शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

खडकाळ जमिनीवर फुलविले हिरवे स्वप्न

By admin | Updated: January 24, 2016 01:57 IST

प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे, या सार्थ उक्तीप्रमाणे चामला येथील शेतकऱ्याने आपल्या दहा एकर खडकाळ शेतात अनेक वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर हिरवे स्वप्न फुलविले.

चामला गावातील यशोगाथा : खडकांचे सात थर फोडून खोदल्या पाच विहिरीअमोल सोटे आष्टी (श.)प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे, या सार्थ उक्तीप्रमाणे चामला येथील शेतकऱ्याने आपल्या दहा एकर खडकाळ शेतात अनेक वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर हिरवे स्वप्न फुलविले. प्रामाणिकता, जिद्द, चिकाटी व परिश्रमाचा त्यांनी आगळाच आदर्श घालून दिला आहे. रेड झोन व डोंगरमाथ्यावर वसलेले चामला गाव. येथे वर्षभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अशा कठीण परिस्थितीत ७० वर्षीय शंकर मदनकर यांनी स्वत:च्या दहा एकर शेतीला दगडाच्या संघर्षातून फुलविण्याचा निर्धार केला. यासाठी श्रीकृष्ण, हरिष व सुरेश या तीन मुलांना सोबत घेऊन २००३ मध्ये शेतात पहिली विहिर खोदली. ८० फुट खोलवर दगड खोदून पाणी लागले. एका विहिरीच्या खोदकामाला ३ वर्षे लागलीत. दगडांचे थर लागले; पण ते हिंमत हरले नाही. ७२ फुटावर मऊ भाग लागला आणि पाणी मुबलक मिळाल्याने त्यांचे समाधान झाले.यानंतर शासकीय योजनांच्या मागे न लागता कष्टाच्या पैशातून संत्र्याची ३०० झाडे लावली. दगड व मुरूम यात कसे खड्डे खोदायचे याचा सतत विचार; पण यावरही मात केली आणि प्रयत्नांना यश आले. संत्रा बगिच्याची देखभाल व्यवस्थित केल्याने २०११ पासून दरवर्षी २ ते ३ लाख रुपयांत बगिचाची विक्री होते. सोबतच कपाशी, तूर, सोयाबीन, मिरची भाजीपाला आदी पिके त्यांनी घेतली. यात नफा मिळाला; पण सिंचनासाठी पाणी कमी पडत होते. यामुळे २००७ मध्ये त्यांनी दुसरी विहिर खोदली. २०११ मध्ये आणखी दोन विहिरी खोदल्या. पैकी दोनच विहिरींना पाणी लागले. अखेरचा उपाय म्हणून आणखी एक विहीर खोदण्यास गतवर्षी सुरूवात केली. सध्या ५५ फुट खोदकाम झाले. आता मऊ भाग व पाणी लागले. या पाण्यातून नवीन संत्राची ३०० झाडे तयार करीत आहे.वनविभागाचा सर्व्हे शेताला लागून आहे. मोजणी झाली तेव्हा वनकर्मचारी शंकरच्या शेतात आले. तीन एकर शेती वनविभागाच्या हद्दीत आहे, असा दम दिला. याला न घाबरता त्यांनी न्यायालयात धाव घेतली. माझा हक्क न्यायालय मिळवून देईल, यावर विश्वास असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. एका तपापासून सुरू आहे संघर्षगावापासून अर्धा किमी अंतरावर शेती आहे. वन्यप्राण्यांचा हैदोस असल्याने दररोज कुटुंबातील एका सदस्याला शेतात रक्षणासाठी जावे लागते. ऊन्ह, वारा, पाऊसासोबत १२ वर्षांचा संघर्ष आजही जिद्दीने सुरू आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही शेती प्रेरणा व नवीन दिशा देणारी ठरत आहे. कृषी विभागाचे आणखी तांत्रिक मार्गदर्शन लाभल्यास शेतीचे नंदनवन होऊ शकेल.शेतकऱ्यांना शासन विविध योजनांचा लाभ देतात. चामला येथील शेतकरी शंकर मदनकर यांच्या शेताला भेट देऊन ईस्त्राईल पद्धतीच्या संत्रा लागवडीस प्रोत्साहित करणार आहे.- अरुण बलसाने, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.खडकाळ भागात विहिरीचे खोदकाम करताना त्रास झाला; प्रामाणिक कष्टाने फळ मिळाले. मी व माझी तीनही मुले दिवसभर शेतीला वेळ देतो. यामुळे आर्थिक बाजू भक्कम झाली.- शंकर मदनकर, शेतकरी, चामला.