शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात भाजप-काँग्रेस समांतर

By admin | Updated: October 19, 2014 23:58 IST

जिल्ह्यातील चारही मतदार संघात अतिशय चुरशीच्या लढती झाल्या. हिंगणघाटात भाजपचे समीर कुणावार यांनी एकतर्फी विजय संपादन केला. देवळीत अखेरच्या फेरीत ९४३ मतांची आघाडी घेत काँग्रेसचे

वर्धा : जिल्ह्यातील चारही मतदार संघात अतिशय चुरशीच्या लढती झाल्या. हिंगणघाटात भाजपचे समीर कुणावार यांनी एकतर्फी विजय संपादन केला. देवळीत अखेरच्या फेरीत ९४३ मतांची आघाडी घेत काँग्रेसचे रणजित कांबळे यांनी चवथ्यांना विजय संपादन करून काँग्रेसचा गड कायम राखला, तर आर्वीत अटीतटीची लढत देत काँग्रेसचे अमर काळे यांनी काँग्रेसला गड परत मिळवून दिला. वर्धेत अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे डॉ. पंकज भोयर यांनी विजयश्री खेचून आणली. या निवडणुकीत वर्धेत सुरेश देशमुख, आर्वीत दादाराव केचे आणि हिंगणघाटात अशोक शिंदे या विद्यमान आमदारांसह देवळीत माजी खासदार सुरेश वाघमारे यांना पराभवाला सामोरे जावे लागले, तर समीर कुणावार आणि डॉ. पंकज भोयर या नव्या चेहऱ्यांना जनतेने पहिल्यांदा विधानसभेत पाठविले आहेत. हिंगणघाटात समीर कुणावार यांनी ९० हजार २७५ इतकी विक्रमी मते घेऊन शानदार विजय संपादन करून शिवसेनेचा गड काबीज केला. शिवसेनेचे अशोक शिंदे मात्र चवथ्या स्थानावर फेकल्या गेले. एखाद्या उमेदवाराला मिळालेली ही या निवडणुकीतील सर्वाधिक मते आहेत. परिणामी इतर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अनामती जप्त झाल्या. २५ हजार १०० मते घेऊन बसपाचे प्रलय तेलंग दुसऱ्या क्रमांकावर राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे यांना यावेळी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांना २३ हजार ८३ मते मिळाली. काँग्रेसच्या उषाकिरण थुटे यांना १२ हजार ६४५ मते घेऊन पाचव्या, तर ७ हजार ३०० मते घेऊन मनसेचे अतुल वांदिले यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.देवळीत अतिशय चुरशीचा सामना रंगला. शेवटच्या फेरीपर्यंत कोण निवडून येईल, याची उत्कंठा शिगेला पोहचली होती. सुरुवातीच्या पाच फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे हेवीवेट उमेदवार रणजित कांबळे आघाडीवर होते. नंतरच्या फेऱ्यांमध्ये भाजपाचे सुरेश वाघमारे यांनी मतांची आघाडी घेतली आणि ती १५ व्या फेरीपर्यंत कायम ठेवली. यानंतर मात्र २३ व्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी कमालीची घसरत गेली. त्यांच्याकडे केवळ ३०० मतांचीच आघाडी शिल्लक होती. २४ वी अंतिम फेरी शिल्लक होती. वाघमारे ही आघाडी कायम ठेवणार वा रणजित कांबळे मोठी उडी घेत विजय हिसकावून आणणार, अशी उत्कंठा वाढली होती. भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्तेही श्वास रोखून होते. अशातच अंतिम फेरीची मतमोजणी झाली तेव्हा रणजित कांबळे यांनी जोरदार उसंडी मारत ९४३ मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला. हे लक्षात येताच काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.