शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

बळीराजा उन्हाळवाहीत व्यस्त

By admin | Updated: April 30, 2016 02:24 IST

खरीप व रबी असे दोन हंगाम बळीराजाकरिता महत्त्वाचे असतात. नुकताच रबी हंगाम संपल्याने येणाऱ्या खरीप हंगामाची पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे.

खरीप हंगामाची तयारी : मशागतीचे काम ट्रॅक्टरच्या सहाय्यानेघोराड : खरीप व रबी असे दोन हंगाम बळीराजाकरिता महत्त्वाचे असतात. नुकताच रबी हंगाम संपल्याने येणाऱ्या खरीप हंगामाची पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे. उन्हाळवाहीच्या कामात बळीराजा व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळाण्याची कायम प्रतीक्षा करीत असलेल्या बळीराजाला सूर्योदय व सूर्यास्त शेताच्या बांधावरच पाहावा लागतो. रखरखत्या उन्हात शेतातील कामे उरकण्यासाठी जीवाचा आटापीटा करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात खरीप हंगामाची पेरणी झाल्यानंतर उगवणारे पीक जनावरे येवू नये म्हणून धुऱ्यावर कुंपण करण्यासाठी बोरीच्या झाडाच्या काट्या तोडून फास लावणे, शेतीची नांगरणी करणे, शेतातील केरकचरा वेचणे, बांधावरील तण नाहीशे करणे, शेत खत टाकणे आदी कामे अवघ्या दोन महिन्यात आटोपणे गरजेचे असते. त्यातच लग्नसराई असल्याने यात विलंब होतो. उष्णतामान वाढत असले तरी शेतात राबावेच लागत असल्याने शेतकरी त्याची बैलजोडी घेऊन शेताकडे जाताना दिसतो. अवघ्या एक महिन्यावर रोहिणी नक्षत्र आले आहे. उन्ह, वारा, पाऊस यात बळीराजाला काम करावेच लागते. नापिकी आली तरी, अतिवृष्टीने पीक गेले तरी आणि कर्जबाजारी झालो तरी शेती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. येणारा दिवस हा आमच्यासाठी चांगला दिवस येईल, अशी आशा ठेवून शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येते. शेताची मशागत करण्यासाठी परिसरात वखरणीचे काम सुरू झाले आहे. यानंतर बळीराजाची आस वरुणराजाच्या आगमनाकडे असणार आहे.(वार्ताहर)रोहिणी नक्षत्र महिनाभरावरबैलजोडीच्या वाढलेल्या किंमती पाहता बहुतांश शेतकऱ्यांजवळ बैलजोडी नाही. त्यामुळे उन्हाळवाहीचे कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात आहे.नांगरणी, वखरणी, धुरळणी ही कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. रोहिणी नक्षत्र महिनाभरावर असल्याने मशागतीचे कामे आटोपणे गरजेचे आहे. याकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.पारंपरिक साधनांसह आता शेतीकरिता यंत्रसामग्रीचा वापर केला जातो. यामुळे श्रमाची बचत होत असली तरीही लागवडीच्या खर्चात मात्र वाढ होत असल्याचे बोलले जाते.शेणखतासाठी करावी लागते भटकंतीशेतातील पीक सकस व भरघोस येण्यासाठी तसेच अधिकाधिक उत्पन्न होण्यासाठी शेतकरी खत देतो. यातून दोन पैसे पदरात पडावे व शेताची पोत कायम राखण्यासाठी शेणखताची आवश्यकता असते. पण जनावरांची संख्या कमी होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना जिल्ह्याबाहेर जाऊन शेणखत आणावे लागत आहे. शेतकरी शेणखतासाठी भटकंती करीत असून यात खर्चही अधिक होत आहे.