शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

सेवाग्राम आराखड्यातील कामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST

वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिली आहे. सेवाग्राम आश्रमातूनच बापूंनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा देण्याचे काम केले. त्यामुळे या पावनभूमीचा विकास करण्याचे शासनाने निश्चित केले. त्याच अनुषंगाने सेवाग्राम विकास आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे. एकूण पाच टप्प्यात आराखड्यांतर्गत कामे हाती घेण्यात आली असून २ ऑक्टोबरपूर्वी पूर्णत्वास न्यायची आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आदेश; पवनार, वरूड येथील विविध विकास कामे प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांच्या जयंतीला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम परिसरातील क्षेत्राचा विकास करण्याचे शासनाने ठरविले. त्याला सेवाग्राम विकास आराखडा असे नाव देण्यात आले. याकरिता निधीला मंजुरी मिळाली. आराखड्याअंतर्गत काही कामे पूर्णत्वास गेली असतानाच पवनार व वरुड येथील विकासकामांना पालकमंत्र्यांनी अचानक थांबा दिला आहे. त्यामुळे विकास आराखड्याच्या कार्यान्वयनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे.वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिली आहे. सेवाग्राम आश्रमातूनच बापूंनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा देण्याचे काम केले. त्यामुळे या पावनभूमीचा विकास करण्याचे शासनाने निश्चित केले. त्याच अनुषंगाने सेवाग्राम विकास आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे. एकूण पाच टप्प्यात आराखड्यांतर्गत कामे हाती घेण्यात आली असून २ ऑक्टोबरपूर्वी पूर्णत्वास न्यायची आहेत. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत पवनार येथे ६०९.९७ तर मौजा वरुड (रेल्वे) येथे ९९१.४८ लाखांच्या विकासकामांना मान्यता मिळाली. या अंतर्गत पवनार येथे सिमेंट रस्ता बांधकाम, नालीचे बांधकाम, सार्वजनिक ठिकाणी एलईडी दिवे बसविणे, सचिवालय इमारतीमधील वाचनालय, वॉर्ड क्रमांक २ वाजूरकर ले-आउटमधील बगिचाचा विकास, धामनदीच्या काठावर स्मशानभूमीजवळ घाट बांधकाम, सार्वजनिक ठिकाणी हायमास्ट दिवे, ४० किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच बसविणे, ग्रामपंचायत भवन बांधकाम, तर वरुड येथे सिमेंट रस्ता बांधकाम, नाली बांधकाम, नाला बांधकाम, वॉर्ड क्रमांक १ ते ५ मध्ये अतिरिक्त वीजखांबांसह पथदिवे बसविणे, खुल्या जागांचे सौंदर्यीकरण, धन्वंतरीनगर चौकात हायमास्ट दिवे लावणे, ४० किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच बसविणे आदी कामांचा समावेश होता. पवनार येथील नवीन ग्रामपंचायत भवन तसेच स्मशानभूमीचे नूतनीकरण व वरुड येथील सिमेंट रस्ता आदी विकासकामांना पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला थांबा देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कोरोना लॉकडाऊननंतर आराखड्यातील विकासकामांना पुन्हा एकदा ब्रेक लागल्याने गांधी जयंतीपूर्वी विकासकामे पूर्णत्वास जाण्याची आशा धूसर झाली आहे.सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वरुड व पवनार परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनाने १७.५२ कोटींच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर या कामांच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विकासकामांवर विपरित परिणाम होणार असून परिसरातील नागरिकांत नाराजी आहे. निधी उपलब्ध झालेल्या विकासकामांना स्थगिती न देता ती सुरळीत करावी.डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा

टॅग्स :Sewagramसेवाग्रामPavnarपवनार