शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

बोरखेडी ते सालई (कला) रस्त्याला अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:21 IST

शासन रस्ता विकासावर भर देत असले तरी नेते मंडळी आपणच हे काम केल्याचे सांगण्यात व्यस्त दिसतात; पण दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांची जबाबदारी घेण्यास कुणी तयार नसतात.

ठळक मुद्देबोर प्रकल्पासाठी कमी अंतराचा मार्ग : पर्यटकांना होतोय सर्वाधिक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/झडशी : शासन रस्ता विकासावर भर देत असले तरी नेते मंडळी आपणच हे काम केल्याचे सांगण्यात व्यस्त दिसतात; पण दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांची जबाबदारी घेण्यास कुणी तयार नसतात. असाच प्रकार सेलू तालुक्यात घडत आहे. बोरखेडी (कला) ते सालई (कला) रस्त्यावर अवकळा आली आहे. हा रस्ता बोर व्याघ्र प्रकल्प तथा कारंजा तालुक्यात शिरण्यासाठी कमी अंतराचा आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे अद्याप कुणाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.झडशी, बोरखेडी कला मार्गे सालई (कला) हा सेलू येथून बोर व्याघ्र प्रकल्प आणि कारंजा तालुक्यात प्रवेश करण्यासाठी कमी अंतराचा मार्ग आहे. इतकेच नव्हे तर माजी जि.प. अध्यक्ष यांच्या गावात जाणारा हा रस्ता आहे. तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांच्या हस्ते या मार्गाचे खडीकरण तथा काही अंतरापर्यंत डांबरीकरण करण्यात आले होते. आमगाव, नवरगाव, माळेगाव (ठेका) या परिसरात गवळी समाज अधिक आहे. त्यांना दररोज वर्धा-सेलू शहरात दूध विक्रीस जाण्यास सोईचे झाले होते; पण या मार्गावर कुठल्याही अधिकारी व नेत्याचे लक्ष दिसत नाही.बोर व्याघ प्रकल्प झाल्यापासून पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. बोरखेडी-सालई रस्ता जंगल भागातून गेला आहे. यामुळे नागरिकांना जंगल सफारीचा आनंद मिळतो. या मार्गाने वन्य प्राण्यांचे दर्शन होते. काही वर्षांपूर्वी हा रस्ता वाहून गेला होता. संबंधित विभागाच्या अधिकाºयांची भेट घेत विचारणा केली असता पूल व रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली होती; पण जंगलातील ५०० मिटर रस्त्यासाठी वनविभागाने आडकाठी आणली. यातही सामंजस्याने रस्ता दुरूस्त केला गेला; पण त्यानंतर कुणीही फिरकले नसल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या रस्त्यावर खड्डे पडले असून पुलाच्या सळाखी उघड्या पडल्या आहेत. याकडे लक्ष देत दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे.सळाखी उघड्या पडल्याने अपघाताचा धोकासालई (कला) ते बोरखेडी (कला) या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर असलेल्या पुलावरील सळाखी उघड्या पडल्या आहेत. यामुळे दुचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत. परिणामी, पर्यटकांनाच सर्वाधिक त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे दिसते. जिल्हा प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.