शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

बोंडअळीचा पलटवार; शेतकरी हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 20:34 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि बोंंडअळीेचं आक्रमण शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायचे नाव घेत नाही. मागील वर्षी कापूस उत्पादकांच्या नाकीनव आणणाऱ्या बोंडअळीने यावर्षी सुरुवातीलाच आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच झाल्याने शेतकरी हादरला आहेत.

ठळक मुद्देयेरे माझ्या मागल्या : यंदाही कापूस उत्पादकांवर आर्थिक संकटाची छाया

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : निसर्गाचा लहरीपणा आणि बोंंडअळीेचं आक्रमण शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायचे नाव घेत नाही. मागील वर्षी कापूस उत्पादकांच्या नाकीनव आणणाऱ्या बोंडअळीने यावर्षी सुरुवातीलाच आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच झाल्याने शेतकरी हादरला आहेत.यावर्षी बोंडअळीचे आक्रमण होताच कृषी विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे व पिकही लहान असल्याने त्यावर नियंत्रण ठेवता आले. परंतु आता कपाशीतून चालणेही कठीण झाले आहे. दत्तपूर शिवारात जीवन पाहुणे व मोरेश्वर हुलके यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात बोंडअळी आढळून आली. पाहुणे यांच्या शेतातील २५ टक्के बोंडांना सध्या किड लागल्याने ती किड शेतात इतरत्र पसरू नये म्हणून त्यांनी किडग्रस्त बोंड तोडून घरी वाळवायला सुरुवात केली आहे. मागील वर्षीही नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातच बोंडअळींचा उद्रेक दिसून आला होता. परिणामी शेतकºयांना एकरी २ ते ३ क्विंटल कापसावरच समाधान मानावे लागले. कमी पर्जन्यमानामुळे कोरडवाहू शेतातील कपाशी वाळत असून राहिलेली बोंड फुटू लागली आहे. परंतु त्या बोंडातील सरकी किडीने पोखरल्याने कापूस वजनाला हलका भरत आहे. तसेच दर्जाची खालावलेला आहे. त्यामुळे याहीवर्षी कापुस उत्पादकांना बोंडअळीमुळे चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.कृषी विभाग सुस्तचबोंडअळी नियंत्रणात असल्याचा कृषी विभागाचा समज असल्यामुळे कृषी विभागही सुस्त दिसत आहे. कृषी सहायकांनी निरीक्षकाणासाठी निवडलेल्या शेतामध्ये बोंडअळी आढळली. परंतु ती ओळखणे कठीण आहे. त्यामुळे वर-वर पाहिले असता अळी दिसत नाही. त्यासाठी ते फोडून पाहणे गरजेचे आहे. सुरूवातीला लावलेले कामगंध सापळेही दिसेनासे झाले आहे. रात्रीची वीज नसल्यामुळे लाईट ट्रॅपचाही वापर होत नाही. फवारणी करणे शक्य नाही. या सर्व अडचणींतून बोंड अळीवर नियंत्रण कसे मिळविता येईल, हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.बोंडअळीचे अनुदान नाहीमागील वर्षी आलेल्या बोंडअळीचे शासनाने जाहीर केलेले पहिल्या टप्प्याचे हेक्टरी ६ हजार ८०० रूपयाचे अनुदान आजपर्यंत मिळाले नाही. रक्कम आल्यावर जमा होणार असल्याचे सांगण्यात येते. बियाणे कंपनी व विमाकंपनी कडून येणारी उर्वरीत रक्कम कधी जमा होईल. हे सांगण कठीण आहे.रासायनिक खत व पाण्याच्या अतिवापर ज्या शेतकऱ्यांनी केला त्याच्या शेतात बोंडअळी आढळून येत आहे. कृषी विभागाला शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे सुरूवातीला बोंडअळीवर नियंत्रण ठेवता आले. आताही शेतकऱ्यांनी कामगंध सापळे लाईट ट्रॅप, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काचा वापर केल्यास गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण ठेवता येते. कपाशीला पाणी देऊ नये. त्यामुळे परिपक्व बोंडे लवकर फुटतील व चांगल्या प्रतिचा कापूस घेता येईल.प्रशांत भोयर, कृषी सहाय्यक, पवनारनैसर्गिक आपत्तीचे अनुदान नाहीमागच्या वर्षी वादळ व मुसळधार पावसामुळे पवनार शिवारात मोठ्या प्रमाणात कपाशीचे नुकसान झाले होते. त्याचा सर्व्हे झाल्यानंतर शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली होती. त्याचे अनुदानही महसूल विभागाला प्राप्त झालेले आहे. परंतु हे अनुदान कृषी विभागाने वाटायचे की महसूल विभागाने, हे कोडे न सुटल्यामुळे ते अनुदान पडूप आहे. कृषी विभागामार्फत महसूल विभागाला लाभार्थ्यांच्या याद्या दिल्या आहे. परंतु त्या यादीमध्ये लाभार्थ्यांचे खाते क्रमांक नाही. तलाठ्याने बोंडअळीचे अनुदान जमा करताना खाते क्रमांक दिलेले असतानाही खाते क्रमांक नसलेल्या याद्या देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती