शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

पालकमंत्री येण्यापूर्वीच केले रस्त्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

आर्वी शहरातून अमरावतीकडे जाणारा हा रस्ता मागील पाच वर्षांपासून अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे हा रस्ता गुळगुळीत व्हावा यासाठी आ. दादाराव केचे यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. दादाराव केचे यांनी हा रस्त्या नव्याने करण्याची आवश्यकता लक्षात आणून दिली असता या रस्त्यासाठी ६०.३६ कोटी रूपयांचा निधी दिला होता. 

ठळक मुद्देकामाला प्रारंभ : भाजप नेत्यांनी घेतले श्रेय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/आर्वी : आर्वी-देऊरवाडा या रस्त्याचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार २८ डिसेंबर रोजी करणार असले तरी याच रस्त्याचे काम अतिशय वेगाने सुरू करण्यात आले आहे. फडणवीस सरकारच्या काळात या रस्त्याच्या विकासासाठी निधी मिळाला असल्याने पालकमंत्र्यांच्या पुर्वीच खासदार रामदास तडस यांच्या हस्ते आणि आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली या रस्त्याचे भूमिपूजन करून कामाला प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमावरही आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.आर्वी शहरातून अमरावतीकडे जाणारा हा रस्ता मागील पाच वर्षांपासून अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे हा रस्ता गुळगुळीत व्हावा यासाठी आ. दादाराव केचे यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. दादाराव केचे यांनी हा रस्त्या नव्याने करण्याची आवश्यकता लक्षात आणून दिली असता या रस्त्यासाठी ६०.३६ कोटी रूपयांचा निधी दिला होता. शासकीय निधी खेचून आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमीत वानखेडे यांनीही सहकार्य केले होते. या रस्त्या लगत सुमारे दहा गावे असून त्या गावातील नागरिकांना या रस्त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या रस्त्याच्या कडेला असलेली विद्युत खांब स्थलांतरित करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून रस्ता रुंदीकरणाच्या कामालाही सुरूवात झाली आहे. देऊरवाडा ते नांदपुरपर्यंत खाेदकामही करण्यात आले आहे. लवकरच हा रस्ता गुळगुळीत होणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग