शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

बफर झोन झाल्यास १,९०० हेक्टरने कार्यक्षेत्र घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 21:45 IST

देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर प्रकल्पाची ओळख. परंतु, याच प्रकल्पाच्या बफर झोनचा विषय मागील दोन वर्षांपासून शासन दरबारी रेंगाळला आहे. अद्यापही या विषयी कुठलाही शासन निर्णय झाला नसून वन्य प्राणी मित्रांचे शासनाच्या भूमिकेडे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देशासन आदेशाची प्रतीक्षा । प्रादेशिक वनविभागाचे ९६९ चौ. कि.मी. वनक्षेत्र

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर प्रकल्पाची ओळख. परंतु, याच प्रकल्पाच्या बफर झोनचा विषय मागील दोन वर्षांपासून शासन दरबारी रेंगाळला आहे. अद्यापही या विषयी कुठलाही शासन निर्णय झाला नसून वन्य प्राणी मित्रांचे शासनाच्या भूमिकेडे लक्ष लागून आहे. सदर बफर झोनचा विषय मार्गी लागल्यानंतर प्रादेशिक वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील सुमारे एक हजार ९०० हेक्टर जंगल परिसर वन्यजीव संरक्षण विभागाकडे वळता होणार आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा उपवनसंरक्षक कार्यालयाच्या अधिनस्त सध्या ९६९ चौरस कि.मी.चे जंगल क्षेत्र आहे. या जंगलात अस्वल, वाघ, बिबट आदी हिंसक प्राण्यांसह हरिण, मोर, रोही आदी इतरांना भुरळच घालणारे वन्यप्राणी आहेत. तर बोर प्रकल्पाला काही वर्षांपूर्वी बोर व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. हा व्याघ्र प्रकल्प देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प आहे. असे असले तरी या व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वाघांचे वास्तव्य आहे. इतकेच नव्हे तर या व्याघ्र प्रकल्पात कोल्हे, मोर, हरिण आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्व वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासात मुक्त संचार करता यावा. तसेच वन्यप्राणी आणि मनुष्य यांच्यात संघर्ष होऊ नये या हेतूने बफर झोनचा विषय मार्गी जाणे गरजेचे आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून हा विषय पूर्णत्त्वास गेलेला नाही. राखीव करण्यात आलेल्या जंगल परिसरात टेरोटेरीयल झोन, कोर झोन व बफर झोन तयार होणे गरजेचे असते. ते मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी फायद्याचे ठरत असल्याने वन्यप्राणी प्रेमींनाही शासन काय भूमिका घेते याची प्रतीक्षा आहे.चार वनपरिक्षेत्रातील जमीन होणार वळतीबफर झोन झाल्यास हिंगणी, कारंजा(घा.), खरांगणा व आर्वी वन परिक्षेत्रातील सुमारे १ हजार ९०० हेक्टर जंगल वन्यजीव संरक्षण विभागाकडे वळते होणार आहे.बफर झोनच्या विषयी अद्यापही कुठलाही शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. बफर झोन झाल्यास प्रादेशिक वन विभागाचा सुमारे १ हजार ९०० हेक्टरचा जंगल परिसर त्यात जाईल. इतकेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातीलही काही जंगल त्यात जाणार आहे.- सुहास बढेकर, सहा. वनरक्षक, वर्धा.बफर झोन झाल्यास वन्यजीवन व मानव संघर्ष कमी करण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर ग्रामस्थांसाठी शासकीय योजनाचेही दालन उघडे होते. त्यामुळे बफर झोनचा विषय मार्गी लागणे गरजेचे आहे.- कौस्तुभ गावंडे, वन्यप्राणी मित्र, वर्धा.

टॅग्स :forest departmentवनविभाग