शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
4
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
5
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
6
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
7
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
8
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
9
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
10
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
11
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
12
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
13
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
14
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
15
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
16
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
17
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
18
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
19
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
Daily Top 2Weekly Top 5

घोराड-खापरी-शिवनगाव मार्गावरील पूल वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 23:59 IST

घोराड - खापरी- शिवनगाव या रस्त्यावरील खापरी गावालगत नाल्यावरील पुलाच्या बाजूला भरलेला भरावा वाहून गेल्याने रहदारीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने पुरात पुन्हा कडा वाहून जाऊ नये म्हणून सिमेंट काँक्रिटची मजबूत सुरक्षा भिंत बांधावी अशी मागणी जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष पप्पू जयस्वाल यांनी केली आहे.

ठळक मुद्देविजय जयस्वाल : सिमेंट काँक्रिटची सुरक्षा भिंत बांधावी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : घोराड - खापरी- शिवनगाव या रस्त्यावरील खापरी गावालगत नाल्यावरील पुलाच्या बाजूला भरलेला भरावा वाहून गेल्याने रहदारीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने पुरात पुन्हा कडा वाहून जाऊ नये म्हणून सिमेंट काँक्रिटची मजबूत सुरक्षा भिंत बांधावी अशी मागणी जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष पप्पू जयस्वाल यांनी केली आहे.ग्रामीण परिसरातून गेलेल्या या रस्त्यावरून घोराड. खापरी, शिवणगावचे नागरिक येजा करतात. शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहचण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या कडा भरतांना कोणताही तांत्रिक निकष पाळले नाही परिणामी कडा भरण्यासाठी वापरलेले साहित्य ढासळून वाहून गेले. एवढेच नव्हे तर पुलाला ही धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने थातूरमातूर काम करून या कामात गैरप्रकार केल्याचा आरोप जयस्वाल यांनी केला. वाहून गेलेल्या पुलाच्या बाजुच्या कडा सिमेंट काँक्रिटची सुरक्षा भिंती मजबूत बांधाव्या अशी मागणी जयस्वाल यांनी केली आहे.ग्रामीण भागात रस्ते दुरस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग करीत असतो. गेल्या काही वर्षात रस्ते व पुल बांधकामासाठी शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे.सदर पुलाच्या बाजुला भरावा भरण्यात आला. त्या ऐवजी काँक्रिटची सुरक्षा भिंत आवश्यक आहे. बराच भाग वाहून गेला. राहिलेला वाहून गेला तर रहदारीला धोका निर्माण होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घ्यावी.-विजय जयस्वाल, माजी अध्यक्ष जि.प.वर्धा.

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा