शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

‘बोर’ अन् ‘धाम’ देणार रबी हंगामात शेतकऱ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

उन्हाळ्याच्या दिवसात महाकाळी येथील धाम प्रकल्प मृत जलसाठ्यावर आल्याने वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. तर बोर प्रकल्पातही नाममात्र जलसाठा शिल्लक राहिल्याने सेलूसह परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या.

ठळक मुद्देपाठबंधारे विभागाने केले उपलब्ध पाण्याचे नियोजन : पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत वर्षी अल्प पाऊस झाल्याने हिवाळ्याच्या दिवसातच उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले होत. त्यावेळी सिंचनासाठी नाममात्र पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु, यंदा पावसाच्या दिवसात जलाशयांमधील पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. बोर प्रकल्प ८०.९९ टक्के तर धाम प्रकल्प १०० टक्के भरला असून रबी पिकांना वेळीच पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने या दोन्ही जलाशयांमधून पाटबंधारे विभाग मुबलक पाणी सोडणार आहे. तसे नियोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे रबी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासाच मिळणार आहे.उन्हाळ्याच्या दिवसात महाकाळी येथील धाम प्रकल्प मृत जलसाठ्यावर आल्याने वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. तर बोर प्रकल्पातही नाममात्र जलसाठा शिल्लक राहिल्याने सेलूसह परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. बोर नदीचे पात्र कोरडे झाल्याने तसेच सेलूतील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याने सेलू नगरपंचायतीच्या मागणीला केंद्रस्थानी ठेऊन पाटबंधारे विभागाने बोर प्रकारातील १ दलघमी पाणी उन्हाळ्याच्या दिवसात सोडले होते. तर वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमध्ये भीषण जलसंकट तयार झाल्याने धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचलही करण्यात आली होती. एकूणच उपलब्ध जलसाठा पाऊस सुरू होईपर्यंत कसा पुरविता येईल यासाठी नियोजन करताना सिंचनासाठी सोडण्यात येणाºया पाण्यात बºयापैकी कपात त्यावेळी करण्यात आली होती. पण, सध्या बोर प्रकल्प ८०.९९ टक्के तर धाम प्रकल्प १०० टक्के भरल्याने यंदा सिंचनासाठी मुबलक पाणी शेतकऱ्याना मिळणार आहे. तसे नियोजनही वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. शिवाय तसा प्रस्ताव अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण नागपूर यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. असे असले तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर होणे गरजेचे आहे.बोरचा १०,५०० हेक्टर तर धामचा ३,९८५ हेक्टरला होणार लाभरबी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना सिंचनासाठी वेळीच पाणी देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. रबी हंगामातील पिकांना सिंचनासाठी बोर प्रकल्पातून ७० दलघमी तर धाम प्रकल्पातून ३१.८८ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. धाम मधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा ३ हजार ९८५ हेक्टरवरील पिकांना तर बोर मधून सोडण्यात येणाºया पाण्याचा १० हजार ५०० हेक्टरवरील पिकांना लाभ मिळणार आहे.धाम मधील १२.८७ दलघमी पाणी पिण्यासाठी राखीवउन्हाळ्याच्या दिवसात धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचल करून वर्धा शहरासह १३ गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्यात आली होती. तर यंदा पावसाळ्यात हा जलाशय १०० टक्के भरल्याने उपयुक्त जलसाठ्यापैकी १२.८७ दलघमी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे औद्योगीक वापरासाठी या प्रकल्पातून ३.१३ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :Bor Damबोर धरण