शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

घोराड-खापरी-शिवनगाव मार्गावरील पूल वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 23:59 IST

घोराड - खापरी- शिवनगाव या रस्त्यावरील खापरी गावालगत नाल्यावरील पुलाच्या बाजूला भरलेला भरावा वाहून गेल्याने रहदारीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने पुरात पुन्हा कडा वाहून जाऊ नये म्हणून सिमेंट काँक्रिटची मजबूत सुरक्षा भिंत बांधावी अशी मागणी जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष पप्पू जयस्वाल यांनी केली आहे.

ठळक मुद्देविजय जयस्वाल : सिमेंट काँक्रिटची सुरक्षा भिंत बांधावी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : घोराड - खापरी- शिवनगाव या रस्त्यावरील खापरी गावालगत नाल्यावरील पुलाच्या बाजूला भरलेला भरावा वाहून गेल्याने रहदारीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने पुरात पुन्हा कडा वाहून जाऊ नये म्हणून सिमेंट काँक्रिटची मजबूत सुरक्षा भिंत बांधावी अशी मागणी जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष पप्पू जयस्वाल यांनी केली आहे.ग्रामीण परिसरातून गेलेल्या या रस्त्यावरून घोराड. खापरी, शिवणगावचे नागरिक येजा करतात. शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहचण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या कडा भरतांना कोणताही तांत्रिक निकष पाळले नाही परिणामी कडा भरण्यासाठी वापरलेले साहित्य ढासळून वाहून गेले. एवढेच नव्हे तर पुलाला ही धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने थातूरमातूर काम करून या कामात गैरप्रकार केल्याचा आरोप जयस्वाल यांनी केला. वाहून गेलेल्या पुलाच्या बाजुच्या कडा सिमेंट काँक्रिटची सुरक्षा भिंती मजबूत बांधाव्या अशी मागणी जयस्वाल यांनी केली आहे.ग्रामीण भागात रस्ते दुरस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग करीत असतो. गेल्या काही वर्षात रस्ते व पुल बांधकामासाठी शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे.सदर पुलाच्या बाजुला भरावा भरण्यात आला. त्या ऐवजी काँक्रिटची सुरक्षा भिंत आवश्यक आहे. बराच भाग वाहून गेला. राहिलेला वाहून गेला तर रहदारीला धोका निर्माण होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घ्यावी.-विजय जयस्वाल, माजी अध्यक्ष जि.प.वर्धा.

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा