शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

भाजप सरकारला संविधानावर हल्ला करू देणार नाही

By admin | Updated: April 10, 2016 02:27 IST

देशात व राज्यात असणारे भाजप सरकार अन्यायी व अत्याचारी सरकार आहे. सत्तेवर आल्यापासून देशात जाती-जातीत, धर्मा-धर्मांत मतभेद निर्माण करीत आहे.

विश्वजीत कदम : प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने संविधान संरक्षण ज्योत यात्रापुलगाव : देशात व राज्यात असणारे भाजप सरकार अन्यायी व अत्याचारी सरकार आहे. सत्तेवर आल्यापासून देशात जाती-जातीत, धर्मा-धर्मांत मतभेद निर्माण करीत आहे. ज्या विचारांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली, त्या घटनेची, संविधानाची सरकारकडून पायमल्ली होत आहे. देशातील दलित व गरिबांच्या संरक्षणासाठी युवक काँग्रेस भाजपा सरकारला संविधानावर हल्ला करू देणार नाही, असा इशारा युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी दिला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश युवक काँग्रेसद्वारे सेवाग्राम येथून काढण्यात आलेली संविधान संरक्षण ज्योत यात्रा शुक्रवारी रात्री येथे पोहोचली. यावेळी नगर परिषद पुढील प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी कदम यांनी डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले.राष्ट्रपिता महात्मा गांधी ते घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा व तत्वप्रणालीवर चालणारा काँग्रेस पक्ष आहे. भाजपा सरकारकडून होणारी संविधानाची पायमल्ली थांबविण्याची ताकद केवळ काँग्रेस पक्षातच आहे, असे मतही कदम यांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मनीषकुमार साहू तर अतिथी म्हणून काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश सावरकर, प्रभारी हिंमत असंग, सहप्रभारी हरिकिशन पुजाला, रित्वीज, निलेश विश्वकर्मा, जोशी, वर्धा लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष विक्रम ठाकरे, देवळी पुलगाव मतदार संघाचे अध्यक्ष विपीन राऊत, मनोज वसू, महेश तेलरांधे, युवक काँगे्रसचे गोविंद दैय्या प्रामुख्याने उपस्थित होते.शिवाय महिला काँग्रेस शहराध्यक्ष रंजना पवार, सरपंच वहिदा शेख, मृणाल सोनी, प्रमोद घालणी, सुमंत मानकर, विलास कडू, शैला शरीफ, नगरसेविका मंगला अंबादे, रमेश शर्मा, राजू गिरूळकर, संजय दाबोडे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अश्विन शाह यांनी केले तर उपस्थितांचे आभार विठ्ठल वानखेडे यांनी मानले. याप्रसंगी संविधान संरक्षण ज्योत यात्रेबाबत माहिती देण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)