शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन तलावाचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:30 IST

जाम हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र ७ वर असून गाव दळणवळणाचे मुख्य ठिकाण आहे. औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या गावात मार्चपासून पाणीटंचाईची चाहूल लागते. पूर्वजांनी करून ठेवलेल्या पाण्याच्या नियोजनाकडे ८० च्या दशकापासून लोकप्रतिनिधी व शासनाने कायमस्वरूपी दुर्लक्ष केले.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ‘गाळयुक्त’च : पाण्यासाठी नागरिकांची दाहीदिशा भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : जाम हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र ७ वर असून गाव दळणवळणाचे मुख्य ठिकाण आहे. औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या गावात मार्चपासून पाणीटंचाईची चाहूल लागते. पूर्वजांनी करून ठेवलेल्या पाण्याच्या नियोजनाकडे ८० च्या दशकापासून लोकप्रतिनिधी व शासनाने कायमस्वरूपी दुर्लक्ष केले. १९३० च्या कार्यकाळात ब्रिटिशाचे सम्राज्य असताना त्या काळातील इंग्रज शासकांनी दहा एकराच्या परिसरात गाव तलावाची निर्मिती केली होती. आज या गावतलावात पाण्याची लहान डबकी दिसून येतात.या गावतलावात साचलेला गाळ उपसण्याची कोणत्याही प्रशासनाने आजतागायत तसदी घेतलेली नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी विराजमान झालेले सचिन गावंडे यांनी या तलावातील गाळ काढण्याबाबत मुख्यमंत्री, आमदारांसह प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. या गावात जीवन प्राधिकरणाची मांडगाव व जाम अशी संयुक्त नळयोजना आहे. शेडगाव येथील वणा नदीवरून जाम येथे जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जात असून या जलवाहिनीला दिवसागणिक मोठ्या प्रमाणावर गळती लागलेली दिसून येते.परिणामी कित्येकांना अल्प पाणीपुरवठा होतो. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्याकरिता टॅकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. शासनाने तालुका टॅकरमुक्त घोषित केल्याने प्रशासकीय मंजुरी मिळणे कठीण झाले आहे. प्रशासनाने तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्याची मागणी होत आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.प्रशासनाकडून गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार अशी घोषणा केली असली तरी तालुक्यातील अनेक गावांतील तलाव अद्याप गाळमुक्त झालेले नाहीत. शेतकरी गाळापासून वंचित राहिले. तर शिवाय गाळयुक्तच आहे. याचा परिणाम म्हणून तलावात ठणठणाट पाहायला मिळत आहे.पाणीटंचाईसाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक गावातील दुष्काळाबाबत संरपंचाशी संवाद साधला. मी जाम ग्रामवासीयांच्या व्यथा सांगण्यासाठी संबंधितांशी संपर्क केला; मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लेखी स्वरूपाचे निवेदन मुंख्यमंत्र्यांना पाठविले. या निवेदनातून पाणीटंचाई आणि गावातील परिस्थितीविषयी जाणीव करून दिली आहे.- सचिन गावंडे, सरपंच (जाम).

टॅग्स :water shortageपाणीटंचाई