शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘बोर’ अन् ‘धाम’ देणार रबी हंगामात शेतकऱ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

उन्हाळ्याच्या दिवसात महाकाळी येथील धाम प्रकल्प मृत जलसाठ्यावर आल्याने वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. तर बोर प्रकल्पातही नाममात्र जलसाठा शिल्लक राहिल्याने सेलूसह परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या.

ठळक मुद्देपाठबंधारे विभागाने केले उपलब्ध पाण्याचे नियोजन : पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत वर्षी अल्प पाऊस झाल्याने हिवाळ्याच्या दिवसातच उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले होत. त्यावेळी सिंचनासाठी नाममात्र पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु, यंदा पावसाच्या दिवसात जलाशयांमधील पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. बोर प्रकल्प ८०.९९ टक्के तर धाम प्रकल्प १०० टक्के भरला असून रबी पिकांना वेळीच पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने या दोन्ही जलाशयांमधून पाटबंधारे विभाग मुबलक पाणी सोडणार आहे. तसे नियोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे रबी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासाच मिळणार आहे.उन्हाळ्याच्या दिवसात महाकाळी येथील धाम प्रकल्प मृत जलसाठ्यावर आल्याने वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. तर बोर प्रकल्पातही नाममात्र जलसाठा शिल्लक राहिल्याने सेलूसह परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. बोर नदीचे पात्र कोरडे झाल्याने तसेच सेलूतील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याने सेलू नगरपंचायतीच्या मागणीला केंद्रस्थानी ठेऊन पाटबंधारे विभागाने बोर प्रकारातील १ दलघमी पाणी उन्हाळ्याच्या दिवसात सोडले होते. तर वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमध्ये भीषण जलसंकट तयार झाल्याने धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचलही करण्यात आली होती. एकूणच उपलब्ध जलसाठा पाऊस सुरू होईपर्यंत कसा पुरविता येईल यासाठी नियोजन करताना सिंचनासाठी सोडण्यात येणाºया पाण्यात बºयापैकी कपात त्यावेळी करण्यात आली होती. पण, सध्या बोर प्रकल्प ८०.९९ टक्के तर धाम प्रकल्प १०० टक्के भरल्याने यंदा सिंचनासाठी मुबलक पाणी शेतकऱ्याना मिळणार आहे. तसे नियोजनही वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. शिवाय तसा प्रस्ताव अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण नागपूर यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. असे असले तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर होणे गरजेचे आहे.बोरचा १०,५०० हेक्टर तर धामचा ३,९८५ हेक्टरला होणार लाभरबी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना सिंचनासाठी वेळीच पाणी देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. रबी हंगामातील पिकांना सिंचनासाठी बोर प्रकल्पातून ७० दलघमी तर धाम प्रकल्पातून ३१.८८ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. धाम मधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा ३ हजार ९८५ हेक्टरवरील पिकांना तर बोर मधून सोडण्यात येणाºया पाण्याचा १० हजार ५०० हेक्टरवरील पिकांना लाभ मिळणार आहे.धाम मधील १२.८७ दलघमी पाणी पिण्यासाठी राखीवउन्हाळ्याच्या दिवसात धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचल करून वर्धा शहरासह १३ गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्यात आली होती. तर यंदा पावसाळ्यात हा जलाशय १०० टक्के भरल्याने उपयुक्त जलसाठ्यापैकी १२.८७ दलघमी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे औद्योगीक वापरासाठी या प्रकल्पातून ३.१३ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :Bor Damबोर धरण