शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

बोर प्रकल्पाची डागडुजी दुर्लक्षित

By admin | Updated: December 1, 2014 22:59 IST

सेलू तालुक्यातील हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यात हातभार लागलेल्या बोरधरणाला २०१४ मध्ये ५० वर्षे पूर्ण झालीत़ हरितक्रांतीचे स्वप्न दाखविणाऱ्या या धरणाचा उद्देश कालव्याची बिकट परिस्थिती,

बोरधरण : सेलू तालुक्यातील हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यात हातभार लागलेल्या बोरधरणाला २०१४ मध्ये ५० वर्षे पूर्ण झालीत़ हरितक्रांतीचे स्वप्न दाखविणाऱ्या या धरणाचा उद्देश कालव्याची बिकट परिस्थिती, कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे अर्थवट राहिला आहे. कित्येक वर्षांपासून प्रकल्पाची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली नाही़ यामुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा स्पष्ट होत आहे़ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर झाडा-झुडपांनी वेढलेल्या उंच टेकड्यांच्या मधोमध १९५७ मध्ये सुमारे जवळपास ८ वर्षांच्या प्रदीर्घ परिश्रमानंतर बोरधरण बांधण्यात आले़ या धरणाला यशवंत धरण म्हणून ओळखले जाऊ लागले़ धरणाचे क्षेत्रफळ १४५५ हेक्टर असून धरणापासून २१ किमीचा मुख्य कालवा आहे. बोरधरणाच्या कालव्याची डागडुजी, देखभाल व रंगरंगोटीकरिता शासनाकडून भरपूर निधी येतो; पण कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराने व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे धरणाचे खस्ताहाल झाले आहे़ धरणाच्या मुख्य भिंतीवर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढलेली आहेत़ गत दहा वर्षांपासून धरणांची रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. मागील पाच वर्षांत क्षेत्राचे आमदार हे पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष असतानाही सदर धरणाच्या सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. सेलू पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांत अनियमितता दिसून येत असून एक ते दोनच कर्मचारी कर्तव्यावर असतात. यामुळे बोर प्रकल्पाबाबतच्या कामांतही अनियमितता आल्याचे दिसून येत आहे़ अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने प्रकल्पच धोक्यात येण्याचे संकेत आहेत़ कर्मचारी ते शासन सर्वच धरणाच्या सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते़(वार्ताहर)