शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बोरखेडी ते सालई (कला) रस्त्याला अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:21 IST

शासन रस्ता विकासावर भर देत असले तरी नेते मंडळी आपणच हे काम केल्याचे सांगण्यात व्यस्त दिसतात; पण दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांची जबाबदारी घेण्यास कुणी तयार नसतात.

ठळक मुद्देबोर प्रकल्पासाठी कमी अंतराचा मार्ग : पर्यटकांना होतोय सर्वाधिक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/झडशी : शासन रस्ता विकासावर भर देत असले तरी नेते मंडळी आपणच हे काम केल्याचे सांगण्यात व्यस्त दिसतात; पण दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांची जबाबदारी घेण्यास कुणी तयार नसतात. असाच प्रकार सेलू तालुक्यात घडत आहे. बोरखेडी (कला) ते सालई (कला) रस्त्यावर अवकळा आली आहे. हा रस्ता बोर व्याघ्र प्रकल्प तथा कारंजा तालुक्यात शिरण्यासाठी कमी अंतराचा आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे अद्याप कुणाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.झडशी, बोरखेडी कला मार्गे सालई (कला) हा सेलू येथून बोर व्याघ्र प्रकल्प आणि कारंजा तालुक्यात प्रवेश करण्यासाठी कमी अंतराचा मार्ग आहे. इतकेच नव्हे तर माजी जि.प. अध्यक्ष यांच्या गावात जाणारा हा रस्ता आहे. तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांच्या हस्ते या मार्गाचे खडीकरण तथा काही अंतरापर्यंत डांबरीकरण करण्यात आले होते. आमगाव, नवरगाव, माळेगाव (ठेका) या परिसरात गवळी समाज अधिक आहे. त्यांना दररोज वर्धा-सेलू शहरात दूध विक्रीस जाण्यास सोईचे झाले होते; पण या मार्गावर कुठल्याही अधिकारी व नेत्याचे लक्ष दिसत नाही.बोर व्याघ प्रकल्प झाल्यापासून पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. बोरखेडी-सालई रस्ता जंगल भागातून गेला आहे. यामुळे नागरिकांना जंगल सफारीचा आनंद मिळतो. या मार्गाने वन्य प्राण्यांचे दर्शन होते. काही वर्षांपूर्वी हा रस्ता वाहून गेला होता. संबंधित विभागाच्या अधिकाºयांची भेट घेत विचारणा केली असता पूल व रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली होती; पण जंगलातील ५०० मिटर रस्त्यासाठी वनविभागाने आडकाठी आणली. यातही सामंजस्याने रस्ता दुरूस्त केला गेला; पण त्यानंतर कुणीही फिरकले नसल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या रस्त्यावर खड्डे पडले असून पुलाच्या सळाखी उघड्या पडल्या आहेत. याकडे लक्ष देत दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे.सळाखी उघड्या पडल्याने अपघाताचा धोकासालई (कला) ते बोरखेडी (कला) या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर असलेल्या पुलावरील सळाखी उघड्या पडल्या आहेत. यामुळे दुचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत. परिणामी, पर्यटकांनाच सर्वाधिक त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे दिसते. जिल्हा प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.