शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

‘बोर’ अन् ‘धाम’ देणार रबी हंगामात शेतकऱ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

उन्हाळ्याच्या दिवसात महाकाळी येथील धाम प्रकल्प मृत जलसाठ्यावर आल्याने वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. तर बोर प्रकल्पातही नाममात्र जलसाठा शिल्लक राहिल्याने सेलूसह परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या.

ठळक मुद्देपाठबंधारे विभागाने केले उपलब्ध पाण्याचे नियोजन : पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत वर्षी अल्प पाऊस झाल्याने हिवाळ्याच्या दिवसातच उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले होत. त्यावेळी सिंचनासाठी नाममात्र पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु, यंदा पावसाच्या दिवसात जलाशयांमधील पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. बोर प्रकल्प ८०.९९ टक्के तर धाम प्रकल्प १०० टक्के भरला असून रबी पिकांना वेळीच पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने या दोन्ही जलाशयांमधून पाटबंधारे विभाग मुबलक पाणी सोडणार आहे. तसे नियोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे रबी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासाच मिळणार आहे.उन्हाळ्याच्या दिवसात महाकाळी येथील धाम प्रकल्प मृत जलसाठ्यावर आल्याने वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. तर बोर प्रकल्पातही नाममात्र जलसाठा शिल्लक राहिल्याने सेलूसह परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. बोर नदीचे पात्र कोरडे झाल्याने तसेच सेलूतील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याने सेलू नगरपंचायतीच्या मागणीला केंद्रस्थानी ठेऊन पाटबंधारे विभागाने बोर प्रकारातील १ दलघमी पाणी उन्हाळ्याच्या दिवसात सोडले होते. तर वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमध्ये भीषण जलसंकट तयार झाल्याने धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचलही करण्यात आली होती. एकूणच उपलब्ध जलसाठा पाऊस सुरू होईपर्यंत कसा पुरविता येईल यासाठी नियोजन करताना सिंचनासाठी सोडण्यात येणाºया पाण्यात बºयापैकी कपात त्यावेळी करण्यात आली होती. पण, सध्या बोर प्रकल्प ८०.९९ टक्के तर धाम प्रकल्प १०० टक्के भरल्याने यंदा सिंचनासाठी मुबलक पाणी शेतकऱ्याना मिळणार आहे. तसे नियोजनही वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. शिवाय तसा प्रस्ताव अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण नागपूर यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. असे असले तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर होणे गरजेचे आहे.बोरचा १०,५०० हेक्टर तर धामचा ३,९८५ हेक्टरला होणार लाभरबी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना सिंचनासाठी वेळीच पाणी देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. रबी हंगामातील पिकांना सिंचनासाठी बोर प्रकल्पातून ७० दलघमी तर धाम प्रकल्पातून ३१.८८ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. धाम मधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा ३ हजार ९८५ हेक्टरवरील पिकांना तर बोर मधून सोडण्यात येणाºया पाण्याचा १० हजार ५०० हेक्टरवरील पिकांना लाभ मिळणार आहे.धाम मधील १२.८७ दलघमी पाणी पिण्यासाठी राखीवउन्हाळ्याच्या दिवसात धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचल करून वर्धा शहरासह १३ गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्यात आली होती. तर यंदा पावसाळ्यात हा जलाशय १०० टक्के भरल्याने उपयुक्त जलसाठ्यापैकी १२.८७ दलघमी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे औद्योगीक वापरासाठी या प्रकल्पातून ३.१३ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :Bor Damबोर धरण