शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

यंदाही कपाशी पिकावर बोंडअळीचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 05:00 IST

सोयाबीनचे पीक पूर्णत: उध्वस्त झाले असताना कपाशी पिकाची आस असलेल्या शेतकऱ्यांवर या माध्यमातून दुहेरी संकट आले आहे. अंदोरी येथील शेतकरी सुरेश दयणे यांनी चार एक शेत जमिनीत विविध कंपनीच्या ११५ सुपर कॉटन कपाशी बियाण्याची लागवड केली. पिकाची मशागत, निंदण, फवारणी खते आदींवर भरपूर खर्च करण्यात आला. पीक सुद्धा चांगले बहरले मात्र या पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे झाडांवरील सर्व कपाशीचे बोंडे पोखरली गेली.

ठळक मुद्देदुहेरी संकटात सापडला शेतकरी : कपाशीतून निघताहेत अळ्या

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकासोबतच कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. त्यातच कपाशीच्या झाडाला बऱ्यापैकी बोंडे असली तरी बोंडअळीचे आक्रमणामुळे हे पीक उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहे. कपाशी पीकावर बोंडअळी येणार नाही अशा फसव्या जाहीराती करून संबंधीत बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांची लूट केली असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. सोयाबीनचे पीक पूर्णत: उध्वस्त झाले असताना कपाशी पिकाची आस असलेल्या शेतकऱ्यांवर या माध्यमातून दुहेरी संकट आले आहे. अंदोरी येथील शेतकरी सुरेश दयणे यांनी चार एक शेत जमिनीत विविध कंपनीच्या ११५ सुपर कॉटन कपाशी बियाण्याची लागवड केली. पिकाची मशागत, निंदण, फवारणी खते आदींवर भरपूर खर्च करण्यात आला. पीक सुद्धा चांगले बहरले मात्र या पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे झाडांवरील सर्व कपाशीचे बोंडे पोखरली गेली. त्यामुळे ऐन वेळेवर हाती आलेल्या पिकाची माती झाली आहे. तालुक्यातील बहुतांश शेतात हीच परिस्थिती असल्याने शेतकरऱ्यांच्या कपाळावर आड्या पडल्या आहे.शेतकरी दयणे यांनी याबाबतची तक्रार कृषी विभागाकडे केली असता या विभागाचे एस.डी. गुट्टे, जी.एस. वंजारी व एस.एल.बुधवत यांनी सर्व शेताची पाहणी केली. तसेच याबाबतच्या नुकसानीचा अहवाल वरिष्ठाकडे पाठविला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बोंडअळीमुक्तीची खोटी जाहिरात करून शेतकऱ्यांची फसवेगीरी करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :agricultureशेती