शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

ब्रिटिशकालीन तलावाचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:30 IST

जाम हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र ७ वर असून गाव दळणवळणाचे मुख्य ठिकाण आहे. औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या गावात मार्चपासून पाणीटंचाईची चाहूल लागते. पूर्वजांनी करून ठेवलेल्या पाण्याच्या नियोजनाकडे ८० च्या दशकापासून लोकप्रतिनिधी व शासनाने कायमस्वरूपी दुर्लक्ष केले.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ‘गाळयुक्त’च : पाण्यासाठी नागरिकांची दाहीदिशा भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : जाम हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र ७ वर असून गाव दळणवळणाचे मुख्य ठिकाण आहे. औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या गावात मार्चपासून पाणीटंचाईची चाहूल लागते. पूर्वजांनी करून ठेवलेल्या पाण्याच्या नियोजनाकडे ८० च्या दशकापासून लोकप्रतिनिधी व शासनाने कायमस्वरूपी दुर्लक्ष केले. १९३० च्या कार्यकाळात ब्रिटिशाचे सम्राज्य असताना त्या काळातील इंग्रज शासकांनी दहा एकराच्या परिसरात गाव तलावाची निर्मिती केली होती. आज या गावतलावात पाण्याची लहान डबकी दिसून येतात.या गावतलावात साचलेला गाळ उपसण्याची कोणत्याही प्रशासनाने आजतागायत तसदी घेतलेली नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी विराजमान झालेले सचिन गावंडे यांनी या तलावातील गाळ काढण्याबाबत मुख्यमंत्री, आमदारांसह प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. या गावात जीवन प्राधिकरणाची मांडगाव व जाम अशी संयुक्त नळयोजना आहे. शेडगाव येथील वणा नदीवरून जाम येथे जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जात असून या जलवाहिनीला दिवसागणिक मोठ्या प्रमाणावर गळती लागलेली दिसून येते.परिणामी कित्येकांना अल्प पाणीपुरवठा होतो. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्याकरिता टॅकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. शासनाने तालुका टॅकरमुक्त घोषित केल्याने प्रशासकीय मंजुरी मिळणे कठीण झाले आहे. प्रशासनाने तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्याची मागणी होत आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.प्रशासनाकडून गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार अशी घोषणा केली असली तरी तालुक्यातील अनेक गावांतील तलाव अद्याप गाळमुक्त झालेले नाहीत. शेतकरी गाळापासून वंचित राहिले. तर शिवाय गाळयुक्तच आहे. याचा परिणाम म्हणून तलावात ठणठणाट पाहायला मिळत आहे.पाणीटंचाईसाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक गावातील दुष्काळाबाबत संरपंचाशी संवाद साधला. मी जाम ग्रामवासीयांच्या व्यथा सांगण्यासाठी संबंधितांशी संपर्क केला; मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लेखी स्वरूपाचे निवेदन मुंख्यमंत्र्यांना पाठविले. या निवेदनातून पाणीटंचाई आणि गावातील परिस्थितीविषयी जाणीव करून दिली आहे.- सचिन गावंडे, सरपंच (जाम).

टॅग्स :water shortageपाणीटंचाई