शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्ह्यात भाजप-काँग्रेस समांतर

By admin | Updated: October 19, 2014 23:58 IST

जिल्ह्यातील चारही मतदार संघात अतिशय चुरशीच्या लढती झाल्या. हिंगणघाटात भाजपचे समीर कुणावार यांनी एकतर्फी विजय संपादन केला. देवळीत अखेरच्या फेरीत ९४३ मतांची आघाडी घेत काँग्रेसचे

वर्धा : जिल्ह्यातील चारही मतदार संघात अतिशय चुरशीच्या लढती झाल्या. हिंगणघाटात भाजपचे समीर कुणावार यांनी एकतर्फी विजय संपादन केला. देवळीत अखेरच्या फेरीत ९४३ मतांची आघाडी घेत काँग्रेसचे रणजित कांबळे यांनी चवथ्यांना विजय संपादन करून काँग्रेसचा गड कायम राखला, तर आर्वीत अटीतटीची लढत देत काँग्रेसचे अमर काळे यांनी काँग्रेसला गड परत मिळवून दिला. वर्धेत अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे डॉ. पंकज भोयर यांनी विजयश्री खेचून आणली. या निवडणुकीत वर्धेत सुरेश देशमुख, आर्वीत दादाराव केचे आणि हिंगणघाटात अशोक शिंदे या विद्यमान आमदारांसह देवळीत माजी खासदार सुरेश वाघमारे यांना पराभवाला सामोरे जावे लागले, तर समीर कुणावार आणि डॉ. पंकज भोयर या नव्या चेहऱ्यांना जनतेने पहिल्यांदा विधानसभेत पाठविले आहेत. हिंगणघाटात समीर कुणावार यांनी ९० हजार २७५ इतकी विक्रमी मते घेऊन शानदार विजय संपादन करून शिवसेनेचा गड काबीज केला. शिवसेनेचे अशोक शिंदे मात्र चवथ्या स्थानावर फेकल्या गेले. एखाद्या उमेदवाराला मिळालेली ही या निवडणुकीतील सर्वाधिक मते आहेत. परिणामी इतर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अनामती जप्त झाल्या. २५ हजार १०० मते घेऊन बसपाचे प्रलय तेलंग दुसऱ्या क्रमांकावर राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे यांना यावेळी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांना २३ हजार ८३ मते मिळाली. काँग्रेसच्या उषाकिरण थुटे यांना १२ हजार ६४५ मते घेऊन पाचव्या, तर ७ हजार ३०० मते घेऊन मनसेचे अतुल वांदिले यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.देवळीत अतिशय चुरशीचा सामना रंगला. शेवटच्या फेरीपर्यंत कोण निवडून येईल, याची उत्कंठा शिगेला पोहचली होती. सुरुवातीच्या पाच फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे हेवीवेट उमेदवार रणजित कांबळे आघाडीवर होते. नंतरच्या फेऱ्यांमध्ये भाजपाचे सुरेश वाघमारे यांनी मतांची आघाडी घेतली आणि ती १५ व्या फेरीपर्यंत कायम ठेवली. यानंतर मात्र २३ व्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी कमालीची घसरत गेली. त्यांच्याकडे केवळ ३०० मतांचीच आघाडी शिल्लक होती. २४ वी अंतिम फेरी शिल्लक होती. वाघमारे ही आघाडी कायम ठेवणार वा रणजित कांबळे मोठी उडी घेत विजय हिसकावून आणणार, अशी उत्कंठा वाढली होती. भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्तेही श्वास रोखून होते. अशातच अंतिम फेरीची मतमोजणी झाली तेव्हा रणजित कांबळे यांनी जोरदार उसंडी मारत ९४३ मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला. हे लक्षात येताच काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.