शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

बोरखेडी ते सालई (कला) रस्त्याला अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:21 IST

शासन रस्ता विकासावर भर देत असले तरी नेते मंडळी आपणच हे काम केल्याचे सांगण्यात व्यस्त दिसतात; पण दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांची जबाबदारी घेण्यास कुणी तयार नसतात.

ठळक मुद्देबोर प्रकल्पासाठी कमी अंतराचा मार्ग : पर्यटकांना होतोय सर्वाधिक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/झडशी : शासन रस्ता विकासावर भर देत असले तरी नेते मंडळी आपणच हे काम केल्याचे सांगण्यात व्यस्त दिसतात; पण दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांची जबाबदारी घेण्यास कुणी तयार नसतात. असाच प्रकार सेलू तालुक्यात घडत आहे. बोरखेडी (कला) ते सालई (कला) रस्त्यावर अवकळा आली आहे. हा रस्ता बोर व्याघ्र प्रकल्प तथा कारंजा तालुक्यात शिरण्यासाठी कमी अंतराचा आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे अद्याप कुणाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.झडशी, बोरखेडी कला मार्गे सालई (कला) हा सेलू येथून बोर व्याघ्र प्रकल्प आणि कारंजा तालुक्यात प्रवेश करण्यासाठी कमी अंतराचा मार्ग आहे. इतकेच नव्हे तर माजी जि.प. अध्यक्ष यांच्या गावात जाणारा हा रस्ता आहे. तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांच्या हस्ते या मार्गाचे खडीकरण तथा काही अंतरापर्यंत डांबरीकरण करण्यात आले होते. आमगाव, नवरगाव, माळेगाव (ठेका) या परिसरात गवळी समाज अधिक आहे. त्यांना दररोज वर्धा-सेलू शहरात दूध विक्रीस जाण्यास सोईचे झाले होते; पण या मार्गावर कुठल्याही अधिकारी व नेत्याचे लक्ष दिसत नाही.बोर व्याघ प्रकल्प झाल्यापासून पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. बोरखेडी-सालई रस्ता जंगल भागातून गेला आहे. यामुळे नागरिकांना जंगल सफारीचा आनंद मिळतो. या मार्गाने वन्य प्राण्यांचे दर्शन होते. काही वर्षांपूर्वी हा रस्ता वाहून गेला होता. संबंधित विभागाच्या अधिकाºयांची भेट घेत विचारणा केली असता पूल व रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली होती; पण जंगलातील ५०० मिटर रस्त्यासाठी वनविभागाने आडकाठी आणली. यातही सामंजस्याने रस्ता दुरूस्त केला गेला; पण त्यानंतर कुणीही फिरकले नसल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या रस्त्यावर खड्डे पडले असून पुलाच्या सळाखी उघड्या पडल्या आहेत. याकडे लक्ष देत दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे.सळाखी उघड्या पडल्याने अपघाताचा धोकासालई (कला) ते बोरखेडी (कला) या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर असलेल्या पुलावरील सळाखी उघड्या पडल्या आहेत. यामुळे दुचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत. परिणामी, पर्यटकांनाच सर्वाधिक त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे दिसते. जिल्हा प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.