शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

स्वतंत्र विदर्भ राज्याकडे दुर्लक्ष भाजपला भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:06 IST

भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे प्रचारातही कायम दुर्लक्ष केल्याने नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा फटका मतदारांनी दिला आहे.

ठळक मुद्देअनेक विदर्भवादी स्वतंत्र निवडणूक लढूनही पराभूत नागविदर्भ आंदोलन समितीचे राजेही हरले

अभिनय खोपडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला भारतीय जनता पक्षाने सोडचिठ्ठी दिल्याने या निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे दिसून येत आहे. २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विदर्भात सर्वाधिक जागा जिंकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद पटकाविले होते. १९९० च्या दशकात भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भ राज्याचा उल्लेख केला होता. भाजप देशात लहान राज्याचे समर्थन करणारा पक्ष असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य होेईल अशी जनतेला आशा होती परंतु शिवसेनेच्या दबावामुळे भाजपला स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा गुंडाळून ठेवावा लागला. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर विदर्भवाद्यांनी भाजप नेत्यांच्या घरावर मोर्चे नेलेत निदर्शने केली. त्यावेळी विदर्भ राज्य देऊ असे लेखी आश्वासन भाजप नेत्यांनी दिली होते. परंतु सत्तेवर येताच भाजपने विदर्भ राज्यात मागणीकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर विदर्भात अनेक नवीन जिल्ह्याचे प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे हे जिल्हे निर्माण केले जातील असेही सांगण्यात आलं होतं परंतु वित्त विभागाने निर्मितीबाबत आडकाठी आणली. त्यामुळे विदर्भात एकही नवा जिल्हा निर्माण झाला नाही. यावेळी भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे प्रचारातही कायम दुर्लक्ष केल्याने नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा फटका मतदारांनी दिला आहे. अहेरीचे राजे व विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते अम्ब्रीशराव आत्राम हे भाजपच्या तिकीटावर पराभूत झाले.

विदर्भवादीही निवडणुकीत पराभूतस्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा पुरस्कार करणारे विविध उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. राजुरा मतदारसंघातून माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, हिंगणघाट मतदारसंघातू अनिल जवादे यांनाही या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. विदर्भवादी नेते अशी ओळख असलेले धर्मरावबाबा आत्राम अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेत त्यांनी विदर्भवादी नेते व भाजपचे उमेदवार राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा पराभव केला. त्यांची नागविदर्भ आंदोलन समिती विदर्भ राज्याच्या मागणीची कट्टर समर्थक आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत विदर्भ राज्य व अहेरी जिल्हा झाला नाही.

विदर्भाच्या विकासावर फक्त गडकरीच बोललेभाजपचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी विदर्भातील विकासाच्या विविध मुद्द्यांना प्रचारादरम्यान हात घातला व विदर्भाचा विकास अधिक गतीने केला जाईल असे आश्वासन त्यांनी विविध जाहीर सभांमधून मतदारांना दिले त्याचा परिणाम भाजपच्या विदर्भातील काही जागा टिकवून ठेवण्यात झाला हे दिसून येत आहे.

बावनकुळे फॅक्टरचा परिणामभाजपने यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी कापली याचा मोठा फटका पक्षाला बसला. गेल्या दोन निवडणुका भाजपकडे असलेला तेली समाज काँग्रेसकडे वळता झाला. यांचा विदर्भातील निकालांवर परिणाम झाला.भाजपने यापूर्वी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण केले नाही. याचा निश्चितच काही प्रमाणात फटका भाजपला बसला. शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत देण्यात आली नाही. त्यामुळेही भाजप पराभूत झाली. स्वतंत्र विदर्भ राज्याचा पुरस्कार करणारे अहेरीचे राजेही या निवडणुकीत हरलेत. आम्ही पूर्वीपासून विदर्भ राज्याचा पुरस्कार करीत होतो आताही विदर्भ राज्याची मागणी सरकार दरबारी लावून धरणार आहोत.- धर्मरावबाबा आत्राम, आमदार तथा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ