शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

खडकाळ जमिनीवर फुलविले हिरवे स्वप्न

By admin | Updated: January 24, 2016 01:57 IST

प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे, या सार्थ उक्तीप्रमाणे चामला येथील शेतकऱ्याने आपल्या दहा एकर खडकाळ शेतात अनेक वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर हिरवे स्वप्न फुलविले.

चामला गावातील यशोगाथा : खडकांचे सात थर फोडून खोदल्या पाच विहिरीअमोल सोटे आष्टी (श.)प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे, या सार्थ उक्तीप्रमाणे चामला येथील शेतकऱ्याने आपल्या दहा एकर खडकाळ शेतात अनेक वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर हिरवे स्वप्न फुलविले. प्रामाणिकता, जिद्द, चिकाटी व परिश्रमाचा त्यांनी आगळाच आदर्श घालून दिला आहे. रेड झोन व डोंगरमाथ्यावर वसलेले चामला गाव. येथे वर्षभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अशा कठीण परिस्थितीत ७० वर्षीय शंकर मदनकर यांनी स्वत:च्या दहा एकर शेतीला दगडाच्या संघर्षातून फुलविण्याचा निर्धार केला. यासाठी श्रीकृष्ण, हरिष व सुरेश या तीन मुलांना सोबत घेऊन २००३ मध्ये शेतात पहिली विहिर खोदली. ८० फुट खोलवर दगड खोदून पाणी लागले. एका विहिरीच्या खोदकामाला ३ वर्षे लागलीत. दगडांचे थर लागले; पण ते हिंमत हरले नाही. ७२ फुटावर मऊ भाग लागला आणि पाणी मुबलक मिळाल्याने त्यांचे समाधान झाले.यानंतर शासकीय योजनांच्या मागे न लागता कष्टाच्या पैशातून संत्र्याची ३०० झाडे लावली. दगड व मुरूम यात कसे खड्डे खोदायचे याचा सतत विचार; पण यावरही मात केली आणि प्रयत्नांना यश आले. संत्रा बगिच्याची देखभाल व्यवस्थित केल्याने २०११ पासून दरवर्षी २ ते ३ लाख रुपयांत बगिचाची विक्री होते. सोबतच कपाशी, तूर, सोयाबीन, मिरची भाजीपाला आदी पिके त्यांनी घेतली. यात नफा मिळाला; पण सिंचनासाठी पाणी कमी पडत होते. यामुळे २००७ मध्ये त्यांनी दुसरी विहिर खोदली. २०११ मध्ये आणखी दोन विहिरी खोदल्या. पैकी दोनच विहिरींना पाणी लागले. अखेरचा उपाय म्हणून आणखी एक विहीर खोदण्यास गतवर्षी सुरूवात केली. सध्या ५५ फुट खोदकाम झाले. आता मऊ भाग व पाणी लागले. या पाण्यातून नवीन संत्राची ३०० झाडे तयार करीत आहे.वनविभागाचा सर्व्हे शेताला लागून आहे. मोजणी झाली तेव्हा वनकर्मचारी शंकरच्या शेतात आले. तीन एकर शेती वनविभागाच्या हद्दीत आहे, असा दम दिला. याला न घाबरता त्यांनी न्यायालयात धाव घेतली. माझा हक्क न्यायालय मिळवून देईल, यावर विश्वास असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. एका तपापासून सुरू आहे संघर्षगावापासून अर्धा किमी अंतरावर शेती आहे. वन्यप्राण्यांचा हैदोस असल्याने दररोज कुटुंबातील एका सदस्याला शेतात रक्षणासाठी जावे लागते. ऊन्ह, वारा, पाऊसासोबत १२ वर्षांचा संघर्ष आजही जिद्दीने सुरू आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही शेती प्रेरणा व नवीन दिशा देणारी ठरत आहे. कृषी विभागाचे आणखी तांत्रिक मार्गदर्शन लाभल्यास शेतीचे नंदनवन होऊ शकेल.शेतकऱ्यांना शासन विविध योजनांचा लाभ देतात. चामला येथील शेतकरी शंकर मदनकर यांच्या शेताला भेट देऊन ईस्त्राईल पद्धतीच्या संत्रा लागवडीस प्रोत्साहित करणार आहे.- अरुण बलसाने, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.खडकाळ भागात विहिरीचे खोदकाम करताना त्रास झाला; प्रामाणिक कष्टाने फळ मिळाले. मी व माझी तीनही मुले दिवसभर शेतीला वेळ देतो. यामुळे आर्थिक बाजू भक्कम झाली.- शंकर मदनकर, शेतकरी, चामला.