शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

स्वस्त धान्य दुकानातील बायोमेट्रिक वादाच्या भोवºयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 22:19 IST

शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर आदी धान्य वाटप केले जाते. यासाठी सुधारित शासन निर्णयाप्रमाणे बायोमट्रिक प्रणाली लागू करण्यात आली.

ठळक मुद्देपॉस मशीन आॅक्सिजनवर : थम्ब दिल्याशिवाय धान्य मिळेना

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर आदी धान्य वाटप केले जाते. यासाठी सुधारित शासन निर्णयाप्रमाणे बायोमट्रिक प्रणाली लागू करण्यात आली. लाभार्थ्यांच्या हाताचा थम्ब घेण्यासाठी पॉस मशीन मिळाल्या; पण या मशीन असंख्य लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसेच स्वीकारत नाही. यामुळे लाभार्थ्यांना धान्य मिळणेच कठीण झाले आहे.स्वस्त धान्य दुकानांत लावलेल्या मशीनचा दर्जा अत्यंत निम्न स्वरूपाचा असल्याने एकूण कारभारच वादाच्या भोवºयात अडकला आहे. ऐन दिवाळी या मुख्य सणाच्या काळात नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागण्याची स्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. या प्रकरणी साहुर, माणिकवाडा, भारसवाडा, आष्टी, अंतोरा येथील लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाºयांना तक्रार केल्या. यात यंत्रणा सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे.आधार कार्ड, बँक खाते, पासपोर्ट फोटो व कुटुंबाची माहिती, असा अर्ज एक नव्हे तर चार-पाच वेळा भरून घेण्यात आला. पुरवठा विभागाने तयार केलेल्या रजिस्टरमध्ये असंख्य मृतक, गाव सोडून गेलेल्या लोकांची नावे समाविष्ट होती. ती नावे वगळण्याची कारवाई बरेच दिवस झालीच नाही. याचा परिणाम धान्याच्या वितरणावर झाला आहे. शासनाने अल्पभूधारक शेतकºयांना सरसकट दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट करून लाभ दिला आहे. अल्प भावात धान्य मिळत असल्याने अनेक श्रीमंत लोकही यात धान्याची उचल करीत असल्याचे समोर येत आहे. लाखो रुपये सबसिडीवर खर्च होत असताना यंत्रणाच ढिसाळ झाली आहे. मागील तीन महिन्यांपासून तालुक्यातील प्रत्येक गावातील स्वस्त धान्य दुकानात पॉस मशीन पाहायला मिळत आहे. शासनाने सुविधा अत्याधुनिक केल्या नाहीत. यामुळे हा सर्व पेच निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती भीषण आहे. शेतकरी व मजूर वर्ग संकटात सापडला आहे. अशावेळी कोट्यवधीचा गैरप्रकार करणाºयांना केवळ बायोमेट्रीकच यंत्रणा लागू करून सुट देण्यात आली आहे. यात गरीबांवरच अन्याय केला जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.याबाबत आष्टी येथील जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष मकरंद देशमुख यांनीही अन्न-नागरी-पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्याकडे तक्रार केली आहे. यात सर्व लाभार्थ्यांना धान्य वितरण करा, पॉस मशीनवर काम होत नसेल तर पूर्वीप्रमाणे वितरण कायम ठेवा, अशी मागणी करण्यात आली आहे. आष्टी तालुक्यात ७० टक्के आधार कार्डची जोडणी झालेली आहे. केंद्र बंद असल्याने अनेकांनी अद्यापही आधार कार्ड काढलेले नाही. शिधापत्रिका तथा आधार कार्डवरील नावांतही त्रूट्या आहेत. या सर्वांमुळे समस्या सुटताना दिसत नाहीत. पॉज व बायोमॅट्रीक प्रणाली वीज पुरवठ्यावर चालणाºया असून ग्रामीण भागात भारनियमन असल्याने याचाही फटका बसत आहे.पाच गावांतील लाभार्थ्यांच्या जिल्हाधिकाºयांकडे तक्रारीसाहूर, माणिकवाडा, भारसवाडा, आष्टी आणि अंतोरा या गावांतील नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नसल्याबाबत तक्रारी जिल्हाधिकाºयांकडे केल्या आहेत. यात बायोमेट्रिक यंत्रणा कमकुवत ठरत असून पॉझ मशीनमध्ये बोटांचे ठसे येत नसल्याचे नमूद आहे. शिवाय नवीन यंत्रणा उपयोगी पडत नसेल तर जुन्याच पद्धतीनुसार धान्याचे वाटप करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.स्वस्त धान्य दुकानांतून सर्वांना धान्याचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बायोमेट्रिक तथा पॉस मशीनचे वाटप करण्यात आले आहे. यात गडबड असल्यास खात्री करून दुसºया दिल्या जाऊ शकतात; पण शासनाच्या नियमानुसारच अंमलबजावणी करावी लागणार आहे.- सीमा गजभिये, तहसीलदार, आष्टी (श.)