शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

स्वस्त धान्य दुकानातील बायोमेट्रिक वादाच्या भोवºयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 22:19 IST

शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर आदी धान्य वाटप केले जाते. यासाठी सुधारित शासन निर्णयाप्रमाणे बायोमट्रिक प्रणाली लागू करण्यात आली.

ठळक मुद्देपॉस मशीन आॅक्सिजनवर : थम्ब दिल्याशिवाय धान्य मिळेना

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर आदी धान्य वाटप केले जाते. यासाठी सुधारित शासन निर्णयाप्रमाणे बायोमट्रिक प्रणाली लागू करण्यात आली. लाभार्थ्यांच्या हाताचा थम्ब घेण्यासाठी पॉस मशीन मिळाल्या; पण या मशीन असंख्य लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसेच स्वीकारत नाही. यामुळे लाभार्थ्यांना धान्य मिळणेच कठीण झाले आहे.स्वस्त धान्य दुकानांत लावलेल्या मशीनचा दर्जा अत्यंत निम्न स्वरूपाचा असल्याने एकूण कारभारच वादाच्या भोवºयात अडकला आहे. ऐन दिवाळी या मुख्य सणाच्या काळात नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागण्याची स्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. या प्रकरणी साहुर, माणिकवाडा, भारसवाडा, आष्टी, अंतोरा येथील लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाºयांना तक्रार केल्या. यात यंत्रणा सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे.आधार कार्ड, बँक खाते, पासपोर्ट फोटो व कुटुंबाची माहिती, असा अर्ज एक नव्हे तर चार-पाच वेळा भरून घेण्यात आला. पुरवठा विभागाने तयार केलेल्या रजिस्टरमध्ये असंख्य मृतक, गाव सोडून गेलेल्या लोकांची नावे समाविष्ट होती. ती नावे वगळण्याची कारवाई बरेच दिवस झालीच नाही. याचा परिणाम धान्याच्या वितरणावर झाला आहे. शासनाने अल्पभूधारक शेतकºयांना सरसकट दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट करून लाभ दिला आहे. अल्प भावात धान्य मिळत असल्याने अनेक श्रीमंत लोकही यात धान्याची उचल करीत असल्याचे समोर येत आहे. लाखो रुपये सबसिडीवर खर्च होत असताना यंत्रणाच ढिसाळ झाली आहे. मागील तीन महिन्यांपासून तालुक्यातील प्रत्येक गावातील स्वस्त धान्य दुकानात पॉस मशीन पाहायला मिळत आहे. शासनाने सुविधा अत्याधुनिक केल्या नाहीत. यामुळे हा सर्व पेच निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती भीषण आहे. शेतकरी व मजूर वर्ग संकटात सापडला आहे. अशावेळी कोट्यवधीचा गैरप्रकार करणाºयांना केवळ बायोमेट्रीकच यंत्रणा लागू करून सुट देण्यात आली आहे. यात गरीबांवरच अन्याय केला जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.याबाबत आष्टी येथील जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष मकरंद देशमुख यांनीही अन्न-नागरी-पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्याकडे तक्रार केली आहे. यात सर्व लाभार्थ्यांना धान्य वितरण करा, पॉस मशीनवर काम होत नसेल तर पूर्वीप्रमाणे वितरण कायम ठेवा, अशी मागणी करण्यात आली आहे. आष्टी तालुक्यात ७० टक्के आधार कार्डची जोडणी झालेली आहे. केंद्र बंद असल्याने अनेकांनी अद्यापही आधार कार्ड काढलेले नाही. शिधापत्रिका तथा आधार कार्डवरील नावांतही त्रूट्या आहेत. या सर्वांमुळे समस्या सुटताना दिसत नाहीत. पॉज व बायोमॅट्रीक प्रणाली वीज पुरवठ्यावर चालणाºया असून ग्रामीण भागात भारनियमन असल्याने याचाही फटका बसत आहे.पाच गावांतील लाभार्थ्यांच्या जिल्हाधिकाºयांकडे तक्रारीसाहूर, माणिकवाडा, भारसवाडा, आष्टी आणि अंतोरा या गावांतील नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नसल्याबाबत तक्रारी जिल्हाधिकाºयांकडे केल्या आहेत. यात बायोमेट्रिक यंत्रणा कमकुवत ठरत असून पॉझ मशीनमध्ये बोटांचे ठसे येत नसल्याचे नमूद आहे. शिवाय नवीन यंत्रणा उपयोगी पडत नसेल तर जुन्याच पद्धतीनुसार धान्याचे वाटप करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.स्वस्त धान्य दुकानांतून सर्वांना धान्याचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बायोमेट्रिक तथा पॉस मशीनचे वाटप करण्यात आले आहे. यात गडबड असल्यास खात्री करून दुसºया दिल्या जाऊ शकतात; पण शासनाच्या नियमानुसारच अंमलबजावणी करावी लागणार आहे.- सीमा गजभिये, तहसीलदार, आष्टी (श.)