शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

तोडलेला बंधारा दोन वर्षांपासून दुरूस्तीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 19, 2017 02:14 IST

वायगाव ते सोनेगाव (बाई) मार्गावर भदाडी नदीवर काही वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला होता.

लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांच्या मागणीला केराची टोपली लोकमत न्यूज नेटवर्क वायगाव (नि.) : वायगाव ते सोनेगाव (बाई) मार्गावर भदाडी नदीवर काही वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला होता. हा बंधारा या भागातील एका धनाढ्य शेतकऱ्याने दोन वर्षापूर्वी तोडला. याची सर्वत्र बोंब झाली तरी लोकप्रतिनिधींनी या शेतकऱ्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. शिवाय त्या बंधाऱ्याची साधी डागडुजीही करण्यात आली नाही. संबंधित अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा बंधारा पाणी अडविण्याकरिता कुचकामी ठरत आहे. बंधारा तोडणाऱ्या कथित शेतकऱ्याने या भागात नव्याने शेती विकत घेतली. या बंधाऱ्यामुळे त्याच्या शेतात पाणी जाण्याची भीती असल्याने त्याने तो तोडल्याची माहिती आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाणी अडवा पाणी जिरवाचा नारा देण्यात येत आहे. त्यावर श्रमदान करून मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. मात्र येथे तुटलेला बंधारा दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. गत दोन वर्षांपासून कुठलीही कार्यवाही न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. वायगाव ते सोनेगाव मार्गावरील भदाडी नदीवर भूजल विभागाने २००५-२००६ च्या सुमारास सिमेंटचा पक्का बंधारा बांधला होता. या बंधाऱ्यामुळे ग्रामपंचायत नळयोजनेच्या विहिरीला पाणी वाढले होते. सोबतच शेतातील विहिरीची पातळी वाढण्यास मदत झाली होती. ६.१६ लाख रुपयांचा खर्च वाया भूजल सर्वेक्षण विभागाकडून ६ लाख १६ हजार रुपयांचा खर्च २००५-०६ मध्ये हा बंधारा बांधण्यात आला. मात्र एका धनाढ्य शेतकऱ्याने तो आपल्या फायद्यासाठी फोडला. परिणामी खर्च वाया गेला. शिवाय या घटनेला दोन वर्षांचा कालावधी होत असताना कार्यवाहीही करण्यात आली नाही. याबाबत संबंधीत विभागांकडे तक्रारी करूनही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. आमच्या विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी व ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा विहीर असल्याने सिमेंटचा बंधारा २००५-०६ च्या दरम्यान बांधण्यात आला होता. बांधकामानंतर बंधारा १२ सप्टेंबर २००६ तारखेला ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करण्यात आला. पण बंधारा फोडला असल्याने व ती योजना आमच्या विभागातून बंद झाल्याने जलयुक्त शिवारातून डागडुजी करण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येईल. - मंगेश चौधरी, वरिष्ठ भू वैज्ञानिक, भूजल विभाग, वर्धा