शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जिल्ह्यात भाजप-काँग्रेस समांतर

By admin | Updated: October 19, 2014 23:58 IST

जिल्ह्यातील चारही मतदार संघात अतिशय चुरशीच्या लढती झाल्या. हिंगणघाटात भाजपचे समीर कुणावार यांनी एकतर्फी विजय संपादन केला. देवळीत अखेरच्या फेरीत ९४३ मतांची आघाडी घेत काँग्रेसचे

वर्धा : जिल्ह्यातील चारही मतदार संघात अतिशय चुरशीच्या लढती झाल्या. हिंगणघाटात भाजपचे समीर कुणावार यांनी एकतर्फी विजय संपादन केला. देवळीत अखेरच्या फेरीत ९४३ मतांची आघाडी घेत काँग्रेसचे रणजित कांबळे यांनी चवथ्यांना विजय संपादन करून काँग्रेसचा गड कायम राखला, तर आर्वीत अटीतटीची लढत देत काँग्रेसचे अमर काळे यांनी काँग्रेसला गड परत मिळवून दिला. वर्धेत अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे डॉ. पंकज भोयर यांनी विजयश्री खेचून आणली. या निवडणुकीत वर्धेत सुरेश देशमुख, आर्वीत दादाराव केचे आणि हिंगणघाटात अशोक शिंदे या विद्यमान आमदारांसह देवळीत माजी खासदार सुरेश वाघमारे यांना पराभवाला सामोरे जावे लागले, तर समीर कुणावार आणि डॉ. पंकज भोयर या नव्या चेहऱ्यांना जनतेने पहिल्यांदा विधानसभेत पाठविले आहेत. हिंगणघाटात समीर कुणावार यांनी ९० हजार २७५ इतकी विक्रमी मते घेऊन शानदार विजय संपादन करून शिवसेनेचा गड काबीज केला. शिवसेनेचे अशोक शिंदे मात्र चवथ्या स्थानावर फेकल्या गेले. एखाद्या उमेदवाराला मिळालेली ही या निवडणुकीतील सर्वाधिक मते आहेत. परिणामी इतर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अनामती जप्त झाल्या. २५ हजार १०० मते घेऊन बसपाचे प्रलय तेलंग दुसऱ्या क्रमांकावर राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे यांना यावेळी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांना २३ हजार ८३ मते मिळाली. काँग्रेसच्या उषाकिरण थुटे यांना १२ हजार ६४५ मते घेऊन पाचव्या, तर ७ हजार ३०० मते घेऊन मनसेचे अतुल वांदिले यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.देवळीत अतिशय चुरशीचा सामना रंगला. शेवटच्या फेरीपर्यंत कोण निवडून येईल, याची उत्कंठा शिगेला पोहचली होती. सुरुवातीच्या पाच फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे हेवीवेट उमेदवार रणजित कांबळे आघाडीवर होते. नंतरच्या फेऱ्यांमध्ये भाजपाचे सुरेश वाघमारे यांनी मतांची आघाडी घेतली आणि ती १५ व्या फेरीपर्यंत कायम ठेवली. यानंतर मात्र २३ व्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी कमालीची घसरत गेली. त्यांच्याकडे केवळ ३०० मतांचीच आघाडी शिल्लक होती. २४ वी अंतिम फेरी शिल्लक होती. वाघमारे ही आघाडी कायम ठेवणार वा रणजित कांबळे मोठी उडी घेत विजय हिसकावून आणणार, अशी उत्कंठा वाढली होती. भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्तेही श्वास रोखून होते. अशातच अंतिम फेरीची मतमोजणी झाली तेव्हा रणजित कांबळे यांनी जोरदार उसंडी मारत ९४३ मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला. हे लक्षात येताच काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.