शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

१२५ शेतकºयांच्या बीटी कपाशीवर बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:40 IST

कपाशीच्या बीटी वाणावर १२० दिवसापर्यंत बोंडअळीचा प्रभाव होत नसल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येते. असे असतानाही यंदाच्या खरीपात शेंदरी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसून आला.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : अंकुरच्या ३०२८ या वाणावार सर्वाधिक प्रादूर्भाव

सुरेंद्र डाफ ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : कपाशीच्या बीटी वाणावर १२० दिवसापर्यंत बोंडअळीचा प्रभाव होत नसल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येते. असे असतानाही यंदाच्या खरीपात शेंदरी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसून आला. यामुळे आर्वी तालुक्यातील २४ कृषी मुख्यालयांतर्गत १३७ गावातील १२८ कपाशी पिकाच्या प्लॉटचे तालुका कृषी कार्यालयाने सर्वेक्षण केले. त्यातील १२५ शेतकºयांच्या कृषी प्लॉटवर बोंडअळीचा प्रादूर्भाव आढळून आला. यातील बहुतांश प्लॉट अंकूर कंपनीच्या ३०२८ या वाणाचे असल्याचे अहवालात नमूद आहे.आर्वी तालुक्यात एकूण २४ कृषी मुख्यालये असून यात खरांगणा, पिंपळखुटा, सोरटा, विरूळ, पानवाडी, दहेगाव (गोंडी), मदना, रसुलाबाद, पाचोड, रोहणा, वाढोणा, पांजरा (बोथली), आर्वी नांदोरा, बेढोणा, देऊरवाडा, जळगाव, वर्धमनेरी, नांदपूर, शिरपू, धनोडी (बहा.), नेरी, वाठोडा, दहेगाव (मु.) या २४ गावांचा समावेश येतो. या मुख्यालयांतर्गत येणाºया गवातील शेतकºयांच्या १२८ प्लॉटवर बोंडअळीचे सर्वेक्षण झाले. यात आढळलेल्या बोंडअळीमुळे बियाणे कंपन्यांकडून शेतकºयांची फासवणूक होत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये असाच प्रकार घडला होता. यावेळी बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.यंदाच्या हंगामातही हाच प्रकार झाल्याचे समोर आले आहे. यंदाच्या हांगामात या कंपन्यांवर काय कार्यवाही होते हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. या कीड सर्वेक्षणासाठी कपाशी पिकाच्या दहा वाणांची निवड करून बोंड अळींच्या किडींचे सर्वेक्षण करण्यात आले होते.खरीपातील संकटाने शेतकरी हैराणयंदाच्या खरीप हंगामात कपाशीवर आलेल्या या संकटात जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या संकटात सापडलेल्या शेतकºयांना शासनाच्यावतीने मदत मिळण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. या शेतकºयांना मदत देण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे.गत दोन हंगामापासून कपाशी बीटी बियाण्यांवर मोठ्या प्रमाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यात आर्वी तालुक्यातील २४ कृषी मुख्यालयांतर्गत कपाशी पिकाच्या बोंडअळींचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यातून बियाणे कंपन्यांचा रोग प्रतिकारक्षम बियाणे असल्याचा दावा फोल ठरला आहे.- प्रशांत गुल्हाने, तालुका कृषी अधिकारी, आर्वी