्जाचा बोझा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

गेल्या तीन वर्षांपासून सतत नापिकीचा सामना करावा लागल्याने शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने शेतकऱ्यांना बँकाकडून नव्याने कर्ज मिळू शकले नाही. परिणामी, सावकरांच्या दारात जावून शेतकऱ्यांना वाढीव दराने कर्ज घ्यावे लागले. होणारे उत्पन्न आणि सावकारी कर्जाचा जाच यातून शेतकरी मृत्यूशिवाय बाहेर पडूच शकला नाही.

ठळक मुद्दे४९ हजार ७०५ शेतकऱ्यांना मिळाला लाभ : माफीतील ४५ हजार ५८२ शेतकऱ्यांनी घेतले पुन्हा कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कर्जाच्या ओझ्यापायीच शेतकरी आत्महत्या करीत असल्याने या ओझ्यातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. पण, सातबारा कोरा होताच यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागल्याने त्यांच्या सातबारावर पुन्हा बोझा चढला. त्यामुळे कर्जाच्या विळख्यातून शेतकऱ्यांची काही सुटका होणे शक्य नाही, हे मात्र खरे.गेल्या तीन वर्षांपासून सतत नापिकीचा सामना करावा लागल्याने शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने शेतकऱ्यांना बँकाकडून नव्याने कर्ज मिळू शकले नाही. परिणामी, सावकरांच्या दारात जावून शेतकऱ्यांना वाढीव दराने कर्ज घ्यावे लागले. होणारे उत्पन्न आणि सावकारी कर्जाचा जाच यातून शेतकरी मृत्यूशिवाय बाहेर पडूच शकला नाही. शेतकऱ्यांची ही अवस्था लक्षात घेता राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ४९ हजार ७०५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला.या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४४१ कोटी ४२ लाख १७ हजार रुपये जमा करण्यात आले. कर्जमाफीचा लाभ मिळताच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याने त्यांना बँकाकडून नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे कर्जमाफीतील ४९ हजार ७०५ शेतकऱ्यांपैकी ४५ हजार ५८२ शेतकऱ्यांनी नव्याने ४३८ कोटी ४२ लाख ६४ हजार रुपयांचे पीककर्ज घेतले आहे. माफीतील इतरही शेतकरी नव्याने कर्ज उचलण्याची शक्यता असून यामुळे कर्ज वाटपाचाही टक्का वाढणार आहे.दहा टक्के शेतकरी कर्जमाफीतून बाद?महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये २ लाखांपर्यंतचे सरसकट कर्ज माफ करण्याची घोषणा शासनाने करुन शेतकऱ्यांना लाभ ही दिला. पण, जिल्ह्यातील जवळपास दहा टक्के शेतकऱ्यांकडे पीककर्जाव्यतिरिक्त शेडनेट, पॉलीहाऊस, लॅण्ड डेव्हलपमेंट, सिंचन व्यवस्था आदींकरिता घेतलेले कर्ज थकीत असल्याने त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील या शेतकऱ्यांची आर्थिक अडचण आणखीच वाढली आहे. जिल्ह्यात शेडनेट व पॉलिहाऊस करीत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकºयांकडे गेल्या तीन ते चार वर्षांपासून कर्जाचे हप्ते फेडण्याची सोय नाही. त्यामुळे व्याजही वाढतच आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज