शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढणार

By admin | Updated: October 7, 2014 23:39 IST

देशात दोन राज्यात असलेल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारात नेते मंडळी मशगुल आहेत. तर दुसरीकडे शेतकरी अस्मानी संकटाशी सामना करीत आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी व सुल्तानी संकट कोसळले आहे.

वर्धा : देशात दोन राज्यात असलेल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारात नेते मंडळी मशगुल आहेत. तर दुसरीकडे शेतकरी अस्मानी संकटाशी सामना करीत आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी व सुल्तानी संकट कोसळले आहे. केंद्र सरकारने अद्याप कृषी मालाला योग्य भाव मिळेल असे कोणतेच धोरण राबविले नसल्याने आणि जागतिक बाजारत होणारी भावाची गहसरण पाहता शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मागील हंगामात कापूस ५ हजार रुपये प्रती क्विंटल व सोयाबीन ४ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल विकणाऱ्या शेतकऱ्यांना या हंगामात यापेक्षा कमी भाव मिळण्याचे संकेत आहे. यंदा कापूस ३ हजार ५०० ते ४ हजार प्रती क्विंटल तर सोयाबीन ३ हजार रुपये प्रती क्विंटल सोयाबीन विकावे लागणार असल्याचे संकेत आहे. कारण जागतिक बाजारात झालेली भावाची घसरण याला कारणीभूत असेल. यामुळे आधीच कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढणार आहे. यावर्षी पावसाने विलंबाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यामुळे उत्पादन खर्च वाढला. शिवाय उत्पन्न कमी होणार. यातच मालाला भाव कमी मिळणार असल्याने या दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे निघणार असल्याची स्थिती आहे.शेतकऱ्यांना खर्चावर ५० टक्के नफा जोडून भाव देणार असल्याची घोषणा करणारे आताचे केंद्र सरकार जुनेच धोरण कायम ठेवत असल्याचे दिसते. सध्या अमेरिकेच्या बाजारात आलेली मंदी भारतीय शेतकऱ्यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे. ती शेतकऱ्यांचे दिवाळे काढणारी ठरणार असून याबाबत शासनाने कोणतेच धोरण आखलेले नाही. खरीपातील धान, कापूस, सोयाबीन, मका या पिकांना सरकारने जाहीर केलेले हमी भाव ही मिळण्याची शाश्वती नसल्याची परिस्थिती आहे. जागतीक बाजारात मागील वर्षी ९० ते ९५ सेंट प्रती पाऊण्ड रूई चा भाव होता. आज रुईला ७० सेंट पर्यंत भाव मिळत आहे. याचाच अर्थ असा की या हंगामात भारतीय शेतकऱ्यांना सरकारचा हमीभाव ४ हजार ५०० प्रती क्विंटल मिळणार नाही. सोयाबीनच्या भावात ही मंदी आहे. १४.२५ डॉलर प्रती बुशेल म्हणजेच २८ किलो चा भाव आता ९.४० डॉलर वर येऊन ठेपला आहे. आपले सोयाबीन जी.एम. नाही म्हणून थोडे जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे यंदा २ हजार ५०० ते २ हजार ८०० रुपये भाव असण्याची शक्यता आहे. मका पिकाला १ हजार ३१० प्रती क्विंटल पेक्षा कमी भावात विकावा लागत आहे. जागतीक बाजारात साखर २४ रुपये किलो आहे पण येथे ३२ ते ३५ रुपये प्रती किलो आहे. बाजारात हस्तक्षेप करून शेतकरी हित साधने गरजेचे आहे.(स्थानिक प्रतिनिधी)