शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढणार

By admin | Updated: October 7, 2014 23:39 IST

देशात दोन राज्यात असलेल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारात नेते मंडळी मशगुल आहेत. तर दुसरीकडे शेतकरी अस्मानी संकटाशी सामना करीत आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी व सुल्तानी संकट कोसळले आहे.

वर्धा : देशात दोन राज्यात असलेल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारात नेते मंडळी मशगुल आहेत. तर दुसरीकडे शेतकरी अस्मानी संकटाशी सामना करीत आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी व सुल्तानी संकट कोसळले आहे. केंद्र सरकारने अद्याप कृषी मालाला योग्य भाव मिळेल असे कोणतेच धोरण राबविले नसल्याने आणि जागतिक बाजारत होणारी भावाची गहसरण पाहता शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मागील हंगामात कापूस ५ हजार रुपये प्रती क्विंटल व सोयाबीन ४ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल विकणाऱ्या शेतकऱ्यांना या हंगामात यापेक्षा कमी भाव मिळण्याचे संकेत आहे. यंदा कापूस ३ हजार ५०० ते ४ हजार प्रती क्विंटल तर सोयाबीन ३ हजार रुपये प्रती क्विंटल सोयाबीन विकावे लागणार असल्याचे संकेत आहे. कारण जागतिक बाजारात झालेली भावाची घसरण याला कारणीभूत असेल. यामुळे आधीच कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढणार आहे. यावर्षी पावसाने विलंबाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यामुळे उत्पादन खर्च वाढला. शिवाय उत्पन्न कमी होणार. यातच मालाला भाव कमी मिळणार असल्याने या दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे निघणार असल्याची स्थिती आहे.शेतकऱ्यांना खर्चावर ५० टक्के नफा जोडून भाव देणार असल्याची घोषणा करणारे आताचे केंद्र सरकार जुनेच धोरण कायम ठेवत असल्याचे दिसते. सध्या अमेरिकेच्या बाजारात आलेली मंदी भारतीय शेतकऱ्यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे. ती शेतकऱ्यांचे दिवाळे काढणारी ठरणार असून याबाबत शासनाने कोणतेच धोरण आखलेले नाही. खरीपातील धान, कापूस, सोयाबीन, मका या पिकांना सरकारने जाहीर केलेले हमी भाव ही मिळण्याची शाश्वती नसल्याची परिस्थिती आहे. जागतीक बाजारात मागील वर्षी ९० ते ९५ सेंट प्रती पाऊण्ड रूई चा भाव होता. आज रुईला ७० सेंट पर्यंत भाव मिळत आहे. याचाच अर्थ असा की या हंगामात भारतीय शेतकऱ्यांना सरकारचा हमीभाव ४ हजार ५०० प्रती क्विंटल मिळणार नाही. सोयाबीनच्या भावात ही मंदी आहे. १४.२५ डॉलर प्रती बुशेल म्हणजेच २८ किलो चा भाव आता ९.४० डॉलर वर येऊन ठेपला आहे. आपले सोयाबीन जी.एम. नाही म्हणून थोडे जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे यंदा २ हजार ५०० ते २ हजार ८०० रुपये भाव असण्याची शक्यता आहे. मका पिकाला १ हजार ३१० प्रती क्विंटल पेक्षा कमी भावात विकावा लागत आहे. जागतीक बाजारात साखर २४ रुपये किलो आहे पण येथे ३२ ते ३५ रुपये प्रती किलो आहे. बाजारात हस्तक्षेप करून शेतकरी हित साधने गरजेचे आहे.(स्थानिक प्रतिनिधी)