शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा उन्हाळवाहीत व्यस्त

By admin | Updated: April 30, 2016 02:24 IST

खरीप व रबी असे दोन हंगाम बळीराजाकरिता महत्त्वाचे असतात. नुकताच रबी हंगाम संपल्याने येणाऱ्या खरीप हंगामाची पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे.

खरीप हंगामाची तयारी : मशागतीचे काम ट्रॅक्टरच्या सहाय्यानेघोराड : खरीप व रबी असे दोन हंगाम बळीराजाकरिता महत्त्वाचे असतात. नुकताच रबी हंगाम संपल्याने येणाऱ्या खरीप हंगामाची पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे. उन्हाळवाहीच्या कामात बळीराजा व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळाण्याची कायम प्रतीक्षा करीत असलेल्या बळीराजाला सूर्योदय व सूर्यास्त शेताच्या बांधावरच पाहावा लागतो. रखरखत्या उन्हात शेतातील कामे उरकण्यासाठी जीवाचा आटापीटा करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात खरीप हंगामाची पेरणी झाल्यानंतर उगवणारे पीक जनावरे येवू नये म्हणून धुऱ्यावर कुंपण करण्यासाठी बोरीच्या झाडाच्या काट्या तोडून फास लावणे, शेतीची नांगरणी करणे, शेतातील केरकचरा वेचणे, बांधावरील तण नाहीशे करणे, शेत खत टाकणे आदी कामे अवघ्या दोन महिन्यात आटोपणे गरजेचे असते. त्यातच लग्नसराई असल्याने यात विलंब होतो. उष्णतामान वाढत असले तरी शेतात राबावेच लागत असल्याने शेतकरी त्याची बैलजोडी घेऊन शेताकडे जाताना दिसतो. अवघ्या एक महिन्यावर रोहिणी नक्षत्र आले आहे. उन्ह, वारा, पाऊस यात बळीराजाला काम करावेच लागते. नापिकी आली तरी, अतिवृष्टीने पीक गेले तरी आणि कर्जबाजारी झालो तरी शेती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. येणारा दिवस हा आमच्यासाठी चांगला दिवस येईल, अशी आशा ठेवून शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येते. शेताची मशागत करण्यासाठी परिसरात वखरणीचे काम सुरू झाले आहे. यानंतर बळीराजाची आस वरुणराजाच्या आगमनाकडे असणार आहे.(वार्ताहर)रोहिणी नक्षत्र महिनाभरावरबैलजोडीच्या वाढलेल्या किंमती पाहता बहुतांश शेतकऱ्यांजवळ बैलजोडी नाही. त्यामुळे उन्हाळवाहीचे कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात आहे.नांगरणी, वखरणी, धुरळणी ही कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. रोहिणी नक्षत्र महिनाभरावर असल्याने मशागतीचे कामे आटोपणे गरजेचे आहे. याकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.पारंपरिक साधनांसह आता शेतीकरिता यंत्रसामग्रीचा वापर केला जातो. यामुळे श्रमाची बचत होत असली तरीही लागवडीच्या खर्चात मात्र वाढ होत असल्याचे बोलले जाते.शेणखतासाठी करावी लागते भटकंतीशेतातील पीक सकस व भरघोस येण्यासाठी तसेच अधिकाधिक उत्पन्न होण्यासाठी शेतकरी खत देतो. यातून दोन पैसे पदरात पडावे व शेताची पोत कायम राखण्यासाठी शेणखताची आवश्यकता असते. पण जनावरांची संख्या कमी होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना जिल्ह्याबाहेर जाऊन शेणखत आणावे लागत आहे. शेतकरी शेणखतासाठी भटकंती करीत असून यात खर्चही अधिक होत आहे.