शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

ब्रिटीशकालीन पैसेवारीत बदल गरजेचा

By admin | Updated: November 4, 2016 01:52 IST

सुमारे शतकापूर्वीची ब्रिटीशकालीन आणेवारी अद्यापही कायम आहे. यात बदल होणे गरजेचे आहे

शेतकऱ्यांचे नुकसान : महसूल विभागाद्वारे दुष्काळाचा निकषवर्धा : सुमारे शतकापूर्वीची ब्रिटीशकालीन आणेवारी अद्यापही कायम आहे. यात बदल होणे गरजेचे आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करताना पैसेवारीचा निकष महसूल विभागाद्वारे लावण्यात येतो. त्या पैसेवारीनुसार दुष्काळ जाहीर केला जातो. नैसर्गिक आपत्तीनुसार कपाशीचे एकरी उत्पन्न दीड क्विंटलपेक्षा कमी व सोयाबीन उत्पन्न एकरी दोन पोत्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. एकरी दीड क्विंटल कापूस व दोन पोते सोयाबीन पिकल्यास ५० टक्के पैसेवारी लागत आली आहे; पण सुधारित शेतीनुसार कपाशीचे एकरी उत्पादन ८ ते १५ क्विंटल व सोयाबीनचे उत्पादन एकरी ४ ते १२ क्विंटल होत असताना त्याची पैसेवारी २०० पटपेक्षा अधिक होते. त्यासाठी पूर्वीचा निकष बदलणे गरजेचे आहे. पिकांची पैसेवारी ठरविण्यासाठी गावपातळीवर एक समिती गठित करण्यात आली आहे. विविध योजना जाहीर करण्यासाठी केवळ पैसेवारीचा निकष लागू आहे. गावपातळीवरील समितीत अध्यक्ष म्हणून पाच गावांकरिता मंडळ अधिकारी असतो तर सदस्य ग्रामसेवक, सरपंच, प्रगतशील शेतकरी, सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, दोन अल्पभूधारक त्यात एक महिला आवश्यक, तलाठी व कृषी सहायक अशी समिती असते.जुन्या निकषात बदल करण्याच्या उद्देशाने विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेत गठित या समितीकडून तीन राज्यांतील पैसेवारीचा अभ्यास करण्यात आला. यामुळे प्रचलित पद्धतीला फाटा देत शास्त्रोक्त पद्धतीने पैसेवारी जाहीर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यापूर्वी १५ जानेवारी रोजी अंतिम पैसेवारी केली जात होती. यात बदल करून ३१ डिसेंबरलाच पैसेवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे. सध्या काढण्यात येणाऱ्या आणेवारीला शास्त्रीय आधार नाही. १९६२ पासून अनेकदा समित्याचे गठण करून त्यात बदल करण्यात आला. विविध उपाययोजना जाहीर करण्यासाठी केवळ पैसेवारीचा निकष लागू आहे. यामुळे पैसेवारी काढण्याच्या पद्धतीत बदल करण्याची मागणी होत आहे. पैसेवारी पद्धतीत अभ्यास करून बदल करणे गरजेचे आहे काय व अन्य बाबीसंदर्भात शिफारस करण्यासाठी केंद्र शासनाच्या धोरणानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेत समिती गठित झाली. समिती सदस्यांनी कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात राज्यातील पैसेवारी अभ्यासून अहवाल सादर केला. यानुसार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पैसेवारी घोषित करण्याच्या दोन पद्धती पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे; पण शास्त्रोक्त पद्धत अंमलात येईपर्यंत जुनी पद्धत कायम राहील. आणेवारी जाहीर करण्याच्या तारखेतही बदल केला आहे. नागपूर, अमरावती विभागीय हंगामी पैसेवारी ३0 सप्टेंबर व सुधारित ३१ आॅक्टोबर तर अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबरलाच जाहीर होईल.(कार्यालय प्रतिनिधी)