शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत जिल्ह्यातील भाजप गंभीर नाहीच ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

राज्य सरकारने समर्पित आयोग गठित केला. शिवाय आयोग आरक्षणाविषयी म्हणणे जाणून घेत आहे. असे असले तरी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या दिवशी आणि ज्यावेळी म्हणणे जाणून घेतले जाणार आहे, त्याबाबत राजकीय पक्षांना अवगत करणे गरजेचे होते. किमान जिल्हास्तरावर तशी व्यवस्था करायला पाहिजे होती. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, ही आमची मागणी असून, त्यासाठी आम्ही लढाही देत आहोत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती तसेच नगरपालिका, महानगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गात (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग स्थापन केला आहे. याच समर्पित आयोगाकडे मत नाेंदविण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल २४ व्यक्तींनी नोंदणी केली आहे. यात सर्वाधिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, भाजपचे एकाही पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. ओबीसींचे राजकीय आरक्षणाच्या विषयाकडे विविध आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधणारी जिल्ह्यातील भाजप गंभीर नाहीच, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

उपराजधानीत जाणून घेतले म्हणणे-   ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी राज्य शासनाने समर्पित आयोग गठित केले आहे. याच आयोगासमोर म्हणणे मांडण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील तब्बल २४ व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी केली आहे. शनिवारी दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत नोंदणी करणाऱ्यांनी आपले म्हणणे समर्पित आयोगापुढे मांडले. नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांची मते जाणून घेण्यात आली.

नोंदणी करणाऱ्यांना देण्यात आला पास-    समर्पित आयोगासमोर आरक्षणाविषयी म्हणणे मांडण्यासाठी जिल्ह्यातील २४ व्यक्तींनी जिल्हाधिकारी वर्धा कार्यालयात रीतसर नोंदणी केली. या सर्व व्यक्तींना नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितीन पाटील यांनी पास जारी केला आहे. नागपूर येथील विभागीय कार्यालयात हा पास बघितल्यावरच प्रवेश देण्यात आला.

समर्पित आयोगात सहा तज्ज्ञांचा समावेश-    राज्य शासनाने गठित केलेल्या समर्पित आयोगात माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया हे अध्यक्ष तर सदस्य सचिव म्हणून पंकजकुमार (भा.प्र.से) यांच्यासह चार तज्ज्ञ व्यक्तींचा सदस्य म्हणून समावेश आहे. शनिवारी अनेकांनी ओबीसी आरक्षणाविषयी बाजू मांडली.

राज्य सरकारने समर्पित आयोग गठित केला. शिवाय आयोग आरक्षणाविषयी म्हणणे जाणून घेत आहे. असे असले तरी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या दिवशी आणि ज्यावेळी म्हणणे जाणून घेतले जाणार आहे, त्याबाबत राजकीय पक्षांना अवगत करणे गरजेचे होते. किमान जिल्हास्तरावर तशी व्यवस्था करायला पाहिजे होती. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, ही आमची मागणी असून, त्यासाठी आम्ही लढाही देत आहोत. महाविकास आघाडी सरकारमुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण हिरावले गेले. विभागीय स्तरावरील भाजपच्या शिष्टमंडळाने आयोगापुढे बाजू मांडली आहे.- सुनील गफाट, जिल्हाध्यक्ष, भाजप, वर्धा.

ओबीसींचे राजकीय आरक्षण हे भाजपच्या चुकीच्या धोरणामुळेच संपुष्टात आले. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीच हा गोंधळ सुरू केला. भाजप ओबीसींना राजकीय आरक्षण द्या, अशी मागणी रेटत असली तरी मुळात भाजप आरक्षणविरोधी आहे. महाविकास आघाडी सरकारला वेळोवेळी बदनाम करण्यासाठी सध्या भाजप प्रयत्न करीत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष ओबीसी आहेत; पण त्यांनी आयोगासमोर म्हणणे मांडण्यासाठी नोंदणी केली नाही. ही बाब निंदनीयच आहे.- मनोज चांदूरकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, वर्धा.

राज्य शासनाने गठित केलेला समर्पित आयोग नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवार, दि. २८ मे रोजी नागरिकांची मत जाणून घेणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात म्हणणे मांडणाऱ्यांची नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. २४ व्यक्तींनी आयोगासमोर म्हणणे मांडण्याची तयारी दर्शविल्याने व नोंदणी केल्याने त्यांना पास देण्यात आला आहे.- नितीन पाटील, उपजिल्हाधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षण